Wednesday, July 13, 2016

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)
मुमुक्षे चे तीन स्तर


    आपण धावतो पुष्कळ पण पोहचत मात्र नाही. आयुष्याचा हिशेब मांडायला बसल्यावर संसाराच्या चारदोन काटक्यांशिवाय हाती काही लागत नाही. आतमध्ये खोलवर रिक्तता जाणवते आणि आयुष्याची संध्याकाळ म्हणजे पश्‍चात्ताप आणि.... भय इथले संपत नाही ही भयंकर अवस्था !
    या भवसागराच्या भोगतटावर युगानुयुगे शांतिसमाधानाची भीक मागत जीव उभा राहिला. आशा निराशेच्या द्वंद्वांची फसवणुक अव्याहतपणे भोगीत तो अभिलाषेने तिष्ठत होता ! भोगसुखाच्या ओलाव्याने अनेकदा शहारलाही, पण अंतरंगी शुष्कता अनुभवत गेला ! अनंत काळ ओसरला, पण शांतीची गुणगुण, सुखाची रुणझुण अनुभवली नाही आणि पश्‍चात्ताप वाटु लागला- जाला प्रपंची उदास। मने घेतला विषयत्रास। म्हणे आता पुरे सोस। संसारीचा॥दा. 5.8.4॥ असं कुठल्यातरी वळणावर वाटु लागतं. या भावनेनं त्याचं मन व चित्त संपृक्त होतं.
    समीपवर्ती विषयांशी तादात्म्य पावणारं, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ असं मन हे वस्तुतंत्र आहे तर कोणत्याही काळी व स्थळी भावनिष्ठेशी एकरुप होणारं, वृत्तिविशेष असं चित्त हे द्रव्यतंत्र आहे.
    अशा त्या चित्तात दुसर्‍या किनार्‍याचं आकर्षण वाटु लागतं, बद्धतेच्या शृंखला मोडून मुक्त व्हायला ते आसुसतं आणि सुरु होतो प्रवास. त्या सत्यशोधक चित्तात सुरुवातीला असलेली कुतुहुलाची भावना संदेहमय असते. पण धक्केचपेटे सोसलेलं ते बिच्चारं या अज्ञाताच्या कृष्णविवरात उतरायला तयार होतं ही त्या अनंताचीच कृपा ! ते कधी भरकटतं, जिज्ञासेपोटी प्रश्‍नही विचारत बसतं.  पण अर्थात या कुतुहुलाने का कोठे तो भगवंत भेटतो.
    अर्थात पुढे वारीचे सातत्य सुरुच राहते. पावलं चालत राहतात. उन पाऊस झेलत, तीव्र जिज्ञासा थांबु देत नाही. बौद्धिक पांडित्य अंतर्ममनाचा गाभा व्यापेलही पण तेवढ्याने भागणार नाही. जो पर्यंत तो वारकरी उपासक मस्तकाशी संबंधीत आहे तो पर्यंत विठ्ठल दूरच. पण सद्गुरुकृपेनं चालणं काही थांबत नाही. मग शेवटी परेच्या गहनतेत चेतना उतरते, विठ्ठल जीवनमरणाचा प्रश्‍न होऊन जातो. विठ्ठलाला उपासक ‘संपूर्ण’ हवा असतो. केवळ डोक्याने नाही तर हृदयासकट.
    मस्तकातून हृदयात उतरणारा तो बद्ध मुमुक्षु उपासक होतो. अनासक्त व्हायची तीव्र भावना म्हणजे मुमुक्षा ! संसारचक्रातून सुटण्याची धडपड म्हणजे मुमुक्षा ! पण यातही सुरुवातीला उपासनेमध्ये एकतृतीयांश शक्ति तो पणाला लावतो कारण जुने संस्कार मागे ओढत राहतात. काहीसं यश पदरी पडलं असं वाटतं. असा उपासक अस्वस्थ नसतो पण शांतही नसतो. संसारापासून सुटलेला पण परमार्थ न गवसलेला अशी सैराट अवस्था असते ! सत्प्रवृत्त पण निस्तेज ! काटे गळुन पडलेले आहेत पण फुलं उमलली नाहीत अशी ही चिडचिडी अवस्था मिळालेला, त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे हे जाणवतं पण तरीही काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. यांच्या सान्निध्यात, हे आपल्यावर चिडणार नाहीत पण क्षमाही करणार नाहीत. ते आपल्याला शोषून घेतील. अनेक संन्याशांबाबत हे अनुभवायला येतं. या इयत्तेतल्या तिबेटी लामाला गावात फिरकु देत नाहीत. हिमालयात हिंदु संन्यासालाही झाडाला हातही लावु देत नाहीत. कारण यांच्या स्पर्शानं झाडं मरतात. अशा लामा व संन्याशांसाठी एकांतातले वेगळे मठ असतात. एखाद्या बेटासारखे एकांडे या उपासकांची मोक्षाची इच्छा मृदु असते असं पतंजली म्हणतात. मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य व तीव्र या तीन अवस्था आहेत.
    पण त्या वारीत संत समागम त्याला प्रेरीत ठेवतो. मार्ग दाखवतो. संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) आणि         वारी पुढे चालुच राहते. मग उपासनेमध्ये दोन तृतीयांश शक्ती लावणारा मुमुक्षु उपासक थोडी भर पडल्यासारखा पर्वतशिखरासारखा शांत होतो. चंचल मनोदशा स्थिर होते. त्याच्या सान्निध्यात ती शांती आपल्यालाही वेढुन टाकते. बागेत गेल्यावर फुलांचा सुगंध येतो तसं होतं. तो वाळवंटातून हिरवळीवर आल्यासारखा असतो आणि हे अक्षरश: जाणवतं. पण निगुढ शांतीही अवगुंठनासारखीच असते. तिथे सळसळता उत्सव नसतो, चिद्विलास नसतो ! पतंजली याला मध्य मुमुक्षा म्हणतात. पण ती शांतीही आता परमानंदमय पंढरपूर इथे जवळच कुठेतरी असल्याचं द्योतक ठरते.
    पण मुमुक्षेच्या शेवटच्या स्थित्यंतरात सर्वस्व ओतले जाते. वारीच्या वाटेवरला ‘धावा’ आता तीव्र होतो. या धुंदीनं आपोआप नर्तन असलेलं कीर्तन सुरु होतं, वेडपीसं ! आत चंद्रभागा ओसंडून वाहु लागते व तो त्यात तो सुस्नात होतो. या आनंदाची चिन्ह म्हणजे भक्तिरुपी गोपीचंदनाचा टीळा आणि वैराग्यरुपी बुक्का त्याच्या भाळी लागतो. या आनंदाचं वर्णन करावं तरी कसं?
    एकादशीला एकच दशा लाभलेला भक्त विठ्ठलाच्या पूर्वेकडील महाद्वारात उभा आहे, दर्शन करुन पश्‍चिम द्वाराने त्याला बाहेर पडायचं आहे. सद्गुरु त्याला पश्‍चिम द्वाराकडे अर्थात निर्गुणतेकडे नेत आहेत. पश्‍चिमेंचे जे क्षितीज आहे ते हृदय आहे. चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्रात येताच आपला अहं असलेला स्वरुपभाव अस्ताला नेते व तिथे तिचे स्वरुप भक्तवर मारुति ‘विरलोदय भाव’ या संज्ञेला प्राप्त होते. म्हणून मारुति तत्त्व भक्तिच्या प्रदेशात महनीय आहे.
    समर्पणाचा भाव ही जिथे समर्पित होतो अशी एकच दशा म्हणजे एकादशी ! या एकादशीला ती ‘मारुती’ दशा प्राप्त होण्यासाठी महाद्वारात आता उभा असलेल्या भक्ताला पश्‍चिमद्वाराकडे जाताना मध्ये पितांबर परिधान केलेले, कटीवर हात व ज्यांचे कोमल नेत्रद्वय चरणांकडे झुकलेले आहेत, कारण तो भक्त सर्वभाव वा अगदी शेवटचा राहिलेला सूक्ष्म अहंकार, अस्मिता, वा परत परत जन्माला घालणारी बीजे, त्या पायांपाशीच समर्पित करतो, त्या भक्ताच्या सबीज समाधीचे हे कौतुक पाहणारे भगवान विठ्ठल त्याला भेटतात. तो सावळा सगुण परमात्मा भक्ताला पश्‍चिमेकडे जाण्याआधी मध्येच अडवतो आणि प्रेमाच्या गोष्टी दोघांत सुरु होतात.
    खरं तर तो पश्‍चिम द्वारीचाच निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करुन आलेल्या, थकलेल्या भक्ताला आलिंगण्यास सगुणरुपात धावत धावत येतो. तोपर्यंत भक्तही गाभार्‍यापर्यंत पोहोचलेला आहेच. त्या राउळात भक्ताला भगवंत कवटाळतो. हेच ते भगवान विठ्ठलाचे राउळ अर्थात भक्ताच्या हृदयातील सगुण दर्शन होय ! बरं या भगवंताला हे असं कवटाळल्याशिवाय पश्‍चिमद्वारांवर जाता येत नाही ! कारण ते द्वार पिछाडीला आहे.
    हे समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजी रावो। आणि ज्ञानिया तोचि॥ज्ञा.7.136॥ हा एकात्म, सोलीव सुखाचा लाभ झालेला उपासक गाऊ लागतो- सोलीव ते सुख अति सुखाहुनी। उभे ते अंगणी वैष्णवांच्या॥तुकाराम 323॥
    सद्गुरु हा सर्व सोहळा पार पडेपर्यंत तिथे असतातच.
      मग उपासक अभक्त होऊ शकत नाही असा भक्त होतो. तो भक्त म्हणजे विश्‍वाचा प्रसन्न प्रभव ! तो भक्त म्हणजे विश्‍वप्रेमाचा सजीव साक्षात्कार ! त्या राऊळात त्याची वारी सुफल संपूर्ण जाहली !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)
मुमुक्षा के तीन स्तर

    हम भाग रहे है पर कही पहुँचते नही। जीवनका हिसाब करते समय संसारके चार-दो सुख दुख की बातोंसिवाय हात क्या लगता है ? भीतर गहनता में एक रिक्तता अनुभव में आती है। जीवनका संध्या समय याने पश्‍चात्ताप लगता है और ... डर कभी समाप्त नही होता।
    इस भवसागर के भोगतटपर अनेक युगोंसे शांति-समाधान की भीक मांगता हुआ जीव खडा है। आशा और निराशा के द्वंद्व फसां रहे है, सतत फसता हुआ जीव अभिलाषासे खडा है ! भोगसुख से भिगोया हुआ जीव ना जाने कितनी बार रोमांचित नही हुआ ? पर भीतर रुखेपन को अनुभव करता है। अनंत समय गया, पर शांतीके स्वरोंकी गुनगुन, सुख की रुणझुन अनुभव में नही आयी और पश्‍चात्ताप लगने लगा। अब बस बहुत हुआ ! इस भावनासे उसका मन और चित्त भर गया।
    वर्तमान स्थिती के विषयों से तादात्म्य होनेवाला, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ ऐसा मन यह एक वस्तुतंत्र है और किसी भी समय और जगह में भाव के साथ एकरुप होनेवाला, वृत्तिविशेष ऐसा चित्त यह द्रव्यतंत्र आहे ।
    ऐसे चित्त को दुसरे किनारे का आकर्षण लगने लगता है। बद्धता की शृंखलाओं को तोडकर मुक्त होने के लिए वह तडपता है और फिर शुरु हो जाती है एक यात्रा । उस सत्यशोधक चित्त में शुरुआती कौतुहल की भावना संदेहमय होती है, पर मारापीटा गया वह बेचारा मन इस अज्ञात के कृष्णविवर में उतरने को राजी हो जाता है यह भी उस अनंत की ही कृपा है ! वह कभी भटकता है, जिज्ञासा के आहोश में अनेक प्रश्‍नही पुछता है पर केवल कौतुहल से क्या भगवंत मिलता है ?
    विठ्ठल की दिशा में उसकी वारी याने यात्रा चालु रहती है। पाँव रुकते नही। गरमी, बारीश सहन करता हुआ, तीव्र जिज्ञासु चलता रहता है। बौद्धिक पांडित्य अंतर्मन को व्याप्त करता है पर उससे क्या होगा ? जबतक वह वारकरी, उपासक मस्तक से संबंधीत है तबतक विठ्ठल दूरही है। पर सद्गुरुकृपा से चलना रुकता नहीं। अंत में गहनता में चेतना अवतीर्ण होती है। विठ्ठल जीवनमरण का प्रश्‍न बन जाता है। विठ्ठल को उपासक ‘संपूर्ण’ चाहिए। आधाअधुरा नही। केवल मस्तिष्क से नही वरन हृदय के साथ चाहिए।
    मस्तक से हृदय में उतरनेवाला बद्ध मुमुक्षु उपासक बन जाता है। अनासक्त होने की तीव्र भावना याने मुमुक्षा ! संसारचक्र से बाहर छुटनेकी छटपटाहट याने मुमुक्षा ! पर इस में भी शुरुआती दौर में वह एकतृतीयांश शक्ति ही लगाता है। क्यों की पुराने संस्कार छुटे नही छुटते, कुछ सफलता हात लगी है ऐसा लगता है। ऐसा उपासक अस्वस्थ नही होता पर शांत भी नही होता। संसार से छुटा हुआ पर अभी परमार्थ भी नही मिला है ऐसी स्थिती उसकी बनी रहती है। सत्प्रवृत्त पर निस्तेज ! काटे निकल गए पर फुल अभी खिले नही ऐसी संतप्तग्रस्त भावदशा में वह आ जाता है। उसे देखकर यह तो पता चल जाता है की थोडा कुछ तो मिला है पर यह भी पता चलता है की अभी कुछ मिलना भी बाकी है। उसके सान्निध्य में, वह चिढता नही पर क्षमा भी नही करता। ऐसा उपासक हमारी ऊर्जाका शोषण करता है। ऐसे अनेक संन्यासीयों के बारे में अनुभव में आता है। ऐसी अवस्था के तिबेटी लामा को गाव में आने नही देते। हिमालय में इस अवस्था के हिंदु संन्यासी को वृक्ष को स्पर्श नही करने देते। कारण वह वृक्ष उस स्पर्श से मर जाता है।  ऐसे लामा और संन्यासीओं के लिए एकांत में अलग मठ बनाए जाते है। समुद्र के अकेले द्वीप के समान ऐसे उपासकोंकी मोक्ष की भावना शुरुआती दौर में मृदु होती है ऐसे पतंजली कहते है।- मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य और तीव्र यह तीन अवस्थाँए है ।
    पर उस वारी में याने अंतर्यात्रा में संत समागम उसकी प्रेरणा बन जाता है। उसे मार्ग दिखाता है। संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) और वारी आगे चलती रहती है। फिर उपासना में दो तृतीयांश शक्ती लगानेवाला मुमुक्षु उपासक बाद में पर्वतशिखरों जैसा शांत होता चला जाता है। चंचल मनोदशा धीरेधीरे स्थिर होती जाती है । उसके सान्निध्य में वह अद्भुत शांती हमें भी विभोर कर देती है। जैसे बगीचे में फुलोंकी सुगंध आती है वैसे । जैसे वह रेगिस्तान से हरियाली में आया हुआ हो। और इसकी अक्षरश: प्रतीती हमे आती है। पर यह रहस्यमयी शांती भी घुँघट के समान होती है। जैसे कुछ अभी भी छुपा हुआ हो। वहा रसधार या उत्सव नही होता, चिद्विलास नही होता ! पतंजली इसे मध्य मुमुक्षा कहते है। पर वह शांती भी अब परमानंदमय पंढरपूर यही कही पास में है इसका प्रतीक होती है।
    मुमुक्षा के अंतीम अवस्था में सर्वस्व का समर्पण हो जाता है। उस यात्रा के अंतीम पडाव की दौड तीव्र गतीसे शुरु हो जाती है। इसी नशा में अपनेआप नर्तन और कीर्तन शुरु हो जाता है। किसी पागल के समान धुंद! भीतर की चंद्रभागा नदी तुफान मचा देती है। उसी में स्नान कर वह वारकरी उपासक सुस्नात हो जाता है। इस आनंद के चिन्ह याने भक्तिरुपी गोपीचंदन तिलक और वैराग्यरुपी काले रंगका टीका उसके भालप्रदेश की शोभा बन जाता है। इस आनंद का वर्णन करु तो कैसे करु?
    एकादशीको एकही दशा याने अवस्था का लाभ हुआ भक्त भगवान विठ्ठल के मंदिर के पूर्व दिशा के महाद्वार में खडा है, दर्शन करके उसे पश्‍चिम द्वार से बाहर जाना है। सद्गुरु उसे पश्‍चिम द्वार से अर्थात निर्गुण अवस्था की ओर ले जा रहे है। पश्‍चिम का क्षितीज तो हृदय है। चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्र में आते ही ‘अहं’ का भाव अस्त हो जाता है, और वहा उसका स्वरुप भक्तवर हनुमानजी ‘विरलोदय भाव’ इस संज्ञा को प्राप्त हो जाता है। इस कारण हनुमान तत्त्व भक्ति के क्षेत्र में महत्वपूर्ण है।
    समर्पण का भाव जहाँ समर्पित हाता है ऐसी एकही दशा याने एकादशी ! इस एकादशीको वह ‘हनुमान’ दशा प्राप्त होने के लिए महाद्वार में खडे उस भक्त को पश्‍चिमद्वार की ओर जाते समय बीच में पितांबर परिधान किए हुए, कटीपर हात और जिनके कोमल नेत्रद्वय चरणों की ओर झुके हुए है, कारण वह भक्त सर्वभाव या अंतिम अवस्था का बचा हुआ सूक्ष्म अहंकार याने अस्मिता, या पुन:पुन: जनम देनेवाले बीज, उन चरणों में समर्पित करता है, उस भक्त की सबीज समाधी का यह लाडदुलार देखनेवाले भगवान विठ्ठल मिल जाते है। वह सांवला सगुण परमात्मा भक्त को पश्‍चिम की ओर जाते समय बीच में ही रोकता है, और प्रेमपूर्ण संगोष्ठीयाँ दोनो में होने लगती है।
    वैसे देखा जाए तो पश्‍चिम द्वार का वह निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करके थकेमाँदे भक्त को आलिंगन देने के लिए सगुणरुप में दौडता हुआ आता है। तबतक वह भक्त भी गर्भगृहतक आ जाता है। उस मंदिर में भक्त को भगवान आलिंगन देते है यही है भगवान विठ्ठल का राउळ याने मंदिर अर्थात भक्त के हृदय में हुआ सगुण दर्शन ! और इस आलिंगन के बिना पश्‍चिमद्वार तक भक्त नही जा सकता। ! कारण वह द्वार पिछे की ओर है। सद्गुरु इस उत्सव को देखते हुए वही खडे रहते है।
      फिर वह उपासक अभक्त नही हो सकता ऐसा भक्त बन जाता है। वह भक्त याने विश्‍व की प्रसन्न अभिव्यक्ति ! वह भक्त याने विश्‍वप्रेम का सजीव साक्षात्कार ! उस मंदिर में उसकी वारी याने उपासनाकी यात्रा सुफल संपूर्ण हो गयी !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

Monday, July 4, 2016

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य (मराठी)

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य


I am a voice without form स्वामी विवेकानंदांच्या या वाक्यात एक गहन सत्य लपलेलं आहे. आश्‍वासन आहे. व्यक्तिगत चेतनेचा अंतिम अविष्कार म्हणजे ईश्‍वर. दगडही ईश्‍वर होण्याच्या मार्गावर आहेत. भारतातील अध्यात्मिक धारणा हीच आहे की ईश्‍वर निर्माण कर्ता यापेक्षा अस्तित्वाचा अंतिम कळस आहे. आपल्याकडे कळसाचही दर्शन घेतात. ते कदाचित त्याचंच प्रतिक असावं. बीजरुपातला तो ईश्‍वर कधीनाकधी उमलतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला ! या अपरोक्षानुभूतिनंतर त्या सिद्धाच्या अस्तित्वाने आसमंत दरवळतो. इतरेतर सामान्यजन जे त्या उमलत्या अस्तित्वाच्या सान्निध्यात येतात तेही सुगंधीत होतात. त्यांनाही ईश्‍वर व्हायला तो मदत करतो. असा तो सद्गुरु हा प्रकट ईश्‍वर आहे.
    गुरु तीन प्रकारचे- पहिला गुरु तो की जो विद्येची आस असणार्‍याला विद्येचे दान देतो. तो विद्यागुरु वा शिक्षक. हा केवळ ज्ञान देतो पण अस्तित्व नाही. तो मस्तकात केंद्रीभूत व्हायला शिकवतो. ‘जे जाणल्याने सर्वच जाणलं जाते ते शिकलास का ?’ पिता उद्दालक गुरुकुलातुन शिक्षण पूर्ण करुन घरी अंगणात प्रवेश करणारा आपला पुत्र श्‍वेतकेतुला हा प्रश्‍न विचारतो. तेव्हा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी परत आश्रमात आलेल्या आपल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा ऐकुन, अज्ञानाच्या एकाच नावेत बसलेले ते विद्यागुरु श्‍वेतकेतुपुढे केवळ विधीच सांगतात व आपण ते जाणत नाही आहोत ही प्रांजळ कबुली देतात. तेव्हा श्‍वेतकेतू ते जाणण्यासाठी जंगलात निघून जातो.
    ‘हि विद्या शिकुन मी काय करु ? केवळ पोटभरु असं बाह्य पदार्थ वा विषयांच्या ज्ञानापेक्षाही अधिक किंमतीचं ते मला जाणायचं आहे’ असं आपल्या मोठ्या भावाला शाळेत मी का जात नाही याचे कारण सांगणारे गदाधर वा रामकृष्ण परमहंस शैक्षणिक विद्येपेक्षा अधिक महनीय असं काही आहे हे जाणत असतात.
    विद्यार्थी हा माहितीच्या शोधात असतो तर शिष्य रुपांतरणाच्या !
    अधिक किंमतीचं, जे जाणल्यानं सगळंच जाणलं जातं ते शिकणं अधिक महत्त्वाचं आहे किंबहुना आयुष्याचं सार आहे आणि ते शिकवण्याची जबाबदारी घेतात ते सद्गुरु जे देह धारण करुन असतात.
    ‘होय ! मी त्याला पाहिलं आहे. जसं मी तुला बघतो अगदी तसंच. किंबहुना याही पेक्षा सुस्पष्टपणे. काय तुला त्याला बघायचंय ?’ असा आत्मविश्‍वास पूर्वक म्हणणारा साधु नरेंद्राने यापूर्वी कधीच बघितला नव्हता. आणि हा आत्मविश्‍वास सार्थ करणारा स्पर्श त्याला त्या गुरुकडुन मिळाला आणि आयुष्य बदललं. तो स्रोतापन्न झाला ! निर्विकल्प समाधी नंतर नरेंद्रनाथ हेच म्हणाले की ‘त्यांनी मला दाखवलं ! मी माझाच चेहरा बघितला !’ पुढे तोही पुढे त्याच सद्गुरुंच्या अढळस्थानी कारुण्यानं बसलाही. ते सद्गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस व तो नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद.
    आम्हाला तुम्ही काही शिकवाल का ? असं एकानं रमण महर्षींना विचारलं तर ते म्हणाले, नाही ! मी शिकलेलं विसरायला लावतो ! असे सद्गुरु त्या बालकवत समर्पित शिष्याला त्याचं भान द्यायला उत्सुक असतात. त्यानं गोळा केलेला कचरा साफ करतात. त्याला त्याचाच चेहरा दाखवतात. असे सद्गुरु अस्तित्व देतात ज्ञान नाही. ते विकेंद्रित शिष्याला केंद्राकडे नेतात. ते मस्तकातून उपटून काढतात. दुसरीकडे पुनररोपण करतात. कदाचित ते सुरुवातीला पीडादायक असतं, ते उपटणं, पानं गळणं, मातीत मुळांचा जम बसणं सारं वेदनादायी, प्रसुती वेदने सारखं पण तो शिष्य वटवृक्ष होतो. त्याचा नवीन जन्म झाला कि तो द्वीज होतो. ब्राह्मण होतो! सॉक्रेटीस म्हणायचे मी सुईण आहे. आणि ते खरं आहे कारण सद्गुरु अहम च्या मृत्यु नंतर अस्तित्वाचे भान देणार्‍या नवीन जन्माच्या प्रसुतीत मदत करतात.
    परीस आपणाऐसें करीना। सुवर्णें लोहो पालटेना।उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरुचा॥दा.1-4-15॥ परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने लोखंडाला सोनं बनवत नाही पण सद्गुरु कृपा झालेला उपासक मात्र अनेकांचा उद्धारकर्ता होतो.
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात काळाच्या पलिकडे असल्यामुळे तो गुरुंचा गुरु आहे, परमसद्गुरु आहे. सद्गुरु जेव्हा देह त्यागतात तेव्हा काळाच्या पल्याडचं अस्तित्व होतात तेव्हा ते परमसद्गुरु होतात. ओंकारस्वरुप ! यातही काही जण परत परत जगाच्या कल्याणासाठी येतात तर काही कधीच येत नाहीत. त्यांचं महापरिनिर्वाण होतं. दिवा परत लावण्याची शक्यताच मावळते. जसे कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद इ. परत परत येत आहेत. ‘मी दोनशे वर्षांनी परत येणार आहे !’ असे रामकृष्ण नरेंद्रनाथांना म्हणाले होते.
    देहात असताना सद्गुरु जीवनमुक्त असतात, जागृत असतात, काळाच्या अभावाचा बोधही असतो. पण देहाला मर्यादा असतात निसर्गाच्या. भुक, तहान, झोप इ. एक जैवीक घड्याळ चालु असतं. पण एकदा देह त्यागानंतर मात्र परमसद्गुरुला या मर्यादा राहत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या देहत्यागानंतर मां शारदा हातातील कंगण जे सौभाग्याचं लेणं ते काढायला जाते आणि रामकृष्ण सशरीर प्रकट होऊन मी केवळ देह त्यागला आहे, तू कंगण कधी कढु नकोस ! असं तीला सांगतात.
    I am a voice without form असं जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हा ‘मी या परमसद्गुरु रुपात आहे’, हे आपणास सांगत आहेत. त्यांनी अनेक जन्म आपल्यासाठी घेतलेले आहेत. मग अशावेळी आपण कुठल्या जन्माची पुण्यतिथी वा जन्मदिन साजरा करायचा ? कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते तुला नाही पण मला माहित आहे. मी जन्मरहित व अविनाशी असुनही सर्व प्राण्यांचा ईश्‍वर (परमसद्गुरु) असुनही प्रकृतीला स्वाधीन करुन आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
    योगी अरविंद स्वत: सांगतात,‘अलिपुरच्या तुरुंगात योगाभ्यास करताना वेळोवेळी स्वामी विवेकानंद मला मार्गदर्शन करायचे.’ ते परमसद्गुरु योग्य व समर्पित उपासकाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जरी त्यांनी शरीराचा त्याग केलेला असला तरीही.
    तिबेटमध्ये कैलासपर्वतापाशी अशी एक जागा आहे जिथे वैशाखि पौर्णिमेला म्हणजे बुद्ध निर्वाणाच्या दिवशी पाचशे बौद्ध सद्गुरु एकत्र येतात व त्यांना मार्गदर्शनासाठी साक्षात बुद्ध प्रकट होतात. साधनाकाळात स्वामी विवेकानंदांनाही बुद्धांनी दर्शन दिलेले होते.         
    सद्गुरु काळ व अवकाश यात वावरत असतात, त्यांचे अशा प्रकारे परमसद्गुरुशी संवादही चालु असतो. कुठल्यातरी जन्मात ज्याला सद्गुरु मिळाले त्या उपासकाला जरी समाधी लाभली नाही, त्याने देह सोडून परत जन्म घेतला तरी त्याला प्रत्येक जन्मात सूक्ष्म मार्गदर्शन मिळत राहते. त्याला माहिती नसले तरीही. शेवटी एवढंच म्हणवासं वाटतं- म्हणौनि सद्गुरु वर्णवेना। हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती॥दा.1.4.31॥
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य (हिंदी)

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य


I am a Voice Without Form स्वामी विवेकानंद के इस वाक्य में एक गहन सत्यता है। आश्‍वासन है। व्यक्तिगत चेतनाका अंतिम अविष्कार याने ईश्‍वर। एक पत्थरभी ईश्‍वरत्व की राह पर है। भारत की आध्यात्मिक धारणा यही है की ईश्‍वर निर्माण कर्ता से ज्यादा इस अस्तित्व का आखिरी कलश है। मंदिर शिखर है! शायद इसी कराणसे मंदिर के शिखर दर्शन हम करते है ! बीजरुप वह ईश्‍वर कभी ना कभी खिलता है। मोगरे का फुल खिलता है ! इस अपरोक्षानुभूति के बाद उस सिद्ध के अस्तित्व की सुगंध फैलती है। इतरेतर सामान्यजन जो उस खिले हुए अस्तित्व के सान्निध्य में आतेही वह भी सुगंधीत हो जाते है। उस सामान्य जनको भी ईश्‍वर होने के लिए वह मदत करता है। ऐसा वह सद्गुरु तो प्रकट ईश्‍वर है।
    गुरु तीन प्रकार के है- पहला गुरु वह है जो विद्याकी आस जिसे है उसे विद्याका दान देता है। वह है विद्यागुरु या शिक्षक । वह तो केवल ज्ञान देता है पर अस्तित्व नही। वह तो मस्तिष्क में केंद्रीभूत होने को कहता है।
    ‘जो जानने से सब जाना जाता है क्या तुने वह सिखा है ? पिता उद्दालक गुरुकुल से शिक्षा लेकर घर वापस आनेवाले अपने पुत्र श्‍वेतकेतु को यह प्रश्‍न पुछता है। तब उसका उत्तर पाने के लिए फिरसे आश्रम आए अपने विद्यार्थी की जिज्ञासा सुनकर अज्ञान की एकही नाव में बैठे हुए वे विद्यागुरु श्‍वेतकेतु को केवल विधी बताते है। और मै वह नही जानता ऐसा प्रामाणिकतासे कहते भी है। और उसे जानने के लिए श्‍वेतकेतू जंगल में चला जाता है।
    ‘यह विद्या पढकर मै क्या करु? केवल पेट भरना सिखानेवाले इस ज्ञान से भी अधिक किंमती जो है वह मै जानना चाहता हूँ !’ ऐसा अपने बडे भाईसे, मै शाला क्यूँ नहि जाना चाहता इसका कारण बताने वाले गदाधर या रामकृष्ण परमहंस संसारी विद्याकी अपेक्षा अधिक महनीय ऐसा कुछ है यह जानते थे।
    विद्यार्थी ज्ञान की खोज करता है पर शिष्य रुपांतरण की !
    अधिक किंमती, जो जानने से सब जाना जाता है, वह सिखना ज्यादा महत्त्वपूर्ण है। वह सिखाने की जबाबदारी जो लेते है वह सद्गुरु है जो देह धारण किए हुए होते है।
    ‘हां ! मैने उसे देखा है ! जैसे मै तुझे देख रहा हूँ बिल्कुल वैसे ही ! फर्क इतना है की इससे भी ज्यादा सुस्पष्ट रुपसे! क्या तू उसे देखना चाहता है ?’ ऐसा आत्मविश्‍वासपूर्वक कहने वाला साधु नरेंद्रने इससे पूर्व कभी देखा नही था। और यह आत्मविश्‍वास सार्थ करानेवाला स्पर्श उसे उस गुरुने दिया था। जिससे उसका जीवन बदल गया। वह तो स्रोतापन्न हुआ ! निर्विकल्प समाधी के बाद नरेंद्रनाथ ने कहा की ‘उन्होने मुझे दिखलाया ! मैने मेरा ही चेहरा देखा।’ आगे वह भी उस सद्गुरुके स्थान पर कारुण्यभाव से बैठ गया। वह सद्गुरु थे रामकृष्ण परमहंस और वह शिष्य थे नरेंद्रनाथ याने स्वामी विवेकानंद।
    क्या आप हमे कुछ सिखा सकते है ? ऐसा एकने रमण महर्षी को पुछा तो उन्होने कहा, नहि ! मै तो जो सिखाया गया है उसे भुलाने को बताता हूँ। ऐसे सद्गुरु उस बालकवत समर्पित शिष्य को आत्मभान देने के लिए उत्सुक रहते है। उसने जमाया हुआ कुडा कचरा साफ करते है। उसे उसका ही चेहरा दिखाते है।
    ऐसे सद्गुरु अस्तित्व देते है ज्ञान नही। वह विकेंद्रित शिष्य को केंद्र की ओर ले जाते है। वे मस्तिष्क से जानकारी जडमूलसे उखाड फेकतें है। शिष्यके उस पौधे को कही और जगह पुनररोपीत करते है। कदाचित यह काम शुरु में बहुत पीडादायी होता है। वह उखाडना, रोपना, पत्तों का गिरना, मिट्टी में जडों का फिरसे जमना, यह सारा खेल प्रसव वेदनाओं जैसा होता है। फिर वह शिष्य बरगद की पेड जैसा फैलता है, उसका नया जनम होता है, वह द्वीज होता है।
    सॉक्रेटीस कहते थे मै तो दाई जैसा हूँ, और यह बात एकदम सही है, कारण सद्गुरु अहम की मृत्यु के बाद अस्तित्वका होश देनेवाले प्रसव काल में मदत करते है।
    पारस पत्थर लोहे को सोना बनाता है पर सोना लोहे को सोना नहि बनाता, पर सद्गुरु स्पर्श हुआ उपासक मात्र अनेक लोगोंका उद्धारकर्ता बन जाता है।
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात कालातीत होने के कारण वह गुरुका गुरु परमसद्गुरु है। सद्गुरु जब देह त्याग करते है तब उनका कालातीत अस्तित्व होता है। तब वे परमसद्गुरु होते है, ओंकारस्वरुप !  इस में भी कुछ कुछ फिरसे जगत के कल्याण के लिए आते है पर कुछ तो कभी नहि आते। उनका महापरिनिर्वाण होता है। दिया सदा के लिए बुझ जाता है। कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद आदी फिरसे आते है । ‘मै दोसौ वर्ष बाद फिरसे आनेवाला हूँ !’ ऐसा रामकृष्ण ने नरेंद्रनाथ को कहा था ।
    देह में रहते हुए सद्गुरु जीवनमुक्त होते है, जागृत होते है, समय के अभाव का बोध रहता है। पर देह को मर्यादा होती है प्रकृती की भुक, प्यास, निद्रा आदी एक जैवीक घडी चलती रहती है। पर देह त्याग के बाद परमसद्गुरु अमर्याद रहते है। रामकृष्ण परमहंस के देहत्याग के बाद मां शारदा सौभाग्य अलंकार जो हात का कंगण निकाल रहि थी तब रामकृष्ण सशरीर प्रकट हुए कहने लगे,‘मैने तो केवल देह त्यागदी है। कंगन निकालने की आवश्यकता नहि है।’
    I am a Voice Without Form ऐसा जब स्वामी विवेकानंद कहते है तब ‘मै इस परमसद्गुरु के रुप में हूँ’, यही कह रहे है। वह तो अनेको बार हमारे लिए आए हुए है। ऐसी स्थिती में हम उनका जन्मदिवस या मृत्युतिथी कैसे मना सकते है ? किस जन्म की तिथी मनाएंगे ?
    कृष्ण अर्जुन को यहि बात समझा रहे है- बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुन ! मेरे और तेरे बहुत जन्म हुए है। तुझे नहि पर मुझे वह पता है। मै तो जन्मरहित और अविनाशी होकर भी सब प्राणीयोंका ईश्‍वर (परमसद्गुरु) हूँ। प्रकृती के स्वाधीन होकर अपने आपको अपनी योगमायासे प्रकट करता हूँ।
    योगी अरविंद स्वत: कहते है,‘अलिपुरके कारागृह में योगाभ्यास करते समय स्वामी विवेकानंद मुझे मार्गदर्शन करते थे।’ उन्होने उनके शरीरका त्याग किया हुआ है, फिर भी वे परमसद्गुरु योग्य और समर्पित उपासकको समय समय पर मार्गदर्शन करते रहते है।
    तिबेट में कैलाश पर्वत के पास एक ऐसी जगह है जहा पर हर साल वैशाखि पुर्णिमा पर याने जब बुद्ध निर्वाण को उपलब्ध हुए थे उस विशिष्ट समय पर पाचसौ बौद्ध सद्गुरु एकत्र आते है और उन्हे  मार्गदर्शन करने के लिए साक्षात बुद्ध प्रकट होते है।         साधनाकाल में स्वामी विवेकानंद को भी बुद्ध ने दर्शन दिए थे। सद्गुरु जब समय और अवकाश में विहार करते है तब भी उनका अदृश्य परमसद्गुरु के साथ संवाद चालु ही रहता है।
    किसी जनम में जिसे सद्गुरु मिले है उस उपासक को अगर समाधी लाभ नहि हुआ है और उसने देह छोड दी, फिरसे जन्म लिया तब भी उसे प्रत्येक जन्म में सूक्ष्म मार्गदर्शन मिलता रहता है। उसे पता हो या नहि हो। ऐसे सद्गुरु और परमसद्गुरु कि महत्ता का वर्णन करना मुझे संभव नहि है।
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे

Saturday, July 2, 2016

प्रखर वैराग्य उदासीन ! (मराठी)

प्रखर वैराग्य उदासीन !
 

    शुभ हेच ज्याचं अचेतन मन असतं तो ऋषि. चेतन मन एक पट असेल तर नऊ पट मोठे अचेतन मन असते. जो मानवी मनाचा मोठा शक्तिशाली भाग आहे. अंतर्यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी उपासकाला शरीर मनाचे ज्ञान आवश्यक आहे. अचेतन मनाची ठेवण बदलल्याशिवाय पुढची प्रगती अवघड आहे.
    जन्मजन्मांतरीचे बरे वाईट संस्कार, इच्छा साठवलेले हे मन- प्रमाण (कुठल्याही विषयाचे सम्यक ज्ञान), विपर्यय (मनाची संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती या मनाच्या पाच शक्तिंचे अधिष्ठान असल्यामुळे ते जेव्हा पूर्णत: सकारात्मक (उत्साही व प्रसन्न) व ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) असते अशा वेळी जागी होणारी सम्यक ज्ञानाची शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) व नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोन्ही क्षेत्रात अडथळाविहीन यश देते. म्हणून स्वत: विषयी आदर किंबहुना सज्जन म्हणणं, उत्साही ठेवणं उपासकाला अपरिहार्य ठरतं.
    उत्साही कल्पना, सकारात्मक विचार यांची सततची पुनरावृत्ती अचेतन मनाची ठेवण बदलवून टाकते. मेंदूच्या पेशींवर होकारात्मकता कोरली जाते. व्यक्ति, विचार, भावना वा घटने कडे बघण्याची दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदलावीच लागते. मनाचा सतत वाहणारा प्रवाह, तिथे काही अशुभ आलं तर किंचीत थांबणं गरजेचं ठरतं तर व शुभं आलं तर त्यावर लगेच अंमलबजावणी करावी लागते. जसे राग आला तर आधी पाच दीर्घ श्‍वास घेतल्यास त्यावर नियंत्रण येतं. प्रेम जागं झालं तर विस्तार लगेच होऊ देणं इष्ट ठरतं.
    असे काम केल्यावर मग स्वप्नांचा ढंग बदलतो, निद्रेची गुणात्मकता वाढते, कल्पनेची भरारी उत्साहीत ठेवते. सुरुवातीच्या कठिण सरावानंतर ज्याप्रमाणे दुसरा विचार करत असतानाही ड्रायव्हर आपोआप गाडी पुढे चालवत ठेवतो. तसे उपासकाचे होते. तो उत्साहीच राहतो. अशा रितीने अचेतन सक्रिय होताच पुढची पायरी येते, अभ्यासाची !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रेची सुरुवात अशी करताच पुढची पायरी येते ती अभ्यासाची (अखंड आंतरिक सराव). गीतेमध्ये भगवंत वैराग्या आधी अभ्यासाचे महत्त्व सांगतात. अभ्यास म्हणजे स्वभावाला अनुकुल असा एखादा विधी ज्या योगे आंतरिक जगतात प्रवेश करणं सोपं जातं. अंतर्मुखता वाढते. भक्तियोगी नाम-भजनाची साथ घेईल तर एखादा निर्गुणवादी अजपा वा संवेदनांचा आधार घेईल. कोणी आसन, मुद्रा, बंध लावीन तर कोणी कर्मालाच भगवंत मानीन.
    विषयसंगातून निर्माण होणारे गुणात्मक कार्य हेच विवेकाच्या शुद्ध वा अशुद्ध रुपास कारण होते अशावेळी स्वीकारले जाणारे रजतमात्मक विषय असतील तर विवेकाचा तोलही जाऊ शकतो म्हणून भगवंत वैराग्यासोबत विवेक न सांगता आधी अभ्यासाची अर्थात यौगिक क्रियाची जोड देतात. परि वैराग्याचेनि आधारे। जरि लाविलें अभ्यासाचिए मोहरें। तरि केतुलेनि एक अवसरे। स्थिरावेल॥ज्ञा.6.419 माऊली स्पष्ट करते. माऊलींना संसार शुन्यात नेण्यापेक्षा त्याला हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभवाने जिंकावे हा वैराग्याचा परिणाम हवा आहे.
    प्रखर वैराग्य उदासीन। प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान। स्नानसंध्या भगवद्भजन। पुण्यमार्ग॥ विवेक वैराग्य ते ऐसे। नुसते वैराग्य हेकांड पिसे। शब्दज्ञान येळिलसें। आपणचि वाटे॥ (दा.12.4.18-19) प्रखर वैराग्य मग प्रत्ययाचे ज्ञान तसेच भगवद्भजनाचा पुण्यप्रताप त्याने झालेला शुद्ध विवेक व वैराग्य उपासकाला पावन करु लागते. अन्यथा दिशाहिन झालेली दशा असेच म्हणावे लागते.
    म्हणून वैराग्य परिस्थिती निर्माण करते तर अखंड सराव वा अभ्यास म्हणजे त्या परिस्थितीत वापरायचे तंत्र आहे. प्रत्येक कृती म्हणजे आपल्या इच्छाच असतात. त्यांना थांबवण्यासाठी विवेक मित्रासारखी साथ करतो. तर्काच्या आधाराने वा मनाशी सतत संवाद साधुन प्रगल्भतेचा अत्युच्च स्तर म्हणजेच अचेतन मन घडवण्याचा महतपराक्रम विवेक करतो. वैराग्यानं निर्माण केलेली एक भावजन्य परिस्थिती का वापरायची याची प्रेरणा सतत विवेक देत राहतो. विवेक म्हणजे एक गजराचं घड्याळ असतं. पुन्हा पुन्हा साद घालणारे जुने संस्कार जागे झाले की ते उपासकाला जागं करतं. ‘इच्छा न करणं’ वा संकल्पविहिनता या अवस्थेला आणणं हे विवेकाचं कार्य असतं.
    माझा आनंद आता कशावरही अवलंबून नाही अशी भावस्थिती म्हणजे वैराग्य ! प्रपंचात उपासक व्यक्तिची, घटनेची, गोष्टीची निवड करु शकतो पण त्याचा विवेक व वैराग्य त्याला आसक्त होऊ देत नाही. निवड करा पण आसक्तिमध्ये पडु नका असा टकळा रात्रंदिवस चालु असतो. एखादा विधी, अभ्यासाचा मूळ गाभा स्वकेंद्रस्थ होणं आहे. जे काही घडेल त्यानं तत्काळ प्रभावित न होता स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होऊन बघणं, मग निर्णय घेणं उचीत ठरतं. स्थिरवृतीचा चष्मा जगाचा यथार्थ आयाम दाखवतो.
    दीर्घकाळ, अखंड, अबाधीत सजगतेमुळे आपल्यात प्रतिष्ठापीत झालेली गोष्ट अभ्यास असते. ज्यात सादर सपर्मण अनुस्युत असते. मुळात सामरस्य-समसाम्य हाच अंतिम बोध असल्यामुळे संसार नष्ट करणं ही क्रिया नसुन संसार आत्मैव एतद् असा स्वसंवेद्यतेने अनुभवणे व ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हाच इत्यर्थ आहे. शेवटी बालपणीच प्रौढता व प्रौढपणी बालता असा हा वैराग्यलक्षणेचा बोध आहे.
    जय हरि !

लेखनसेवा - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे

विवेक, वैराग्य, अभ्यास ! (हिंदी)

विवेक, वैराग्य, अभ्यास !

    शुभ ही जिसका अचेतन मन है वही ऋषि है। चेतन मन एक टका तो नौ टका अचेतन मन होता है। जो मानवी मन का बडा शक्तिशाली भाग है। अंतर्यात्राको शुरुवात करने से पूर्व उपासक को शरीर-मन का ज्ञान आवश्यक है। अचेतन मन का रखरखाव बदलनेसे आगे की प्रगती आसान हो जाती है।
    जन्मजन्मांतर के बुरेभले संस्कार, इच्छांओं का भंडार यह मन- प्रमाण (किसी भी विषय का सम्यक ज्ञान), विपर्यय (मन की संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती इस पाच शक्तिंयोंका अधिष्ठान है। जब वह पूर्णत: सकारात्मक (उत्साही एवं प्रसन्न) और ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) होता है तब जगनेवाली सम्यक ज्ञान की शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) एवं नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोनो क्षेत्र में बिना रुकावट यश देती है। इस कारण सुख के लिए सम्मान की भावना, उत्साही प्रवृत्ती उपासकको बनाए रखना अपरिहार्य होता है। उत्साह की कल्पना, सकारात्मक विचार इनकी सतत पुनरावृत्ती अचेतन मन को बदल देती है। मस्तिष्क पर होकारात्मकता चिन्हांकित होती है। व्यक्ति, विचार या घटना की ओर देखनेकी दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदल देनी आवश्यक हो जाती है। मन का सतत बहनेवाला प्रवाह, वहा कुछ अशुभ आया तो किंचीत ठहरना जरुरी है तो शुभं आया तो उस पर तुरंत अंमल करना जरुरी है। जैसे क्रोध आते ही पांच दीर्घ श्‍वास लेने से नियंत्रण में आता है , वह श्‍वास क्रोधको शांत करती है। अगर प्रेम जागृत होता है तो उसका तुरंत विस्तार होने देना इष्ट होता है। ऐसे करते करते अंतर्मन की स्थिती बदलती है।
    फिर स्वप्नोंका ढंग बदलता है, निद्राकी गुणात्मकता बढती है, कल्पनाकी उडान उत्साहीत बनाती है। शुरुवाती कठिण दौर बीतने के बाद जिस तरह दुसरा विचार करते हुए भी ड्रायव्हर अपनेआप गाडी चलाते रहता है उसी तरह उपासक उत्साहीच रहता है। ऐसे अचेतन मन सक्रिय होते ही अगली पायदान पर हम पहुंच जाते है, वह है, अभ्यास !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रा की शुरुवात होते ही अभ्यास (अखंड आंतरिक सराव) शुरु हो जाता है। गीता में भगवंत वैराग्य के पहले अभ्यास का महत्त्व बतलाते है। अभ्यास याने स्वभाव को अनुकुल ऐसा एखाद विधी चुनना जिस के कारण आंतरिक जगत में प्रवेश करना आसान हो जाता है। अंतर्मुखता बढती है। भक्तियोगी नाम-भजन में नाचने लगता है तो कोई निर्गुणवादी अजपा या संवेदनाओंका आधार लेता है। कोई आसन, मुद्रा, बंध लगाता है तो कोई कर्म को ही भगवान कहता है।
    विषयसंगसे निर्माण होनेवाला गुणात्मक कार्य यही विवेक के शुद्ध या अशुद्ध रुप का कारण बनता है, उस समय स्वीकार करते रजतमात्मक विषयों के कारण विवेकका स्खलन हो सकता है। इस कारण भगवंत वैराग्य के साथ विवेक के बजाए अभ्यास अर्थात यौगिक क्रिया को बताते है। भगवान ज्ञानेश्‍वर माऊली को भी संसार शुन्य करने के बजाए उसे हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभाव से जितना यही वैराग्य का परिणाम चाहिए।
    प्रखर वैराग्य, अनुभव का ज्ञान और भगवद्भजन का पुण्यप्रताप इससे शुद्ध हुआ विवेक फिर वैराग्य, उपासक को पावन करता है ऐसे सद्गुरु रामदासस्वामी कहते है अन्यथा दिशाहिन दशा ऐसा कहना उचीत होगा।
    इस कारण वैराग्य परिस्थिती को निर्माण करता है तो अखंड अभ्यास उस परिस्थिती में उपयोग करने का तंत्र है। प्रत्येक कृती इच्छांए होती है। इच्छाओं को समाप्त करने के लिए विवेक मित्र बन जाता है। तर्कके आधारपर, मन के साथ सतत संवाद साधके प्रगल्भताका अत्युच्च स्तर याने अचेतन मन बदलनेका महतपराक्रम विवेक करता है। वैराग्यसे निर्माण हुई एक भावजन्य परिस्थिती का उपयोग कैसे करे इसकी प्रेरणा सतत विवेक देता रहता है। विवेक याने म्हणजे एक आलाराम घडी है। पुराने संस्कार जगते ही वह उपासकको जगाता है। ‘इच्छा ना करना’ या संकल्पविहिनता इस अवस्था में उपासक को लाना विवेक का कार्य है।
    मेरा आनंद अब किसी पर भी निर्भर नही है ऐसी भावस्थिती याने वैराग्य ! संसार में उपासक व्यक्ति, घटना, कोई चीज चुन सकता है पर उसका विवेक और वैराग्य उसे आसक्त नही होने देते। चुनाव करो पर आसक्त ना हो। अनासक्त बनो ! ऐसे रात दिन स्मरण कराता रहता है। कोई विधी, अभ्यास का मूल स्वकेंद्रस्थ होना है। जो कुछ हो रहा है उससे तत्काल प्रभावित न होते हुए स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होकर देखना, और फिर निर्णय लेना उचीत होता है। स्थिरवृत्तीका चष्मा जगत का यथार्थ दर्शन करवाता है।
     सादर सपर्मण के साथ निरंतर, सतत, अबाधीत सजगताके अभ्यास के कारण अपने में प्रतिष्ठीत हुई चीज ही अभ्यास है। सामरस्य-समसाम्य यही अंतिम बोध है, इस कारण संसार नष्ट करना यह क्रिया अपेक्षित नही है, संसार आत्मैव एतद् ऐसा अनुभव करना और उसे सुख पूर्वक करना ही ध्येय है। अंत में Be old, when young, that you may be young when you grow old. यही वैराग्य का बोध है।

    जय हरि ! 
लेखक - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे