Saturday, July 2, 2016

प्रखर वैराग्य उदासीन ! (मराठी)

प्रखर वैराग्य उदासीन !
 

    शुभ हेच ज्याचं अचेतन मन असतं तो ऋषि. चेतन मन एक पट असेल तर नऊ पट मोठे अचेतन मन असते. जो मानवी मनाचा मोठा शक्तिशाली भाग आहे. अंतर्यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी उपासकाला शरीर मनाचे ज्ञान आवश्यक आहे. अचेतन मनाची ठेवण बदलल्याशिवाय पुढची प्रगती अवघड आहे.
    जन्मजन्मांतरीचे बरे वाईट संस्कार, इच्छा साठवलेले हे मन- प्रमाण (कुठल्याही विषयाचे सम्यक ज्ञान), विपर्यय (मनाची संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती या मनाच्या पाच शक्तिंचे अधिष्ठान असल्यामुळे ते जेव्हा पूर्णत: सकारात्मक (उत्साही व प्रसन्न) व ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) असते अशा वेळी जागी होणारी सम्यक ज्ञानाची शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) व नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोन्ही क्षेत्रात अडथळाविहीन यश देते. म्हणून स्वत: विषयी आदर किंबहुना सज्जन म्हणणं, उत्साही ठेवणं उपासकाला अपरिहार्य ठरतं.
    उत्साही कल्पना, सकारात्मक विचार यांची सततची पुनरावृत्ती अचेतन मनाची ठेवण बदलवून टाकते. मेंदूच्या पेशींवर होकारात्मकता कोरली जाते. व्यक्ति, विचार, भावना वा घटने कडे बघण्याची दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदलावीच लागते. मनाचा सतत वाहणारा प्रवाह, तिथे काही अशुभ आलं तर किंचीत थांबणं गरजेचं ठरतं तर व शुभं आलं तर त्यावर लगेच अंमलबजावणी करावी लागते. जसे राग आला तर आधी पाच दीर्घ श्‍वास घेतल्यास त्यावर नियंत्रण येतं. प्रेम जागं झालं तर विस्तार लगेच होऊ देणं इष्ट ठरतं.
    असे काम केल्यावर मग स्वप्नांचा ढंग बदलतो, निद्रेची गुणात्मकता वाढते, कल्पनेची भरारी उत्साहीत ठेवते. सुरुवातीच्या कठिण सरावानंतर ज्याप्रमाणे दुसरा विचार करत असतानाही ड्रायव्हर आपोआप गाडी पुढे चालवत ठेवतो. तसे उपासकाचे होते. तो उत्साहीच राहतो. अशा रितीने अचेतन सक्रिय होताच पुढची पायरी येते, अभ्यासाची !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रेची सुरुवात अशी करताच पुढची पायरी येते ती अभ्यासाची (अखंड आंतरिक सराव). गीतेमध्ये भगवंत वैराग्या आधी अभ्यासाचे महत्त्व सांगतात. अभ्यास म्हणजे स्वभावाला अनुकुल असा एखादा विधी ज्या योगे आंतरिक जगतात प्रवेश करणं सोपं जातं. अंतर्मुखता वाढते. भक्तियोगी नाम-भजनाची साथ घेईल तर एखादा निर्गुणवादी अजपा वा संवेदनांचा आधार घेईल. कोणी आसन, मुद्रा, बंध लावीन तर कोणी कर्मालाच भगवंत मानीन.
    विषयसंगातून निर्माण होणारे गुणात्मक कार्य हेच विवेकाच्या शुद्ध वा अशुद्ध रुपास कारण होते अशावेळी स्वीकारले जाणारे रजतमात्मक विषय असतील तर विवेकाचा तोलही जाऊ शकतो म्हणून भगवंत वैराग्यासोबत विवेक न सांगता आधी अभ्यासाची अर्थात यौगिक क्रियाची जोड देतात. परि वैराग्याचेनि आधारे। जरि लाविलें अभ्यासाचिए मोहरें। तरि केतुलेनि एक अवसरे। स्थिरावेल॥ज्ञा.6.419 माऊली स्पष्ट करते. माऊलींना संसार शुन्यात नेण्यापेक्षा त्याला हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभवाने जिंकावे हा वैराग्याचा परिणाम हवा आहे.
    प्रखर वैराग्य उदासीन। प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान। स्नानसंध्या भगवद्भजन। पुण्यमार्ग॥ विवेक वैराग्य ते ऐसे। नुसते वैराग्य हेकांड पिसे। शब्दज्ञान येळिलसें। आपणचि वाटे॥ (दा.12.4.18-19) प्रखर वैराग्य मग प्रत्ययाचे ज्ञान तसेच भगवद्भजनाचा पुण्यप्रताप त्याने झालेला शुद्ध विवेक व वैराग्य उपासकाला पावन करु लागते. अन्यथा दिशाहिन झालेली दशा असेच म्हणावे लागते.
    म्हणून वैराग्य परिस्थिती निर्माण करते तर अखंड सराव वा अभ्यास म्हणजे त्या परिस्थितीत वापरायचे तंत्र आहे. प्रत्येक कृती म्हणजे आपल्या इच्छाच असतात. त्यांना थांबवण्यासाठी विवेक मित्रासारखी साथ करतो. तर्काच्या आधाराने वा मनाशी सतत संवाद साधुन प्रगल्भतेचा अत्युच्च स्तर म्हणजेच अचेतन मन घडवण्याचा महतपराक्रम विवेक करतो. वैराग्यानं निर्माण केलेली एक भावजन्य परिस्थिती का वापरायची याची प्रेरणा सतत विवेक देत राहतो. विवेक म्हणजे एक गजराचं घड्याळ असतं. पुन्हा पुन्हा साद घालणारे जुने संस्कार जागे झाले की ते उपासकाला जागं करतं. ‘इच्छा न करणं’ वा संकल्पविहिनता या अवस्थेला आणणं हे विवेकाचं कार्य असतं.
    माझा आनंद आता कशावरही अवलंबून नाही अशी भावस्थिती म्हणजे वैराग्य ! प्रपंचात उपासक व्यक्तिची, घटनेची, गोष्टीची निवड करु शकतो पण त्याचा विवेक व वैराग्य त्याला आसक्त होऊ देत नाही. निवड करा पण आसक्तिमध्ये पडु नका असा टकळा रात्रंदिवस चालु असतो. एखादा विधी, अभ्यासाचा मूळ गाभा स्वकेंद्रस्थ होणं आहे. जे काही घडेल त्यानं तत्काळ प्रभावित न होता स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होऊन बघणं, मग निर्णय घेणं उचीत ठरतं. स्थिरवृतीचा चष्मा जगाचा यथार्थ आयाम दाखवतो.
    दीर्घकाळ, अखंड, अबाधीत सजगतेमुळे आपल्यात प्रतिष्ठापीत झालेली गोष्ट अभ्यास असते. ज्यात सादर सपर्मण अनुस्युत असते. मुळात सामरस्य-समसाम्य हाच अंतिम बोध असल्यामुळे संसार नष्ट करणं ही क्रिया नसुन संसार आत्मैव एतद् असा स्वसंवेद्यतेने अनुभवणे व ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हाच इत्यर्थ आहे. शेवटी बालपणीच प्रौढता व प्रौढपणी बालता असा हा वैराग्यलक्षणेचा बोध आहे.
    जय हरि !

लेखनसेवा - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे

विवेक, वैराग्य, अभ्यास ! (हिंदी)

विवेक, वैराग्य, अभ्यास !

    शुभ ही जिसका अचेतन मन है वही ऋषि है। चेतन मन एक टका तो नौ टका अचेतन मन होता है। जो मानवी मन का बडा शक्तिशाली भाग है। अंतर्यात्राको शुरुवात करने से पूर्व उपासक को शरीर-मन का ज्ञान आवश्यक है। अचेतन मन का रखरखाव बदलनेसे आगे की प्रगती आसान हो जाती है।
    जन्मजन्मांतर के बुरेभले संस्कार, इच्छांओं का भंडार यह मन- प्रमाण (किसी भी विषय का सम्यक ज्ञान), विपर्यय (मन की संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती इस पाच शक्तिंयोंका अधिष्ठान है। जब वह पूर्णत: सकारात्मक (उत्साही एवं प्रसन्न) और ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) होता है तब जगनेवाली सम्यक ज्ञान की शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) एवं नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोनो क्षेत्र में बिना रुकावट यश देती है। इस कारण सुख के लिए सम्मान की भावना, उत्साही प्रवृत्ती उपासकको बनाए रखना अपरिहार्य होता है। उत्साह की कल्पना, सकारात्मक विचार इनकी सतत पुनरावृत्ती अचेतन मन को बदल देती है। मस्तिष्क पर होकारात्मकता चिन्हांकित होती है। व्यक्ति, विचार या घटना की ओर देखनेकी दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदल देनी आवश्यक हो जाती है। मन का सतत बहनेवाला प्रवाह, वहा कुछ अशुभ आया तो किंचीत ठहरना जरुरी है तो शुभं आया तो उस पर तुरंत अंमल करना जरुरी है। जैसे क्रोध आते ही पांच दीर्घ श्‍वास लेने से नियंत्रण में आता है , वह श्‍वास क्रोधको शांत करती है। अगर प्रेम जागृत होता है तो उसका तुरंत विस्तार होने देना इष्ट होता है। ऐसे करते करते अंतर्मन की स्थिती बदलती है।
    फिर स्वप्नोंका ढंग बदलता है, निद्राकी गुणात्मकता बढती है, कल्पनाकी उडान उत्साहीत बनाती है। शुरुवाती कठिण दौर बीतने के बाद जिस तरह दुसरा विचार करते हुए भी ड्रायव्हर अपनेआप गाडी चलाते रहता है उसी तरह उपासक उत्साहीच रहता है। ऐसे अचेतन मन सक्रिय होते ही अगली पायदान पर हम पहुंच जाते है, वह है, अभ्यास !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रा की शुरुवात होते ही अभ्यास (अखंड आंतरिक सराव) शुरु हो जाता है। गीता में भगवंत वैराग्य के पहले अभ्यास का महत्त्व बतलाते है। अभ्यास याने स्वभाव को अनुकुल ऐसा एखाद विधी चुनना जिस के कारण आंतरिक जगत में प्रवेश करना आसान हो जाता है। अंतर्मुखता बढती है। भक्तियोगी नाम-भजन में नाचने लगता है तो कोई निर्गुणवादी अजपा या संवेदनाओंका आधार लेता है। कोई आसन, मुद्रा, बंध लगाता है तो कोई कर्म को ही भगवान कहता है।
    विषयसंगसे निर्माण होनेवाला गुणात्मक कार्य यही विवेक के शुद्ध या अशुद्ध रुप का कारण बनता है, उस समय स्वीकार करते रजतमात्मक विषयों के कारण विवेकका स्खलन हो सकता है। इस कारण भगवंत वैराग्य के साथ विवेक के बजाए अभ्यास अर्थात यौगिक क्रिया को बताते है। भगवान ज्ञानेश्‍वर माऊली को भी संसार शुन्य करने के बजाए उसे हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभाव से जितना यही वैराग्य का परिणाम चाहिए।
    प्रखर वैराग्य, अनुभव का ज्ञान और भगवद्भजन का पुण्यप्रताप इससे शुद्ध हुआ विवेक फिर वैराग्य, उपासक को पावन करता है ऐसे सद्गुरु रामदासस्वामी कहते है अन्यथा दिशाहिन दशा ऐसा कहना उचीत होगा।
    इस कारण वैराग्य परिस्थिती को निर्माण करता है तो अखंड अभ्यास उस परिस्थिती में उपयोग करने का तंत्र है। प्रत्येक कृती इच्छांए होती है। इच्छाओं को समाप्त करने के लिए विवेक मित्र बन जाता है। तर्कके आधारपर, मन के साथ सतत संवाद साधके प्रगल्भताका अत्युच्च स्तर याने अचेतन मन बदलनेका महतपराक्रम विवेक करता है। वैराग्यसे निर्माण हुई एक भावजन्य परिस्थिती का उपयोग कैसे करे इसकी प्रेरणा सतत विवेक देता रहता है। विवेक याने म्हणजे एक आलाराम घडी है। पुराने संस्कार जगते ही वह उपासकको जगाता है। ‘इच्छा ना करना’ या संकल्पविहिनता इस अवस्था में उपासक को लाना विवेक का कार्य है।
    मेरा आनंद अब किसी पर भी निर्भर नही है ऐसी भावस्थिती याने वैराग्य ! संसार में उपासक व्यक्ति, घटना, कोई चीज चुन सकता है पर उसका विवेक और वैराग्य उसे आसक्त नही होने देते। चुनाव करो पर आसक्त ना हो। अनासक्त बनो ! ऐसे रात दिन स्मरण कराता रहता है। कोई विधी, अभ्यास का मूल स्वकेंद्रस्थ होना है। जो कुछ हो रहा है उससे तत्काल प्रभावित न होते हुए स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होकर देखना, और फिर निर्णय लेना उचीत होता है। स्थिरवृत्तीका चष्मा जगत का यथार्थ दर्शन करवाता है।
     सादर सपर्मण के साथ निरंतर, सतत, अबाधीत सजगताके अभ्यास के कारण अपने में प्रतिष्ठीत हुई चीज ही अभ्यास है। सामरस्य-समसाम्य यही अंतिम बोध है, इस कारण संसार नष्ट करना यह क्रिया अपेक्षित नही है, संसार आत्मैव एतद् ऐसा अनुभव करना और उसे सुख पूर्वक करना ही ध्येय है। अंत में Be old, when young, that you may be young when you grow old. यही वैराग्य का बोध है।

    जय हरि ! 
लेखक - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे