Wednesday, June 29, 2016

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥ (मराठी)

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥

    तर्काच्या वादळानंतर बुद्धी, चित्त एका दिशेने व दशेने अनुप्राणित होतात, पेशीपेशीतून भावधारेची गंगोत्री उगम पावते, धो धो वाहु लागते, अनंताच्या समुद्राच्या दिशेने. तीचं सुरुवातीचं अवखळ ओसंडून वाहणं, समाधीच्या मैदानी प्रदेशात गंभीरत्व धारण करतं. पात्र विस्तारतं. त्या गंगोत्रीचं सुरुवातीचं एकटीचं गाणं आता वैश्‍विक सूर होतो. अशी श्रद्धारुपी गंगा मलिनता घालवते. आरपार निरसपाणी सौंदर्य उधळते. ती निष्ठेसारखी रविवारच्या चेहर्‍यासारखी नसते. तिथे मुखवटे नसतात. म्हणून अंध ही श्रद्धा नसते तर अंध हा विश्‍वास असतो.
    निष्ठा बाह्यसंस्कारामुळे मिळते तर श्रद्धा आत जन्माला येते. मन लेकाचं मोठ्ठं तार्किक आहे, संदेह करतं, पुरावा मागतं. होय म्हणायलाही मुद्दे शोधतं आणि विश्‍वास ठेवतं. पण विश्‍वास व संदेह एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. तर्क मात्र दोन्ही ठिकाणी केला जातो. श्रद्धा मात्र वेडेपणा असतो. ती एक व्यक्तिगत गहनतेत उमटलेली प्रतिती आहे. आई, बाप, समाज, संस्कृती, परंपरा यातून निष्ठा जन्माला येते. निष्ठा ही मृत श्रद्धा आहे. श्रद्धा ही जीवंत निष्ठा आहे !
    सर्व धर्म निष्ठेशी संबंधीत असतात पण धार्मिकतेचा संबंध केवळ श्रद्धेशी असतो. श्रद्धावान असणं म्हणजेच धार्मिक असणं.
    आस्तिकाची विश्‍वाला आलिंगन देणारी एक श्रद्धा असते तशी नास्तिकाचीही एक श्रद्धा असते. जगण्यासाठी मुळात श्रद्धा ही उपादान असते. ती प्रत्येकात असतेच. नाहीतर कोणी जगुच शकणार नाही. मग संदेही श्‍वास ही घेऊ शकणार नाही. पण तोही हवेवर श्रद्धा ठेऊन श्‍वास घेतोच. पूर्ण श्रद्धा परमजीवन ठरते, तर पूर्ण संदेह आत्महत्या !
    कधीतरी आकाशाला गवसणी घालता येईल या श्रद्धेने फांद्या वर उठतात, जीवनावरील त्या अनुकंपनीय श्रद्धेतूनच विकास संभवतो. श्रद्धावान सरळ असतो त्याची फसवणुकही होईल पण त्याला कोणी दु:खी करु शकत नाही. कारण तो अज्ञाताच्या वाटेवर निघालेला असुरक्षित जीवन जगणारा उपासक असतो. सुरक्षित निष्ठावान मानवी नियमांच्या कडीकोयंडांत स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. बंदीस्त गुलाम. पण अनंताच्या अनिर्बंध स्वातंत्र्यात झोकला गेलेला श्रद्धावान वेडा पीर मोकळा असतो. हृदयाची कवाडं उघडी ठेऊन अस्तित्वाच्या प्रेमाचं स्वागत करतो. निष्ठा या मृत असतात हे समजतात तो गुलाम श्रद्धावान सम्राट बनतो. अमृत होतो !
    मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् । (गीता 8.7) माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू नि:संशय मलाच मिळशील. हे सीमातीत अस्तिताचे आवाहन हृदय स्वीकारते. जन्मोजन्म मनबुद्धीने केलेल्या तर्काचे कधीतरी समर्पण होते. मग विठ्ठल भेटतो.
    कां वर्षाकाळी सरिता। जैसी चढो लागे पंडुसुता। तैसी नीच नवी भजतां। श्रद्धा दिसे॥(ज्ञा. 12-36) उन्हाळ्यात रोडावलेली सरिता पावसाळ्यात मात्र चांगलीच फुगु लागते. मेघही हातचं राखुन न ठेवता, सहस्त्रधारांनी सरितेला वर्षादान देतात. अगदी तसेच लडीवाळ भक्त बाळ श्रद्धेने माऊलीच्या पायाशी घुटमळतो ती माय लेकराला कडेवर घेते. भगवंतही त्या ढगांप्रमाणे पाझरतो. मग दोन्हीकडचे पाणी एकच होते. जे मेघात तेच सरितेत.
    जयांचा ईश्‍वरी जिव्हाळा। ते भोगिती स्वानंदसोहळा। जयांचा जनावेगळा। ठेवा आक्षै॥ (दा. 3-10-31) ही चढता वाढता भावोन्मत्तेत बुडालेला उन्मनी श्रद्धावान भक्त अमृताची चुळी मुखात धरतो. प्रेम पुष्ट होते, चित्त शुद्ध होते. तो प्राजक्ताचा भावसुगंधी सडा अंगणात पडतो. ईश्‍वरी जिव्हाळ्यातला स्वानंद सोहळामग्न भक्त गाऊ लागतो- रामदासी दर्शन जाले । आत्म्या विठ्ठलातें देखिले॥(स.गा.57)
    श्रद्धायुक्त हृदयात जे प्रतिबींब पडते. तेच त्याचे रुप होते. ज्याचे जया ध्यान। तेचि होय त्याचे मन॥(तुकाराम-3393). अशा श्रद्धेसाठी सुरुवात म्हणजे संदेहाचा ठावठिकाणा शोधुन काढून, बेगडी निष्ठा फेकून खरेखुरे प्रामाणिक संदेही बनुन मनाला तर्काच्या त्या सीमा रेषेवर आणुन ठेवणं, जिथे त्याचे विश्‍वास व संदेह मावळतील. कारण संदेह दु:खाशिवाय दुसरं काही देत नाही. पण त्या दु:खातुनच विकास संभवेल. श्रद्धा म्हणजे रुपांतरण, सार्‍या समाधीचा पाया श्रद्धा आहे असे पतंजलीही म्हणतात- श्रद्धावीर्यस्म्रतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम्॥पांतजलसूत्र1.20
    मनातील सर्वात शक्तिमान तत्त्व म्हणजे श्रद्धा, तीच चित्कला ! भगवंताची. आत्मस्थ स्पंदनशील प्रेमकंप बाह्यत: श्रद्धेचे प्राकट्य ठरते. सत्याच्या प्रकाशाची जीवाच्या ठिकाणचे सुप्तत्व ती सचेत करते. मूळ प्रकट करणे हा कलेचा धर्म असतो म्हणून श्रद्धा ही ब्रह्मकला आहे ! मानवी जीवनात प्रकट होणारी निसर्गदत्त रम्यस्थळी जी बीजं असतात ती कलेने अभिवृद्ध पावतात त्या मागे श्रद्धा असते. तुका म्हणे झरा। आहे मुळीचाचि खरा॥तुकाराम 2662
    श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाऽधिगच्छति॥गीता4-39 इंद्रिय संयम असणार्‍या श्रद्धावान जीवाला ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान मिळतात तो शांती वा मोक्षास प्राप्त होतो. यात संयतेन्द्रिय: ची व्याख्या करताना आदी शंकराचार्य सूक्ष्म स्थिती सांगतात- श्रद्धावत्त्वेऽपि बहिर्मुखस्य ज्ञानं न सिद्ध्यत्यतस्तद्राहित्येन भवितव्यमित्याह संयतेन्द्रिय इति। अर्थात श्रद्धावान होण्याबरोबर अंतर्मुखता असेल तरच ज्ञान मिळते. तेव्हाच भक्ताचे श्रद्धेच्या द्वारातून चैतन्याच्या गाभार्‍यात प्रवेश होऊन शिवाचा परिचय होऊन तो ज्ञानवंत होतो. म्हणून ज्ञान हे भक्तिचे बालक आहे, पवित्र श्रद्धेच्या ईश्‍वरनिष्ठास ज्ञान सुखाने वरते असे माऊली म्हणते- यालागी सुमनु आणि शुद्धमति। जो अनिंदकु अनन्य गती। पै गा गौप्यही परी तयाप्रती। चावळिजे सुखे ॥ ज्ञा.9.40. या श्रद्धेला बाळसे आणते ती संतसंगती ! होईल माझी संती भाकिली करुणा। ते त्या नारायणा मनी बैसे॥ जाणीवमनापासून उतरत उतरत ही श्रद्धा परमजाणीवेत उतरते तेव्हा ती अविनाशी ठरते. सत्य व सरलता यांचा मिलाफ म्हणजे श्रद्धा ! ही प्राप्त होण्याला संतकृपाच लागते.
    जय हरी !
अक्षरसेवक लेखक- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.

Monday, June 27, 2016

संसार सफल हो गया ! (हिंदी)

वारी के निमित्त लेख माला

संसार सफल हो गया !

ज्ञान की यात्रा द्वैत तक, भक्ति की यात्रा आगे भी चल रही है, पालकीयाँ आगे जा रही है ! अनंत तक । मन तो द्वैत ही जानता है। लहर और सागर अलग जान पडती है पर होती नही। क्या वह सागर नही है ? भक्तिसूत्र है- युक्तौ च सम्परायात् । वियोग के पहले दोनो एकही थे। जैसे जन्म के पहले मा और बच्चा एकही होते है। वैसे भेद भी उपरका ही है। जब हम नही थे तब हम कहा थे ? यह प्रश्‍न भी मजेदार है।
    अनेको जन्मोंकी खोज किसी जन्म में ‘मै कौन हूँ ?’ इस परमप्रश्‍न के गहन विश्‍लेषण करने को हमे मजबूर करा देती है। और संभावना संभव लगने लगती है। पंढरपूर को निकले वारकरी की वारी अनेक जन्मों से हो रही है। जब तक भीतर के विठ्ठल के स्मरण आ जाए। उस अज्ञात के आश्‍वासित अनंत हात आधार देते समय स्मरण भी दिलाते है की ‘अरे ! मै ही मेरे गर्भ में था ! वह गर्भ तो उसी अनंत का है ! मै तो रोज होनेवाला परमात्मा ही तो हूँ !’ वारी में नाचते समय, भजन गाते समय या एकांत में मौन में किसी विलक्षण समय यह स्मरण किमती होता है। और फिर संसार दुख़मय ऐसी व्याख्या बदल जाती है।
    यह भक्त कैसा होता है- जैसे पारधी के हाथो छुटा पंछी आकाश में अपनी स्वतंत्रता में उडने लगता है। वैसा ही भक्त अपने अनेक दुखों से मुक्त और इच्छारहित होकर संसार में रहने लगता है। अंतर्यात्रा की वारी यह उस योगी की आनंदमय यात्रा ही होती है।
    संसार यह एक व्यथा है ऐसा नही लगता पर संसार में व्यथा है ऐसे अनुभव में आ जाता है। सुख का विस्तार ही संसार है यह प्रत्यय आता है। कारण वह उस शक्ति की ही अभिव्यक्ती है- शक्तित्वान्नानृत वेद्यम्- शक्ति एक क्रिया है। इस कारण जगत मिथ्या नही है। (भक्तिसूत्र) केवल चिद्विलास है !
    यह संसार है ऐसी व्याख्या मन करता है वह केवल वस्तुनिर्देश है, अपरिच्छिन्न ऐसा परमात्मा, उसके लीलारुप जगत से भ्रांतिकाल में जीवका जो संबंध आता है उसे ही संसार कहते है। भ्रांतीयाँ समाप्त होते ही जन्ममरण का स्वइच्छासे किया हुआ आवागमन भी स्वसुखमय होता है। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ! अर्थात हे भगवन् ! आप हमे गर्भवास दे सकते हो ! ऐसे उद्गार जगद्गुरु तुकाराम महाराज जैसे संतों के मुख से सहजता से निकलते है ।
    सुख तो मेरे बाहर है ऐसी भावनाही काम है ! ऐसा देहबुद्धीवाला जीव मै कर्ता के भावबंधन में जकड जाता है।  केंद्र के परीधी में सुख खोजने जाता है। उस के लिए तो संसार सुखदु:खमय सिद्ध होता है।
    उस वारकरी को, आज संसार सफल हुआ ऐसे लगने लगता है, कारण उसने विठ्ठल को पाया, उसे अपना ही साक्षात्कार हुआ, उस चिदानंदी मग्न पुरुष की माया छुटती है, चिद्रुप विस्तार का स्वरुप भ्रांती के विलक्षण माध्यम से प्रकट होता है तब उसे ‘माया’ कहते है। माया याने ‘मेय’ अर्थात जिसे नापा जा सकता है । पर जिसे नापा नही जा सकता उसका स्मरण संतत्व देता है।
    सद्गुरु कृपासे यह स्मरण आता है अन्यथा नियती और समय इनकी सत्तातले जीव को अनिच्छा से जन्म लेना पडता है। समय ही वासना है। समय वासना की ही निर्मिती है। वासनामय जीव को मृत्यु का डर सताता है। मृत्यु समय को रोक देता है। वासना  अभी बाकी है और मृत्यु सामने खडा है। जैसे ययाती अपने पुत्रोंसे उनकी आयु माँगता है फिर भी हजार साल जी कर भी वासनांए समाप्त नही होती, वासना दुष्पुर है। उसकी पुर्तता के लिए समय, भविष्यकाल चाहिए। कल की आशा पर हर एक ययाती अपनी जीवेषणा बचा रहा है। ‘अभी’ में रहना नही आता, पर वर्तमान में रहना आ गया तो इच्छा करना संभव नही होगा। वर्तमान को भी कौन पकड सकता है ? वर्तमान ऐसे कहने मात्र से उतना समय बीत गया, भूतकाल हुआ !
    वासनातीत होना ही कालातीत होना है। जिसे सुई नही है ऐसी घडी होना !  चेतना के पास समय नही है। चेतना को वासना का स्पर्श होता है और समय की निर्मिती होती है। अस्तित्व में समय नही है, शुद्ध चेतना याने अस्तित्वमय होना। इस पृथ्वी से मनुष्य गायब हो जाए तो समय की अवधारणा ही नही रहेगी।
    भ्रमीत जीव को जगतका होनेवाला अयथार्थ ज्ञान याने संसार ! बस यह भ्रांती मिट जानी चाहिए ! ऐसा निभ्रांत योगी फिर संसार में कितनाही क्यो न रहे वह नित्यमुक्त ही कहलाता है। आईने में वस्तु का प्रतिबींब दिखता है पर वह आईना साक्षी रहता है।  वस्तु से तदाकार नही होता। ऐसी ही संकल्प और व्याख्याओं से मुक्त वारकरी की स्थिती हो जाती है।
    केवल श्रीहरीका प्रेमरुप चिंतन ही भ्रांती मिटाने की दवा है। तृष्णा ही कृष्णा बनती है फिर सारे रंग एक हुए । अब सारे रंग मै हूँ। अब सत्य और मिथ्या किसे कहूँ। अब संतोने पालकीयाँ उठायी है, अनंत की वारी कभी समाप्त हो सकती है ? फिर नाचने और उत्सव मनाने के अलावा क्या हो सकता है ?
जय हरी !
अक्षरसेवा - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.

संसार सुफळ जाला गे माये ! (मराठी)

वारी निमित्ताने लेख माला

संसार सुफळ जाला गे माये !

    ज्ञानाची यात्रा द्वैतापर्यंतच, भक्तिची यात्रा पुढे सुरुच राहते ! दिंडी चालतच राहते ! मनाला द्वैत कळते. लाट व सागर वेगवेगळे वाटतात. पण उठलेली लाट सागरच नाही का ? भक्तिसूत्र आहे- युक्तौ च सम्परायात् । वियोगाच्या आधी दोन्ही एकच आहेत. जसं जन्माच्या आधी आई व बाळ एकच असतात, तसा भेदही वरवरचा आहे. जेव्हा आपण नव्हतो तेव्हा आपण कुठे होतो हा विचार किती गंमतीचा आहे.
    अनेक जन्मांचा आपला स्वत:चा शोध कुठल्यातरी जन्मात मी कोण ? या परमप्रश्‍नाचे गहन विश्‍लेषण करायला भाग पाडतो. आणि संभावना शक्य वाटायला लागतात. वारकर्‍याची वारी अनेक जन्मांपासून चालूच आहे. आतल्या विठ्ठलाचे स्मरण येईपर्यंत. त्या अज्ञाताचे आश्‍वासित अनंत हात सांभाळताना भानही देतात की मी माझ्या गर्भात मलाच बाळगुन होतो. किंबहुना तो गर्भ त्याच अनंताचा आहे. मी रोज होत जाणारा परमात्मा आहे ! वारीत नाचता नाचता, भजन गाताना, एकांतात मौनामध्ये कुठल्यातरी क्षणाला आलेलं हे भान किंमतीचं होतं, मग संसाराला दु:खमय म्हणून करत असलेली व्याख्या बदलून जाते. एकदम पिंजर्‍यातून मोकळं सुटल्यावर पक्ष्याला व्हावं तसं वाटायला लागतं.
    संसारव्यथे फिटला। जो नैराश्ये विनटला। व्याधा हातोनि सुटला। विहंगु जैसा॥ (ज्ञा.12-181) हा भक्त कसा असतो ! पारध्याच्या हातून सुटलेला पक्षी स्वैरपणे विहरतो, तसा हा भक्त संसारातील नाना क्लेश, नैराश्य, व्याधींपासून मुक्त होतो व इच्छारहित होऊन या संसारात विहरु लागतो. म्हणून अंतरयात्रेची वारी हा योग्याचा आनंदमय प्रवासच असतो !
    इथे ‘संसारव्यथा’ म्हणजे संसार हीच व्यथा असे नसून संसारात असलेली व्यथा अशी व्याख्या करावी लागते. तेव्हा सुखाचा विस्तार म्हणजे संसार असा प्रत्यय येतो. कारण तो त्या शक्तीचीच अभिव्यक्ति नव्हे का ? शक्तित्वान्नानृत वेद्यम्- शक्ति ही क्रिया आहे, यामुळे हे जग मिथ्या नाही. (भक्तिसूत्र) केवळ चिद्विलास !
    संसार म्हणून जी व्याख्या मन करते ती केवळ वस्तुनिर्देशाने आहे. अपरिच्छिन्न असा परमात्मा, त्याच्या लीलारुप जगताशी भ्रांतिकाळांत आलेला जीवाचा संबंध म्हणजे संसार. भ्रांती मिटताच जन्ममरणाचे स्वइच्छेने केलेले आवागमनही स्वसुखच असते.  तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ! हे उद्गार तेव्हा निघतात.
    सुख हे माझ्या बाहेर आहे असं वाटणं म्हणजे काम ! असा देहबुद्धी असलेला जीव मी कर्ताच्या भावनेने जखडलेला, स्वकेंद्राबाहेर सुखाला शोधत फिरतो, त्याच्यासाठी संसार सुखदु:खमय ठरतो. जन्म विषयांची आवडी। जन्म दुराशेची बेडी। जन्म काळाची कांकडी। भक्षिताहे॥दासबोध, द.3, स.1, 9॥ असे नकारात्मक उद्गार निघु लागतात.
    ही भ्रांतीरुप स्थिती म्हणजे व्यथा ! पण चिदानंदी मग्न पुरुषाला ‘आजी संसार सुफळ झाला गे माये !’ असं वाटु लागते. कारण देखिएले पाय विठोबाचे ! विठोबाचे पाय बघणं म्हणजे स्वत:चं दर्शन होणं. पाहावे आपणासि आपण या नाव ज्ञान ! असं समर्थ म्हणतात. त्याची माया सुटते. चिद्रुप विस्ताराचे स्वरुप भ्रांतीच्या विलक्षण माध्यमातून प्रकट होते तेव्हा तीला ‘माया’ म्हणावे ! ‘माया’ अर्थात ‘मेय’ म्हणजे ज्याला मोजता येते अशी गोष्ट. पण जे फुटपट्टीत सापडत नाही त्याचं भान संतत्व देऊन जाते.
    जो भगवंताचा भक्त। तो जन्मापासून मुक्त। ज्ञानबळे विरक्त। सर्वकाळ॥(दा. दशक 3, स. 2, 52) हे भान यायला कृपाच हवी. अन्यथा नियती व काळ यांच्या सत्तेखाली जीवाला अनिच्छेने जन्म घ्यावा लागतो. काळ म्हणजेच वासना. काळ वासनेची निर्मिती आहे. वासनामय जीवाला मृत्युची भिती वाटते कारण मृत्युमुळे काळ थांबतो. वासना शिल्लक आहेत पण मृत्यु समोर आहे. ययाती आपल्या पुत्रांनाही त्यांचं आयुष्य मागतो तरी हजार वर्षात वासना संपत नाहीत. वासना पूर्तीसाठी वेळ, भविष्यकाळ पाहिजे. उद्याच्या आशेवर प्रत्येकातला ययाती जगणं चालु ठेवतो. ‘आत्ता’ आपल्याला राहता येत नाही, पण तसं झालं तर चालू क्षणात इच्छा करणं मुश्किल होतं कारण ‘आत्ता’ असा कितीसा आपल्या हाताने पकडता येतो ? तो ‘आत्ता’ म्हणेपर्यंत भूतकाळात जमा होतो.
    वासनातीत होणं म्हणजेच कालातीत होणं. काटे नसलेलं घड्याळ होणं. जाणीवेला वासनेचा स्पर्श झाला की काळ निर्माण होतो. अस्तित्वात काळ नसतो. शुद्ध जाणीव म्हणजे अस्तित्वमय होणं. पृथ्वीवरुन माणुस हरवला तर काळ संपून जाईल. संभ्रमित जीवाला जगाचे होणारे अयथार्थ ज्ञान म्हणजेच संसार. बस भ्रांती मिटायला हवी !
    असा निभ्रांत, विदेही झालेला पुरुष कितीही संसारी रमलेला दिसला तरी तो नित्यमुक्तच ठरतो. आरशात प्रतिबींबे उमटत राहावीत, परत परत नवीन उमटावीत पण आरशाला काही चिकटत नाही तशी दशा होते. विश्‍वामाजी अक्षर क्षरले साचार। त्या रुपा आधार पुससी काई॥ आपणचि विश्‍व आपणचि विश्‍वेश। जेथे द्वेषाद्वेष मावळले॥ (निवृत्ती 349) मग विश्‍व हेच विश्‍वेश, विश्‍वेश हाच विश्‍व ! द्वैताच्या व्याख्या संपल्या ! कारण त्या अक्षराचे आलेले स्मरण !
    मग संसार म्हणून काही वाटणे, जन्म मरण म्हणून केलेली स्वचेतनेची व्याख्या मावळते. अरे जे जालेचि नाही। त्याची वार्ता पुससी काई। (दास.8-3-1) केवळ श्रीहरीचे प्रेमरुप चिंतन हाच या भ्रांतीरुपाला उतारा. तृष्णा जेव्हा कृष्णा होते, भ्रांती निभ्रांतीत जाते तेव्हा अवघा रंग एक झाला ! मग सारे रंग माझेच ! आता सत्य-मिथ्या म्हणून कशाची व्याख्या करु ? संतांनी पालख्या उचलल्या, ही अनंताची वारी कधीतरी समाप्त होऊ शकते काय ? मग नाचणे व हरिपाठ गाण्याशिवाय पर्याय तो काय ? जय हरी !

वारी निमित्ताने अक्षर सेवा- दामोदर प्र. रामदासी, पुणे

Saturday, June 25, 2016

समाधी साधन संजीवन नाम ! (हिंदी)

समाधी साधन संजीवन नाम !

    समाधी साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वां भूती॥(ज्ञानेश्‍वर 400) पृथ्वी और वर्षा का सृजन उत्सव जो अनेक संभावनाओंको जनम देता है सृष्टी में हो रहा है उसी समय जीव शिव एकत्व का अभिनव आनंदोत्सव वारी (अनेक प्रांतोसे संतोंकी पालकीयाँ पंढरपूर की ओर निकलती है।) समारोह उपासक के अंतरंग और बहिर्रंग में उपसनाकी बहार लाता है। साधन और साध्यरुप संजीवन नाम परा में (उपासक के गती के अनुसार नाम परा, पश्यंती, मध्यमा और वैखरी से आता है।) स्थिर होने के कारण  उपासक को साधनाका सार मिल जाता है। उपासना की नित्यनुतन यात्रा करनेवाला उपासक सद्गुरु कॄपासे केवल शांतिब्रह्म सिद्ध ही नही हो जाता पर उस अवस्थाका प्रसाद उसे मिलता है।
 ऐसा कारुण्यमूर्ती सिद्ध समत्वके अधिष्ठान में स्थिर हो जाता है।
    ओंकाररुपी नाम यह तो गौणी भक्तिकाही दर्शन है और गौणि भक्तीकी प्रेमोपासनासे समाधीकी गहनता में उपासक उतर जाता है।  गौण्या तु समाधिसिद्धी:॥ नाम तो भगवान के साक्षात्कारकी अपेक्षा ज्यादा उपकारक और सामर्थ्यशाली है।
    ज्ञानेश्‍वरी में भगवंत आश्‍वासित करते है,‘इस संसार में भक्तों का तारनहार मैं हूँ। मेरे ओर वह सहजतासे आ सके इसलिए मैने अनंत नामों से नौकाओं को बनाया है ताकी अकेले भक्त को भवसागर पार करने में धैर्य मिले । इस कारण मैने सहस्रावधी नौकाओं को बनाया है। जड, मूढ, अपंग ऐसे मेरे भक्तों को इस नाव में बिठाकर मैं उस पार ले जा रहा हूँ।
    वेदो मे प्रकट हुए सारे महावाक्यों का उद्घोष उस ओंकारस्वरुप हरी नाम के सामने गौण ही सिद्ध होता है। ऐसी गर्जना स्वयं ज्ञानेश्‍वर करते है।- तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश। नामाचा अर्धांश नाही तेथे॥ (ज्ञानेश्‍वर 431)
    कर्मयोग-यज्ञयाग करने के लिए पुरोहित ब्राह्मण होना पडता है। उस के लिए भूमी, द्रव्य, कामनासिद्धी महत्त्वपूर्ण है, और तो और योग करने जाए तो तर्क का नर्क और चित्तभ्रष्ट होने का डर सताता है ! ज्ञानयुक्त मार्ग से चले तो साधनचतुष्टयसंपन्नता की आवश्यकता होती है और चित्त के दिनरात अखंड चलनेवाली क्रीया, मर्कटलीला छुटती नाही ऐसी हमारी अवस्था है। ऐसे में- कलियुगामाजि एक हरीनाम साचे। मुखे उच्चारीता पर्वत छेदी पापांचे॥ (1071) अर्थात कलियुग में हरी का नाम है जो पापों के ढेर, पर्वत नष्ट कर सकता है, ऐसा निश्‍चय संत एकनाथ महाराज देते है। अर्थात कलियुग तो कालसापेक्ष नहि है अपितु चित्तसापेक्ष स्थिती है।
    चिंतन आसनी शयनी। भोजनी आणि गमनागमनी। सर्वकाळ निजध्यानी। चिंतन रामकृष्णाचे॥(1153, एकनाथ) अर्थात चिंतन, आसन, शयन शय्यापर, भोजन करते समय, आते जाते सारे समय में निजध्यान में रामकृष्ण का ही चिंतन करे ऐसे संत एकनाथ महाराज बताते है। पर इस अनुसंधान में सूक्ष्मयुक्ती है।
    तस्य वाचक: प्रणव:॥ तज्जपस्तदर्थभावनम्॥ (पातंजलयोग 1.27,28) भगवान पंतजली नाम लेने की विधी समझाते हुए  उपासक को युक्ती देते है। वह ॐकार प्रणव ऐसा प्रसिद्ध है। ॐकार का जाप करो और उसपर ध्यान करो । केवल जाप करे यह बात नही कहते अपितु उसपर ध्यान लगाने केलिए कहते है।
    मनोविश्‍लेषक मन के तीन स्तर बताते है- जागृत बोध (Conscious), अर्ध-जागृत बोध (Un Conscious), अजागृत बोध (Sub Conscious) । पर चौथा स्तर जिसे परमबोध या परमजागृती (Super Conscious) कहते है उस बारे में मात्र हमारे ऋषी और संतही बताते है। सतत जागरुक या सजगतासे नाम लेने से प्रथम तीन अवस्थांओं की जानकारी उपासक को होती ही है और वह चौथे पायदान तक आ जाता है। स्वयं की जागृत स्थिती, निद्रा और स्वप्न को देखने की क्षमता उसे आ जाती है बाद में तुर्या यह चतुर्थ द्वार खुल जाता है। इस कारण जाप, ध्यान के बिना किया तो अर्धजागृती में वह पहुँच तो जाता हैे, अच्छी नींद भी आती है और वैसेही वह आगे बढता रहा, मंत्र जाप करता रहा तो अजागृत बोध में भी उतर जाता है फिर एक प्रकारकी मोहनिद्रा से वह ग्रसित हो जाएगा, पर यह तो ध्यान नही हो सकता।
    नाम का नाद इतना मधुर होता है की उस नाद में वैखरी, मध्यमा उलझ गयी है, सजग उपासक सारी संवेदनाओं के प्रती सजग है, ऐसे समय शरीर, मज्जासंस्था को वह नाद शिथील कर देता है पर उपासक को नही। वह जागृकता, वह ध्यान परमजागृती में उसे लेकर जाता है, पश्यंती में, परा में। वहा अनाहत प्रकट होता है। ध्याता, ध्येय की एकरुपता में विलक्षण संजीवन अवस्था है, परमजागृतीकी !
    अकेला उपासक नाम की नौका में उत्साहापूर्वक, ध्यानमय अर्थात सजगतासे आसनस्थ होता है तब मन के अलग अलग स्तर उस हरी नाम में रंग जाते है॥ अराजक मन, प्रक्षुब्ध चित्त, हतप्रभ प्रज्ञा एवं जडाश्रित अहंतासे चेतना अलग होने के कारण धर्मप्रकाश में वह उपासक नहा लेता है। यही उस नामधारक का सप्रेम ध्यान है। यह मधुकंपन आनंदके निरवय अवस्था की ओर, प्रासादीकता के स्तर तक जाकर सायुज्यमंदिर (सलोकता, समीपता, स्वरुपता और सायुज्यता ऐसी चारमुक्तियाँ है।) में भगवान से एक हो जाता है। सारा शरीर तटस्थ होकर भावसमाधी में निमग्न हो जाता है। फिर वैश्‍विक संवेदना प्राप्त हुआ वह उपासक अंत में गाता है की उस परब्रह्म विठ्ठल का चिंतन ही मैने किया है ।
    सावले विठ्ठल रुप दर्शन की चाह ने अष्टसात्त्विक भाव दशाप्राप्त सरल, सुशील, सद्धर्म्य, सानुरागकंपीत विरागी वारकरीकी चित्तदशा समाधीस्थ हो जाती है। वारी में नाचते, गाते समय शारीरमनोसंवेदनाओं के प्रती अतिसजग हुए अंतर्मुखी, ध्यानमय नामौपासक वारकरी शरीर से भुवैकुंठ पंढरपूर और चेतना के स्तर पर अपने भीतर का वैकुंठ सहजही पा लेता है , या ऐसे कह सकते है की भगवंतही नाम की नाव में उसे बिठाकर सहजतासे लेकर जाते है। उतरलो पार। सत्य झाला हा निर्धार॥ (तुकाराम 402) अर्थात अब भवसागर पार हो गया है और उस सत्यमय अवस्था का लाभी मैं हो गया हूँ ऐसे संत तुकाराम की तरह उपासक बोलता है। जय हरी !
----------------------------------------------------------------

वारी के निमित्त अक्षरसेवा- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.
लेखक परिचय- सद्गुरु समर्थ रामदासस्वामी के पट्टशिष्य योगीराज कल्याणस्वामी शिष्यपरंपरा में नवगणराजुरी (जिला बीड, महाराष्ट्र) मठ के महंत, भारतीय आध्यात्मिक विचार दर्शन के व्याख्याता, प्रवचनकार है। आपका स्वामी विवेकानंदजी की जीवनीपर ‘योद्धा संन्यासी’ यह सोलो प्ले प्रसिद्ध है।
अधिक जानकारी के लिए - www.humanexcellencefoundation.in
नाटक की झलक देखने के लिए देखे-
https://www.youtube.com/watch?v=FzDnzHTc11k

समाधी साधन संजीवन नाम ! (मराठी)

समाधी साधन संजीवन नाम !
 

    समाधी साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वां भूती॥(ज्ञानेश्‍वर 400) पृथ्वी व पावसाचा सृजन सोहळा जो अनेक संभावनांना जन्म देणारा सृष्टीत घडत असताना जीव शिवाच्या एकत्वाचा वारी सोहळा अंतरंगात व बहिर्रंगात उपासनेला बहार आणतो. साधन व साध्यरुप संजीवन नाम परेत स्थिरावल्यामुळे उपासकाला जाले साधनाचे फळ। संसार झाला सुफळ॥ हे समाधान प्राप्त होते. उपासनेची नित्यनुतन यात्रा करणारा उपासक सद्गुरु कृपेने शांतिब्रह्म सिद्ध होतो किंबहुना सद्गुरुच त्या भूमिकेचे पसायदान देतात. असा कारुण्यमूर्ति सिद्धसमत्वाच्या अधिष्ठानावर स्थिर होतो.
    ओंकाररुप नाम हे गौणि भक्तिचेच दर्शन होय व गौणि भक्तिच्या प्रेमा उपासनेत समाधीच्या गहनतेत उपासक उतरतो. गौण्या तु समाधिसिद्धी:॥ एकूण नाम हे भगवंत साक्षात्कारापेक्षाही जास्त उपकारक व सामर्थ्यशाली आहे.
    नामाचिया सहस्रवरी। नावा इया अवधारी। सजूनियां संसारी। तारु जाहलों॥(ज्ञानेश्‍वरी अध्याय 12, 
ओवी क्र.90)
    ‘याच संसारी मी भक्तांचा तारक होऊन राहतो व माझ्या प्रत त्यांनी सहज यावे याकरीता अनंत नामांच्या नावा मी बांधल्या. एकाकी व एकटे हा भवसागर तरुन जाण्याकरता त्यांना धैर्य यावे म्हणून मी स्वत:च माझ्या सहस्रावधी नावाच्या नावा तयार केल्या आणि मूढ, जड, अपंग अशा माझ्या सर्व भक्तांना या नावात घालून पैलपार करु लागलो.’ असे साक्षात भगवंतच ग्वाही देतात.
    वेदांत प्रकट झालेले सर्व महावाक्यांचे उद्घोषही ओंकारस्वरुप हरी नामापुढे गौणच ठरतात, अशी गर्जना ज्ञानेश्‍वरांचा साक्षेप करतो- तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश। नामाचा अर्धांश नाही तेथे॥ (ज्ञानेश्‍वर 431)
    कर्मयोग-यज्ञयागाला पुरोहित ब्राह्मण व्हावे लागते व त्यासाठीही भूमी, द्रव्य, कामनासिद्धी महत्त्वाची, बरे, योग साधण्यास जावे तर तर्काची खुंटी व चित्तभ्रष्टतेशी संयोग होण्याची भिती ! ज्ञानयुक्त मार्गावर साधनचतुष्टयसंपन्नता हवी पण चित्ताची अखंड चालणारी क्रीया, मर्कटलीला सुटत नाही अशी गत असताना- कलियुगामाजि एक हरीनाम साचे। मुखे उच्चारीता पर्वत छेदी पापांचे॥ (1071) असा निर्वाळा संत एकनाथ महाराज देतात. अर्थात कलियुग ही काळसापेक्ष नसुन चित्तसापेक्ष स्थिती आहे.
    चिंतन आसनी शयनी। भोजनी आणि गमनागमनी। सर्वकाळ निजध्यानी। चिंतन रामकृष्णाचे॥(1153, एकनाथ) असे संत एकनाथ महाराज सांगतात. पण या अनुसंधानात सूक्ष्मयुक्ती आहे.
    तस्य वाचक: प्रणव:॥ तज्जपस्तदर्थभावनम्॥ (पातंजलयोग 1.27,28) भगवान पंतजली नामविधी सांगताना उपासकाला युक्ती सांगतात की तो ॐकार प्रणव म्हणून विख्यात आहे. ॐकाराचा जप करा आणि त्यावर ध्यान करा. केवळ जप करा हे सांगत नसून जपावर ध्यान करायला सांगतात.
    नामाचा नाद आंतरबाह्य भरुन उरतो त्यावेळी मी त्या नादाला केवळ ऐकणारा आहे घेणारा नाही ही अकर्ताची भूमिका उपासनेत महत्त्वाची ठरते. नवा उपासक केवळ निरिक्षण करणारा साक्षी जर राहिला नाही तर येणारी मोहनिद्रा तो हमखास अनुभवतोच. ती निद्रा इंद्रिय मनाला शांतही करेल पण तुर्येची द्वारे ठोठावण्यास उपयोगाची नाही. नामाचा नाद झिंगुनही टाकेल पण अखंड सावधानतेशिवाय वा सजगते अभावी अशा नामाने पेंगुळलेपण येत राहते ! मन ही कुठली ठोस गोष्ट नसून सतत चालणारी प्रक्रियाच आहे.
    मनोविश्‍लेषक मनाचे स्तर सांगताना जागृत जाणीव (Conscious), अर्ध-जागृत जाणीव (Sub Conscious), अजागृत जाणीव वा नेणीव (Un Conscious) असे वर्णन करतात पण चौथा स्तर ज्याला परमजाणीव वा परमजागृती (Super Conscious) म्हणतात. त्याच्याविषयी मात्र आपले ऋषी व संतच बोलतात. सतत जागरुक वा सजगतेने नाम घेतल्यास पहिल्या तीन अवस्थांची माहिती उपासकाला होत असतानाच तो चौथ्या स्तरावर पोहोचतो. स्वत:चे जागेपण, निद्रापण व स्वप्न पाहताना मग तुर्येची दारं उघडली जातात. म्हणून केवळ जप केला गेला ध्यान न देता तर अर्धजागृतीत तो जातो, छान झोपही लागेल, तसाच मंत्र जपत राहिला तर नेणीवेतही उतरेल एक प्रकारचे झिंगलेपण येईल, मोहनिद्रा ग्रसित होईल. पण ते ध्यान नव्हे.
    नामाचा नाद इतका मधुर असतो की त्या नादात वैखरी, मध्यमा गुंतलेली आहे, उपासक सर्व संवेदनांच्या व अनुभवाप्रती सजग आहे अशावेळी शरीराला, मज्जासंस्थेला तो नाद शिथील करील पण उपासकाला नाही. ती जागृकताच, ते ध्यान परमजागृतीत घेऊन जाईल, पश्यंती, परेत. अनाहत प्रकटेल. ध्याता, ध्येयाची एकरुपताच ती अनुपमेय संजीवन अवस्था आहे, परमजागृतीची !
    सडे जे देखिले। ते ध्यानकासे लाविले। परिग्रही घातले तरियावरी॥(ज्ञा. अ. 12-91) हा क्रमश: होणारा प्रवेश माऊली सांगतात. सडे म्हणजे तो एकटा उपासक नामाच्या नावेत उत्साहापूर्वक, ध्यानमय अर्थात सजगतेने बसतो तेव्हा उपरोक्त वर्णीत मनाचे स्तर नामामुळे रंगतात व विगलीत मन, प्रक्षुब्ध चित्त, हतप्रभ प्रज्ञा व जडाश्रित अहंते पासून चेतना विलग होऊन धर्मप्रकाशात तो उपासक न्हाऊन जातो. हेच ते नामधारकाचे सप्रेम ध्यान होय. हे मधुकंपन आनंदाच्या निरवयतेकडे, प्रासादीकतेकडे नेऊन सायुज्यमंदिरात भगवंताशी अंत:संवेद्य मिलन करवते. सारे शरीर तटस्थ होऊन तो भावसमाधीत निमग्न होतो. मग वैश्‍विक संवेदना लाभलेला उपासक - काय नव्हे केले। एका चिंतीता विठ्ठले॥(तुकाराम 411) हे अनुभवाने गातो.
    ध्येयध्यान मनी उन्मनी साधनी। लाविता निशाणी ध्यानमार्गे॥ ते रुप साधन गुणागुणसंपन्न। ब्रह्म सनातन नांदे इटे॥ विठ्ठल नाम सार ऐसाचि निर्धार। मुक्तिपारावार ती अक्षरीं॥ निवृत्ती निवांत राहिला निश्‍चित। केलेसे मथीत पुंडलिकें॥ (निवृत्ती 19)
    सावळ्या परब्रह्माच्या रुप दर्शनाच्या ओढीने अष्टसात्त्विक भाव दशेमुळे सरल, सुशील, सद्धर्म्य, सानुरागकंपीत विरागी वारकर्‍याची चित्तदशा निवृत्तीनाथांचा साक्षेप प्रकट करते. वारीत नाचताना, गाताना शारीरमनोसंवेदनांच्या प्रती अतिसजग झालेला अंतर्मुखी, ध्यानमय नामौपासक वारकरी शरीराने भुवैकुंठ तर चेतनेने आंतरवैकुंठात सहजच उतरतो नव्हे नव्हे भगवंतच नामाच्या नावेतून त्याला सहज घेऊन जातात. उतरलो पार। सत्य झाला हा निर्धार॥ (तुकाराम 402) जय हरी !
-------------------------------------------------

वारी निमित्तानं अक्षरसेवा- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.
लेखक परिचय- सद्गुरु समर्थ रामदासस्वामींचे पट्टशिष्य योगीराज कल्याणस्वामी शिष्यपरंपरेत नवगणराजुरी (जिल्हा बीड, महाराष्ट्र) मठाचे महंत, भारतीय आध्यात्मिक विचार दर्शनाचे व्याख्याता, प्रवचनकार आहेत. 
यांचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील ‘योद्धा संन्यासी’ हा सोलो प्ले प्रसिद्ध आहे.
नाटकाची क्लीप बघण्यासाठी- https://www.youtube.com/watch?v=FzDnzHTc11k

Sunday, October 25, 2015

तुम सनातन धर्मीय नही हो ?
     हरयाना में दलित उत्पीडन मामला हो , गुजरात में दलितों को असुरक्षीत लगना यह घटनाए घोर संताप पैदा कर देता है। हरयाना में इतनी बेरहमी से क्या कोई अपनेही बांधवोंको मार सकता है ? राक्षसोंकी यह पुरानी पिढी समाप्त करने में हम सनातन धर्मीय आज भी पराजीत हुए है। कृष्ण, बुद्ध के वंशज कहने में हमे शरम आनी चाहिए । गोमाता को बचाने में जुटे हम क्या उन मानवों को बचाने में सहायता नही कर सकते ? क्या उनमे वही देवता हमे नजर नही आते  ? स्वामी विवेकानंदजी ने कहा की ‘ब्राह्मणो और क्षत्रियों के अत्याचार अब स्वयं उन्ही के सिरों पर चक्रवृद्धि व्याज सहित टूट पडे है और कर्मफल के अटल नियमानुसार उन्हे एक सहस्र वर्ष तक दासत्व और अध:पतन भोगना पड रहा है।’
   और अब सवर्णीय सुधरे नही तो आने वाले समय में अनेकानेक डॉ. अंबेडकर जैसे विद्वान सवर्णोंका गर्व परास्त करने के लिए जन्म लेते रहेंगे। डर तो इस बात का है खंड खंड में बटा हुआ हिंदु समाज विद्रोह के तप्त लाव्हा खंड पर बैठा अनेकानेक टुकडो में बिखर जाएगा और उसके पिछे खडा वह अभिजात ऐतिहासीक उदात्त आध्यात्मिक गौरीशंकरसा अद्वैत विचार उस के निचे राख बनकर दब जाएगा अपितु दब गया है । इसिलिए तो हमारे समाज की यह हालत है । पशुवत तमोगुण हमारा स्वभाव बन चुका है।
   इतिहास में ऐसा बार बार हुआ है लेकिन कई कृष्ण, कई बुद्ध वीरोचित आवाहन स्वीकर कर उस रणभूमी में अपने अपने तरीकेसे उस विचार को उस राख से निकालकर फिरसे उसमें अग्नि प्रज्वलित कर करोडो हृदयों मे फिरसे उसे स्थापित किया है।
    वर्तमान में प्रश्‍न यह है की उस विचार को बचाने वाले कृष्ण या बुद्ध को जन्म लेने में कई सदिया निकल जाती है। क्या हम मनुष्यप्राणीयोंके पास क्या इतना समय बचा है ? क्या अहंकार की इस लडाई में क्या मानवीय मूल्य जिवीत रह पाएंगे ? यह रक्तबीज राक्षस अनेकानेक आकारो में हमे पुकार कर अपने जैसा बना रहा है ? कृष्ण और बुद्ध मानवोंकी कोख से ही जन्म लेते है, लेकिन हमारे हरकतों से कम से कम क्या इस संभावना को हमने जिवीत रखा है की वह हमारे कोख से जन्म लें सके? उस धारणाशक्ति को क्या हमने स्वयं समाप्त नही किया है ?
    पता है हमे क्या है सनातन धर्म ? अध्यात्मिक समझ न होने के कारण कुछ पुराणवादी परंपरा, जात, संप्रदाय, वंश के नामपर हम कमअकल लोगो ने जिवित रखी हुई मुर्दा जीवन पद्धती याने हमारा सनातन धर्म बन चुका है ? मणिकर्णिका घाटपर अपने शिष्योंको साथ लेकर चलनेवाले आदी शंकर को अपने चार कुत्ते साथ लेकर चलनेवाले उस चांडाल ने जो बात समझाई वह है सनातन धर्म । अपने मार्ग में आनेवाले उस चांडाल को दूर होने के लिए जब शंकर ने कहा तब उसने जो प्रश्‍न पुछा उससे जो शंकर के चित्त में जो विद्रोह उठा उस वैराग्य का नाम सनातन धर्म है ? परंपरा को नकार कर अपने सनातन तेज से नित्यनुतन सिद्ध रह कर अंगभूत गुणोंसे चमकता रहता है वह है सनातन धर्म ! चांडाल ने पुछा, ‘अन्नमयादन्नमयं चैतन्यमेव चैतन्यात्। यतिवर दूरी कर्तुं वाञ्छसि किं बहिर्गच्छ गच्छेति ॥ प्रत्यगवस्तुनि निस्तरंग सहजानन्दावबोधाम्बुधौ। विप्रोऽयं श्‍वपचोऽयमित्यपि महान् कोऽयं विभेद-भ्रम:॥ किंगंगाम्बुनि बिम्बतेऽम्बरमणौ चाण्डाल वीथी पय: पुरै। वान्तमस्ति कांचनघटे मृत्कुम्भयोर्वाम्बरे॥‘ ‘हे यति ! अन्नमयकोश (तेरा और मेरा शरीर अन्न से ही बना है, सृष्टी बनाने में भेद नही करती) और साक्षीचैतन्य (आत्मा) तुझ मे और मुझ मे एक ही है (यही अद्वैत विचार है)। ब्राह्मण और श्‍वपच (नीच जातवाला) भेदको वहा स्थान ही नही है। सूर्य का बींब गंगा में और मदिरा पात्र में समान रुप से प्रतिबिंबीत होता है न ? क्या सूर्य में कुछ फरक होता है ? गंगा में पडा है इसलिए पवित्र और मदिरा पात्र में पडा है इसलिए अपवित्र, क्या ऐसा होता है ? आत्मतत्त्व भी वैसा ही एक जैसा ही प्रतिबींबित होता है; उस में उचनीच का भाव नही है ! यह चांडाल, यह ब्राह्मण क्या यह भेद भ्रम नही है ? बोलो आचार्य ! क्या मेरी बात सही नही है ?
    इस दिव्य भाषण को सुनकर आचार्य स्तिमित हुए। बोले,‘ ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलं चिन्मात्र विस्तारितम्। सर्वं चैतदविद्ययां त्रिगुणया शेषं मया कलितम्॥ इत्थं यस्य दृढा मति: सुखतरे नित्ये परे निर्मले। चाण्डालोऽस्तु स तु द्विजोस्तु गुरुरित्येषा मनीषा मम॥- हे चांडाल, मेरी सुन, सब ब्रह्म ही है। और सकल जग चिन्मात्राकाही विस्तार है। यह सब त्रिगुणात्मक अविद्याके कारण मैने कल्पित किया है। इस प्रकारसे जिसकी मति उस सुखैक, नित्य व निर्मल ऐसे श्रेष्ठ सद्वस्तूपर दृढ हुई है, फिर वह ब्राह्मण है या चांडाल वह साक्षात मेरे गुरुदेव ही है ऐसी मेरी दृढभावना है ! ऐसा कहकर आचार्य उस को नमस्कार करते है।
    क्या यह उदात्त विचार सनातन धर्म नही है ? अगर है तो अपने आप को सनातन धर्मीय कहने वालो इस विचार को तुने पराजित कर दिया है ! जब आग की तपन उन दलित नन्हे बालकोंको और उनके माता पिता को झोपडे में जला रहि थी उसी वक्त तेरा यह विचार भी तुने उस अग्नि में जला कर भस्म कर डाला। अब बची है तेरे पुराणवादी धर्म की पराजय की राख। अपने उन्नत अहंकारी ललाट पर अब लगाओ उस राख को ! और चलते बनो ! तुम्हारे उन मिथ्या देवताओंके पिछे ! मानवरुपी भगवान को तो तुने जला डाला ..... मुझे माफ करना तुम्हारे तथाकथित धर्म का मै भागिदार नही हूँ, विद्रोह करता हूँ मैं तुम्हारे पुराणवादी उंचनीचवाले धर्म के विरोध में क्योंकी मैं सनातन धर्मीय हूँ।
(लेखन- दामोदर प्र. रामदासी)

Sunday, October 11, 2015

🌸🌸ज्ञानेश्वरी अ. 12, ओवी क्र. 35🌸🌸
 तरी अस्तुगिरीचिया उपकंठी । रिगलिया रविबिंबापाठी । रश्मी जैसे किरीटी । संचरती गा ॥35॥
 पूर्वांचल से उदीत होनेवाला सूर्य अस्त होने के लिए पश्‍चिमांचल की ओर जा रहा है । उसकी किरने उसके पिछे पिछे जा रही है । भगवान ज्ञानेश सूर्य और किरनोंके माध्यमसे भक्त और भगवान का अद्वैत समझाना चाहते है । वेदो में किरनों को गाय की उपमा दी गई है। गोपवेषधारी श्रीकृष्ण शाम होते ही घरकी ओर चल पडते है तो गौवे भी उनके पिछे पिछे गोकुल की ओर उनका अनुगमन करती है। श्रीज्ञानेश के इस मनोहारी वर्णन से यह दृश्य आंखो के सामने सहज ही आ जाता है। भौतिक विश्‍वके रमणीय अस्ताचल के सृष्टीदर्शन ज्ञानेश प्रकट करते है। यह किरने तो चंचल गौवे ही है । वही किरनरुप गौ विष्णुरुप रवि के पिछे स्वगृही अर्थात विष्णुपद की ओर चली जा रही है। यह तो अद्वैत भक्ती की पराकाष्ठा का वर्णन है। यहा सूर्य कृष्ण याने उपास्य है, किरन गौ है याने उपासक और अस्तांगिरी वह गोलोक है । यह बात यहा स्पष्ट हो जाती है । अध्यात्म में किसी भी पथ की तब पूर्णता हो जाती है जब उपास्य-मंत्र-लक्ष्य-विधी स्पष्ट हो जाती है। किरने भक्त है, सूर्य भगवान है और प्रकाश लीलोत्सव यह त्रयी एक सूर्य मे ही अवस्थित होती है। द्वैत तो प्रतीत हो रहा है पर अखंड सामरस्य स्वयंसिद्ध है।  अद्वैतभक्तिका यह उत्सव ज्ञानेश की परंपरा में ही दिखाई देता है अन्यत्र तो द्वैतपूर्ण साधना होती है। तुज सगुण म्हणो की निर्गुण रे। सगुण निर्गुण एकु गोविंदु रे॥ सूर्य किरने स्वभावत: सूर्य से आबद्ध रहती है वैसे ही भक्तचित्त भगवंतसे आबद्ध है। यही भक्त की शरणागतता है। पै आपुलेनि भेदेविण। माझे जाणिजे जे एकपण। तयाचि नांव शरण। मज येणे गा॥ (ज्ञानेश्‍वरी 18.1398) यह शरणागतता ही कृपा है। भगवंत ही भक्तरुपसे, कभी भगवंतरुपसे, कभी शिष्य तो कभी सद्गुरुरुपसे, वही भावदशासे, साधनांग भेदपूर्णरुपसे प्रतीत होते है। यही तो अद्वैत भक्तिविलास है। यहा तो भगवान ज्ञानेश और एक रहस्योद्घाटन करते है। योगशास्त्र में नाभिस्थान का जो प्रकाश है वही पूर्व है। हृदयकमलके आगे सहस्रारतक पश्‍चिम दिशा मानी जाती है। उदयकालीन आरक्त वर्णके समान कुंडलिनी-उत्थान के समय आरक्त वर्ण प्रकाश दिखायी देता है यह योगियोंका अनुभव है। नाभिस्थानका परमाशक्ति भाव अर्थात कुंडलिनी जब ऊर्ध्वगतिक होकर पश्‍चिम की ओर निकलती है तब पश्‍चिम दिशा में अंतिम स्थान याने सहस्रार कमल की ओर जाने लगती है। ज्ञानेश के मत से पश्‍चिम का क्षितीज हृदय है। कारण यह कुंडलिनी जगदंबा-चित्कला हृदयचक्र में आते ही हमारा ‘अहं’ अस्त हो जाता है। और वहा उसका स्वरुप मारुति (मारुतितत्त्व) इस संज्ञाको प्राप्त हो जाती है। जहा मारुति वही राम होते है। भक्त इसिलिए ‘सकलहृदयरामु’ ऐसा कहते है। नाभिस्थान का प्रकाश आरक्त रंगक तो हृदयस्थानका सुवर्ण रंगका होता है। यह अनुपम वर्णन करके ज्ञानेश यह रहस्योद्घाटन करते है। और एक मजा देखो,  ज्ञानेश के सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथ कहते है, फळले भाग्य माझे......पश्‍चिमेसी चालविले आत्मस्थिती निर्धारी। पंढरपूरका विठ्ठल मंदिर पूर्वाभिमुख है। ज्ञानेश के सद्गुरु श्रीनिवृत्तीनाथ विठ्ठल दर्शन के लिए आते है। वह पूर्वके महाद्वार में खडे है। और उनके सद्गुरु उन्हे धीरेधीरे पश्‍चिम की ओर ले जाते है। और पश्‍चिम के महाद्वार के पहले ही मध्यमें पीतांबर पहने हुए और जिनके नेत्रद्वय चरनकी ओर झुके हुए है ऐसे विठ्ठल दर्शन दे जाते है। तब पश्‍चिम के महाद्वारकी ओर जाना जैसे थम जाता है। यह विठ्ठल, जो पश्‍चिम का परमात्मा है भक्त की करुणा में उसे आलिंगन देने केलिए दौड के आता है। भक्त भी तब तक गर्भगृह तक आ चुका है। भक्त को ज्यादा श्रम न हो इसलिए निर्गुण ब्रह्म सगुण विठ्ठल बन जाता है। भक्त को आलिंगन देता है। और यही पांडुरंगका राऊळ (मंदिर) है। और यही भक्त के हृदय में सगुण दर्शन है। जो विठ्ठल को मिल पाता है वही पश्‍चिम का द्वार पार कर जाता है। कारण पंढरपूर में पश्‍चिम का द्वार विठ्ठल के पिछे है। अव्यक्त तत्त्व थके हुए शरणागत (मारुतिस्थान जिसका जागृत हुआ है) भक्त के लिए दौड के आता है। आगे... जैसा सूर्य उसके किरनोंको लेकर चला जाता है वैसे ही भगवंत भक्त को लेकर चले जाते है। इस नवरात्री में उपासकोंकी यही जगदंबा - कुंडलिनी शक्ति सद्गुरु कृपासे उत्थानित हो और पश्‍चिम का अनुभव हो ऐसी ही सद्भावना व्यक्त करना समयोचित होगा । नवरात्री की शुभकामनाए ! हरि ॐ !
 (लेखन- दामोदर प्र. रामदासी) 🙏🚩