Saturday, November 26, 2016

संत ज्ञानेश्‍वरांची संजीवन समाधि अवस्था (मराठी)

संत ज्ञानेश्‍वरांची संजीवन समाधि अवस्था
    शरीराच्या माध्यमातून करत असलेल्या लीलेला थांबवून आता त्या चौकटीच्या बाहेर पडून माऊलींना उपासकांना धर्मज्ञान प्रदान करायचे कार्य चालु ठेवायचे होते. संजीवन समाधीचा माऊलींचा हा निर्णय पाहिल्यावर ‘आय एम अ व्हाईस विथाऊट फॉर्म’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवते. कार्य करायला जेव्हा शरीराच्या मर्यादा जाणवू लागतात तेव्हा माऊलीला संजीवन समाधीचा निर्णय घ्यावा लागला. जो जन्मतही नाही व मृत्युही पावत नाही अशा अनंत चैतन्याला शरीराचे व्यवधान वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी दिवस निवडला, तो निर्णय आपले सद्गुरु संत निवृत्तीनाथांना सांगितला. संत नामदेवांसकट अनेक संत गोळा झाले. तिनचार दिवस आधीच नामदेवांच्या पुत्रांनी समाधीस्थान तयार केले. कार्तिकी द्वादशीला शेवटचे कीर्तन माऊलींनी केले, सामान्यजनांचा निरोप घेतला. सामान्यजनांचं हृदय अर्थात भरुन आलं. पण जे युक्ती जाणत होते ते स्थिर होते. कीर्तनानंतर माऊलींनी मौन धारण केले. कार्तिकी वद्य त्रयोदशीला सिद्धबेटाचा परिसर टाळमृदंगानी व विठ्ठल नामाने भारुन गेला. सिद्धेश्‍वर शिवमंदिराजवळील गुहेत उन्मनी अवस्थेतील ज्ञानदेवांना नामदेव व निवृत्तीनाथांनी आधार देऊन आसनावर नेऊन बसवले. भगवान विठ्ठल साक्षीला होते. माऊलींच्या इच्छेने ज्ञानेश्‍वरी पुढ्यात ठेवली. दीर्घ ओंकारानंतर सद्गुरुंच्या समोर त्यांना गहन समाधी लागली. त्या गुहेचे द्वार स्वहस्ते निवृत्तीनाथांनी बंद केले. ही संजीवन समाधी म्हणजे नेमके काय हे काही संशोधनाच्या आधारे समजुन घेण्याचा आपण प्रयत्न करु. या विषयावर लिहिण्याचा आपला अधिकार नाही पण या निमित्ताने माऊलींचे स्मरण करण्याची संधी आपण का दवडावी ! म्हणुन हा लेख.
    कुंडलिनी उपासनेत तिच्या त्रिविध अवस्था ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रगंथी यांचे वर्णन आहे ; या ग्रंथी म्हणजे वैदिक कल्पनेप्रमाणे स्वर्ग, मृत्यु व पाताळ या त्रिलोकांची द्वारे होत. येथे स्वर्ग म्हणजेच ‘मोक्ष’ होय. मोक्ष, स्वसंवेद्य, अवधूत, सिद्धत्त्व हे सर्व शब्द अवस्थेने एकाच अर्थाचे आहेत. येथील मोक्ष म्हणजेच ‘चिरंजीवपद’ वा ‘संजीवन समाधि’ अवस्था होय.
    ब्रह्मग्रंथि मणिपूरचक्रात मध्यभागी असून हिचा भेद झाल्यावरच ऊर्ध्वगती वा उन्नत स्तरीय दिव्यसृष्टींत प्रवेश मिळू शकतो. विष्णुग्रंथि हृच्चक्रात (हृदयचक्रात) असून रुद्रग्रंथि आज्ञाचक्राच्या व सहस्राधाराच्या बरोबर मध्यभागी असते.
    मग कुंडलिनियेचा टेंभा। आधारी केला उभा। तया चोजवले प्रभा। निमथावरी ॥ओवी क्र. 51, अ. 12॥- कुंडलिनी आधारचक्रपासून मणिपूरचक्रापर्यंत पूर्ण जागृत आहे. ती हळूहळू सुषुम्नामार्गे आपल्या प्रगत शक्तिकेंद्रांशी युक्त व्हावयास ऊर्ध्व मार्गाने प्रयाण करणार आहे. अर्थात हा पिंड ब्रह्मांडाची चेतना शक्ति म्हणजे कुंडलीनीचा प्रवास माऊली सांगते. ती शिवाची निजकला अभेदपणे पिंडब्रह्माचा पसारा क्रियाद्युक्त करत असते. ज्ञानेशांच्या नाथपरंपरेचा हाच शिवशक्ती ऐक्य प्रबोध होय. ऋग्वेदांत हिला कुहरिणी, कुवरणी इ. नावे आहेत. देहात ब्रह्मरंध्र शिव सहस्रधारांत शिवता शक्ति रुपाने प्रकटल्यावर गतीने तिचा अध:संचार सुरु होतो हेच सृजनकार्य होय. ती शक्ति नाभीस्थानांत प्रवेशल्यावरच संवेद्य होऊन तिच्यात खरे कल्याणकारी धर्मज्ञान संचरित होते. असो. सुषुम्नेची जी स्वयंभू, बाण व पाताळ अशी तीन द्वारे आहेत ती ब्रह्मा, विष्णु व रुद्र या तीन देवतांशी संबंधीत आहेत. यांनांच ग्रंथी ही संज्ञा आहे. ज्यांचे वर्णन सुरुवातीला बघितले.
    संजीवनसमाधी म्हणजे जिवंतपणी पुरुन घेणे वा जिवंत समाधी नव्हे. जीवंत वा मृत समाधी यांना योगांत स्थान नाही. असलेच तर थडगे वा पदस्थापना या अर्थाने आहे.
    समाधीत जिवंत असणे हाच संजीवन समाधीचा - निर्वाणसमाधीचा बोध होय. न संपणारी निरुत्थान समाधी वा अक्षय निर्वाण समाधी म्हणजेच संजिवन समाधी होय. विश्‍वसामरस्य साधलेले ईश्‍वरस्वरुप जेव्हा दृश्य टाकून लीन होते तेव्हा नाहिसे होत नाही तर कार्यार्थ अनेकांतून संचार करत असते. यौगिक सामर्थ्याने पंचमहाभूतांत विलीन केलेले शरीर गरज वाटली तर परत पंचभौतिक तत्त्वांना धारण करुन माऊली शरीर धारणा करु शकते. अर्थात लेकराचा आत्यंतिक शरणागत भाव व विरह बघुन माऊली आपल्या लेकरासाठी असं करुही शकते, असा भाव धारण केलेले वारकरी उपासक अजानवृक्षातळी ज्ञज्ञज्ञानेश्‍वरी चिंतनात मग्न राहतात. योग्य उपासकाला ओेंकार अनुभव देऊन आपल्या उपस्थितीचा स्पर्श माऊली देतात. संजीवन समाधी सोहळ्याच्या पावन सोहळा निमित्ताने माऊलींचे स्मरण करुन दृश्य वा अदृश्य रुपात त्यांनी आपल्यावर कृपेचा मेघ वर्षित करावा ही प्रार्थना आपण करुयात. आहे. जय रामकृष्णहरी !
लेखन- दामोदर प्र. रामदासी

संत ज्ञानेश्‍वर की संजीवन समाधि अवस्था (हिंदी)

संत ज्ञानेश्‍वर की संजीवन समाधि अवस्था
    पुणे के पास श्रीक्षेत्र आलंदी में सिद्धेवर शिवमंदिर के समीप संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजने भगवान विठ्ठल और संत नामदेव जैसे संतों के समक्ष गुफा में प्रवेश कर यौगीक क्रिया से संजीवन समाधी ली। शरीर के माध्यमसे होनेवाली लीला को विराम देकर उस चौखट के बाहर आकर संत ज्ञानदेव को जगतको धर्मज्ञान प्रदान करने की इच्छा थी। उनके संजीवन समाधीके निर्णय को देखकर ‘"आय एम अ व्हाईस विथाऊट फॉर्म’'' इस स्वामी विवेकानंदजी के उद्धर्णोंका स्मरण आता है। जिसका जन्म नही, मृत्यु नही ऐसे अनंत चैतन्य को शरीर की मर्यादाओंकी अडचण निर्माण होना स्वाभाविक है। ज्ञानदेव ने दिन निश्‍चित किया। उस निर्णय को सद्गुरु संत निवृत्तीनाथ को बताया। फिर संत नामदेव से लेकर अनेक संत जमा हुए। तिनचार दिन पहले ही नामदेव के पुत्रोने समाधीस्थान तयार किया। कार्तिक द्वादशीको अंतिम कीर्तन उन्होने किया और सामान्यजन को अंतिम नमस्कार किया। ऐसे समय सामान्यजन हृदय भावनाओंसे भर आना स्वाभाविक था।  पर जो इस युक्ती को जानते थे वे स्थिर थे। कीर्तन के नंतर ज्ञानदेवने मौन धारण किया। कार्तिक वद्य त्रयोदशीको सिद्धबेट का प्रांगण करतालमृदंग ध्वनी और विठ्ठल नाम से स्पंदनशील हुआ था। सिद्धेश्‍वर शिवमंदिरा के समीप गुफा में उन्मनी अवस्था में गए ज्ञानदेव को नामदेव और निवृत्तीनाथ ने आधार देकर आसनावर बिठाया । भगवान विठ्ठल साथ थे। ज्ञानदेव की इच्छासे ज्ञानेश्‍वरी सामने रखी गयी। दीर्घ ओंकार के बाद सद्गुरु के समक्ष वे गहन समाधी में चले गए। गुफा का प्रवेशद्वार बडी शिला लगाकर उनके बडे भाई एवं सद्गुरु संत निवृत्तीनाथ ने स्वयम बंद कर दिया।
     यौगिक क्रिया एवं संजीवन समाधी की इस जटील क्रिया को इस छोटे से लेख के माध्यम से हम जानने का प्रयास करे। इस विषय पर कुछ लिखने का अधिकार तो हमे नही है अपितु इस बहाने उस महान योगी का स्मरण करने का बहाना भी हमे छोडना नही चाहिए। इसी कारण से यह साहस कुछ संशोधन के आधारपर कर रहा हूँ।
    कुंडलिनी उपासना में त्रिविध अवस्था ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी एवं रुद्रगंथी इनका वर्णन है। यह ग्रंथीयाँ याने वैदिक कल्पनानुसार स्वर्ग, मृत्यु एवं पाताल इन त्रिलोकों के द्वार है। यहा स्वर्ग का अर्थ है ‘मोक्ष’ । मोक्ष, स्वसंवेद्य, अवधूत, सिद्धत्त्व यह सारे शब्द एकही अवस्था के अर्थ है। यहाँ मोक्ष याने ‘चिरंजीवपद’ या ‘संजीवन समाधि’ अवस्था है।
    ब्रह्मग्रंथि मणिपूरचक्र के बीच में होती है, उसका भेद होने से ही ऊर्ध्वगती या उन्नत स्तरीय दिव्यसृष्टी में प्रवेश प्राप्त हो सकता है। विष्णुग्रंथि हृच्चक्र में (हृदयचक्र में) होती है और रुद्रग्रंथि आज्ञाचक्र के या सहस्राधाराके ठीक मध्यभाग में होती है। पिंड ब्रह्मांड की चेतना शक्ति याने कुंडलीनी की यात्रा महावैष्णव संत ज्ञानेश्‍वर माऊली बता रहे है वे कहते है- मग कुंडलिनियेचा टेंभा। आधारी केला उभा। तया चोजवले प्रभा। निमथावरी ॥ओवी क्र. 51, अ. 12॥- अर्थात कुंडलिनी आधारचक्र से मणिपूरचक्र तक पूर्ण जागृत हो जाती है। वह धीरेधीरे सुषुम्नामार्ग से अपनी प्रगत शक्तिकेंद्र से युक्त होने के लिए ऊर्ध्व मार्ग से प्रयान करती है।
    वह शिव की निजकला अभेदरुपसे पिंडब्रह्म का विस्तार क्रियाद्युक्त करती रहती है। संत ज्ञानदेव के नाथपरंपराका यही शिवशक्ती ऐक्य प्रबोध है। ऋग्वेद में कुंडलिनीके कुहरिणी, कुवरणी आदी नाम है। देह में ब्रह्मरंध्र शिव सहस्रधारां में शिवता शक्ति रुप से प्रकट होने पर गती धारण कर उसका अध:संचार शुरु हो जाता है, इसीको उसका सृजनकार्य कहते है। उस शक्तीका नाभीस्थान में प्रवेश होनेपरही वह संवेद्य होकर उस में सत्यरुपसे कल्याणकारी धर्मज्ञान संचरित होता है। सुषुम्नाकी स्वयंभू, बाण एवं पाताल यह जो तीन द्वार है वह ब्रह्मा, विष्णु और रुद्र इन तीनो देवतांओंसे संबंधीत है। इनकोही ग्रंथी यह संज्ञा है। जिसका वर्णन हमने अभी देखा।
    इस समाधी में जीवीत होते हुए स्वयं को दफन कर लेना ऐसा अर्थ गलत है। इस प्रकारकी जीवीत या मृत समाधी इनको योग में कोई स्थान नाही और अगर है तो कब्र या पदस्थापना इस अर्थसे है।
    समाधी मे योगी का जिवीत रहना यह संजीवन समाधीका या निर्वाणसमाधीका बोध होता है। कभी समाप्त न होनेवाली निरुत्थान समाधी या अक्षय निर्वाण समाधी याने संजिवन समाधी । उस स्वर्ग को याने मोक्ष को उपलब्ध हुआ और उससे विश्‍वसामरस्य सधा हुआ ईश्‍वरस्वरुप योगी जब दृश्य का त्याग कर लीन होता है तब वह नष्ट नही होता अपितु कार्यार्थ अनेको में संचार करता रहता है।
    यौगिक सामर्थ्य से पंचमहाभूतो में विलीन किया हुआ शरीर जरुरत पडनेपर फिरसे पंचभौतिक तत्त्वोंको धारण कर सकता है। उपासक जो अनंत करुणामयी ज्ञानदेव का बेटा है उसका आत्यंतिक शरणागत भाव एवं विरह को देखकर माऊली याने माँ अपने बेटे केलिए ऐसा कर सकती है, ऐसी श्रद्धा चित्त मे धारण कर कितने सारे वारकरी आलंदी में समाधी मंदिर के पास अजानवृक्ष के निचे बैठकर ज्ञानदेवी का चिंतन करते रहते है। योग्य उपासकों को समय आनेपर ओंकार का अनुभव देकर अपनी उपस्थिती का स्पर्श माँ कराती रहती है।
    इस पावन अवसर पर आए हम सब मीलकर उस सद्गुरु तत्त्वका स्मरण करे, उनका आवाहन करे और हमारी आगे की यात्रा के लिए वह हमे दृश्य या अदृश्य रुपसे मार्गदर्शन करते रहे इसी शुभेच्छासे यहाँ विश्राम लेता हूंँ। जय रामकृष्णहरी !
लेखन और संशोधन- दामोदर प्र. रामदासी

Saturday, October 29, 2016

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या) (मराठी)

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या)
    भारतात निर्माण झालेल्या आध्यात्मिक विचाराला सनातन धर्म वा हिंदू धर्म म्हटले जाते. वैदिक, बौद्ध, जैन, सिख असे अनेक पंथ उपपंथीयांनी या आध्यात्मिक विचाराला समृद्ध केले. दु:खातून मुक्ति वा निर्वाणासाठी अनेक विधी दिले. यात विशेष क्रांतीकारक चेतना अवतरीत झाल्या ज्यांनी या अध्यात्मगंगेला लोकहृदयात त्या त्या काळातील भाषेत प्रतिष्ठीत केले. अशांपैकी एक महान चेतना म्हणजे भगवान महावीर !
    कोण्या एका काळात एका पित्याचे दोन पुत्र, त्यातला एक राष्ट्ररक्षणासाठी हत्यार चालवणारा क्षत्रिय होत असे व दुसरा वेदमंत्र जाणणारा ब्राह्मण. तसेच दु:खमुक्त करणारे विधी व पंथ (मार्ग) वेगवेगळे होते पण व्यक्तिला त्याचे अंतीम सत्य दाखवणारा, सनातनत्वाचे भान देणारा, पुनर्जन्म-पूर्वजन्म सिद्धांत मानणारा, उपासनेत ओंकाराची अनुभूति येणारा, कर्म सिद्धांत स्वीकारणारा म्हणून एकच सनातन धर्म होता. सनपूर्व 15 व्या शतकात कुरुपांचालांच्या भूमीत ब्राह्मण, क्षत्रिय भेद पडला.
    भगवान श्रीकृष्णांचे (जे जैनांच्या पुढच्या कल्पात पहिले तीर्थंकर असतील) चुलतभाऊ घोर अंगिरस (यदुकुळातील श्रेष्ठ पुरुष दशार्ह-अग्रज समुद्रविजय यांची राणी शिवादेवी यांच्या पोटी श्रावण शुक्ल पंचमीला जन्म) ज्यांनी मुक्तिसाठी अहिंसावादी जैन पंथ स्वीकारला व केवलज्ञान प्राप्त करुन भगवान नेमीनाथ या नावाने 22 वे तीर्थंकर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या निमित्ताने यादवकुळात ब्राह्मण व श्रमण परंपरेचा मेळ साधला गेला असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यांच्या नंतर जैन परंपरेत पुढे सनपूर्व 599-527 दरम्यान 24 वे तीर्थंकर म्हणून भगवान वर्धमान महावीर झाले. ज्यांची अश्‍विन आमावस्या ही तिथी (दिवाळीचा लक्ष्मीपुजनाचा दिवस) निर्वाण दिन म्हणुन ओळखली जाते.
    बिहार राज्यातील वैशालीच्या जवळील कुंडग्रामी (वसाढ) क्षत्रिय कुळातील पिता सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी चैत्र शुद्ध त्रयोदशीला जन्म झाला. वैशाली हे मोठे गणराज्य होते. मगध, कोसल, वत्स व अवंती या विशाल गणराज्याच्या बरोबरीने त्याचा उल्लेख होतो. आईवडिलांनी वर्धमान नाव ठेवले तरी वीरवृत्तीमुळे ते महावीर म्हणून प्रसिद्ध पावले. इंद्र त्यांच्या दर्शनाला आला होता त्याने त्यांचे दर्शन घेताच त्यांना वीर असे संबोधले. तर चारणमुनींनी सन्मती असे संबोधले. संगमदेवाने त्यांना महावीर असे नाव ठेवले.  ज्ञातृपुत्र असेही एक नाव त्यांना आहे.
    वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. ऋजुकूला नदीच्या किनारी जृंभक गावी बारा वर्षे कठोर तप करुन केवल ज्ञान त्यांना मिळाले. नंतर 66 दिवस मगध देशातल्या राजगृहाजवळ विपुलाचल पर्वतावर मौन धरुन त्यांनी विहार केला. तिथेच इंद्रभूती या ब्राह्मणाच्या शंका दूर करुन त्याला पहिला गणधर बनवले. याशिवाय त्यांचे अनेक मुख्य गणधर ब्राह्मणच होते. त्यांचा ब्राह्मणधर्माला जातीप्रथा व अनावश्यक क्रियाकांड सोडता विरोध नव्हता.
    भगवान बुद्धांच्या समकालीन असणार्‍या भगवान महावीरांनी मद्य, मांस, मदिरा, हिंसा, असत्यवचन, मध, चोरी करणं यांना टाळून पत्नीशिवाय इतर स्त्रियांना माता मानणं व आवश्यक तेवढ्या धनाचा संग्रह सांगितला.
    व्यक्तिचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावर ठरते, जन्मावर नाही असा स्पष्टपणा त्यांच्या उपदेशात होता. क्षत्रिय कुळातला जन्म असुनही ‘मी एक श्रेष्ठ ब्राह्मण आहे’ असे ते म्हणत. अध:पतित पुरोहित व त्यांचे अनावश्यक जटिल क्रियाकांड यांना विरोध करत स्त्री, पुरुष व सर्व वर्ण यांना निर्वाणाचा समान अधिकार आहे असे ते म्हणाले.
    य: शस्त्रवृत्ति: समरे रिपु: स्याद् य: कण्टको वा निजमण्डलस्य । अस्त्राणि तत्रैव नृपा: क्षिपन्ति न दीनकानीनशुभाशयेषु॥ अर्थात जो शस्त्रधारण करुन रणांगणात युद्ध करण्यासाठी आला असेल अथवा जो आपल्या देशाला बाधक ठरत असेल अशावरच राजांनी शस्त्र उचलावे. दीन, दु:खी व सद्विचारी पुरुषांवर त्याने शस्त्र उचलु नये. याचाच अर्थ योग्य ठिकाणी वापरलेली हिंसा ही योग्यच आहे हे स्पष्ट केले.
    अर्धमागधी भाषेतील भगवतीसूत्र या ग्रंथाच्या माध्यमातून गुरुशिष्य संवादाने साधकांच्या अनेक शंका ते सोडवतात. साधनेद्वारा संकुचितता सोडून सर्वसंग्राहक पातळी कशी येते याचे प्रत्यंतर त्यांच्या अनेकांतवाद वा स्यादवाद विचारात दिसते. कुठल्याही गोष्टीचा सर्व बाजुंनी विचार करण्याचा संकेत येथे अभिप्रेत आहे. वेगळा विचार करणार्‍या प्रतिपक्षाबद्दल समंजसपणा दाखवण्याचे मानसिक धैर्य अभिप्रेत आहे. स्याद्वादाने येणारे सम्यगज्ञान व अहिंसेने येणारे सम्यगदर्शन या दोघांचा परिपाक सम्यक चारित्र्यात झाला पाहिजे, जो तो आपापल्या कर्म फळांना जबाबदार आहे म्हणून मोक्षासाठी क्रियाक्षय करावा व ज्याचा त्याने स्वत:चा उद्धार स्वत: करुन घ्यावा, कोणी परमेश्‍वर तो देणार नाही असे त्यांनी सांगितले.
    मोक्षाचे अधिकारी कोण ? अहिंसा, कर्म इ. उपदेश बघता भगवान श्रीकृष्णांच्या गीतेतील क्रांतिकारी विचारांची आठवण येते.  केवलज्ञानानंतर 42 वर्षे त्यांनी श्रमणपंथाची संघटना व प्रसाराचे कार्य केले व 72 व्या वर्षी आश्‍विन आमावस्येला मोक्षाला गेले.
    सो जयइ जस्स केवलणाणुज्जलदप्पणम्मि लोयालोयं । पुढ पदिबिंब दीसइ वियसिय सयवत्तगब्भगउरो वीरो ॥- ज्याच्या केवलज्ञानरुपी उज्ज्वल दर्पणात लोक आणि अलोक प्रतिबींबासारखे विशद रुपाने दिसतात आणि जो विकसित कमलाच्या परागाप्रमाणे सुवर्णकांतीने झळकतो, अशा भगवान महावीराचा जयजयकार असो !
लेखन व संशोधन- दामोदर प्र. रामदासी

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या) (हिंदी)

भगवान महावीर निर्वाण दिन (आश्‍विन अमावास्या)
    भारत में निर्माण हुए आध्यात्मिक विचार को सनातन धर्म या हिंदू धर्म कहते है। वैदिक, बौद्ध, जैन, सिख ऐसे अनेक पंथ उपपंथो ने इस आध्यात्मिक विचार को समृद्ध किया। दु:ख से मुक्ति या निर्वाण के लिए अनेक विधीयाँ दि। इस कार्य के लिए विशेष क्रांतीकारक चेतना अवतरीत हुई, जिन्होने इस अध्यात्मगंगा को लोकहृदय में उस काल की भाषा में प्रतिष्ठीत किया । ऐसी चेतनाओं में एक महान चेतना हुई भगवान महावीर !
    किसी समय में एकही पिता के दो पुत्रो में से एक राष्ट्ररक्षण के लिए शस्त्र उठानेवाला क्षत्रिय होता था तो दुसरा वेदमंत्र जाननेवाला ब्राह्मण । दु:खमुक्त करनेवाली विधी एवं पंथ (मार्ग) अलगअलग होते थे पर व्यक्तिको उसका अंतीम सत्य दिखलानेवाला, सनातनत्वका स्मरण करा देनेवाला, पुनर्जन्म-पूर्वजन्म सिद्धांतको माननेवाला, उपासना में ओंकारकी अनुभूति देनेवाला, कर्म सिद्धांत स्वीकार करनेवाला एकही सनातन धर्म था। सनपूर्व 15 वी सदी में कुरुपांचाल की भूमी में ब्राह्मण, क्षत्रिय ऐसा भेद शुरु हुआ था।
    भगवान श्रीकृष्ण के (जो जैनों के अगले कल्प में पहले तीर्थंकर होंगे) चचेरेभाई घोर अंगिरस (यदुकुल के श्रेष्ठ पुरुष दशार्ह-अग्रज समुद्रविजय इनकी रानी शिवादेवी इनके गर्भसे श्रावण शुक्ल पंचमीको जन्म) जिन्होने मुक्ति के लिए अहिंसावादी जैन पंथ का स्वीकार किया और केवलज्ञान प्राप्त करके भगवान नेमीनाथ इस नाम से 22 वे तीर्थंकर होकर प्रसिद्ध हुए। इसी बहाने यदुकुल में ब्राह्मण और श्रमण परंपराका मिलन हुआ ऐसा कहना अनुचित नही होगा । उनके बाद जैन परंपरा में सनपूर्व 599-527 के बीच में 24 वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर हुए। जिनकी अश्‍विन अमावस्या यह तिथी (दिवालीका लक्ष्मीपुजनका दिन) महानिर्वाण दिन से पहचाना जाता है।
    बिहार राज्य में वैशालीके पास कुंडग्राम में (वसाढ) क्षत्रिय कुल में पिता सिद्धार्थ और माता त्रिशला इनके गर्भसे चैत्र शुद्ध त्रयोदशी को इनका जन्म हुआ। वैशाली महत्त्वपूर्ण गणराज्य था। मगध, कोसल, वत्स और अवंती इन विशाल गणराज्यों के समान वह बडा था। माँबाप ने वर्धमान नाम रख दिया तो वीरवृत्ती के कारण वे महावीर कहलाए। एक बार इंद्र उनके दर्शन के लिए आया था तब दर्शन लेते ही उन्हे वीर ऐसा कहा। तो चारणमुनीने सन्मती ऐसा कहा। संगमदेवने महावीर ऐसा नाम रखा। ज्ञातृपुत्र ऐसा और एक नाम भी उनका है।
    आयु के 30 साल में उन्होने गृहत्याग किया। ऋजुकूला नदी के तट पर जृंभक गाव में बारा साल कठोर तप करके उन्हे केवल ज्ञान हुआ। बाद में 66 दिन मगध देश में राजगृह के पास विपुलाचल पर्वतपर मौन धारण कर उन्होने विहार किया। वही इंद्रभूती नाम के ब्राह्मण की शंकाओंको दूर कर उसे पहला गणधर बनाया। इसके अलावा उनके अनेक मुख्य गणधर ब्राह्मणही थे । उनका ब्राह्मणधर्मकी जातीप्रथा एवं अनावश्यक क्रियाकांड छोडकर विरोध नही था ।
    भगवान बुद्ध के समकालीन भगवान महावीर ने मद्य, मांस, मदिरा, हिंसा, असत्यवचन, शहद, चोरी करना इन बातों को त्यागकर पत्नी के सिवाय परस्त्री को माता मानना और आवश्यक धन संग्रह बताया।
    व्यक्ती श्रेष्ठ होता है उसके कर्मसे जन्म से नही ऐसी स्पष्ट बात उन्होने कही। क्षत्रिय परिवार में जन्म लेकर भी ‘मै एक श्रेष्ठ ब्राह्मण हूँ’ ऐसा वे कहते थे। अध:पतित पुरोहित और उनके अनावश्यक जटिल क्रियाकांड इनको उन्होने विरोध किया । स्त्री, पुरुष और सभी वर्णों को मुक्ती का समान अधिकार है ऐसे वे कहते थे।
    य: शस्त्रवृत्ति: समरे रिपु: स्याद् य: कण्टको वा निजमण्डलस्य । अस्त्राणि तत्रैव नृपा: क्षिपन्ति न दीनकानीनशुभाशयेषु॥ अर्थात जो शस्त्रधारण कर के युद्धभूमी में युद्ध करने के लिए आया है या जो अपनी मातृभूमी को बाधा देने वाला हो ऐसे व्यक्तीपरही राजाओं को शस्त्र उठाना चाहिए। दीन, दु:खी और सद्विचारी पुरुषों पर नही। इसका अर्थ यह हुआ की उचित समय पर हिंसा का समर्थन उन्होने किया।
    अर्धमागधी भाषा के भगवतीसूत्र इस ग्रंथ में गुरुशिष्य संवाद से साधककों की अनेक शंकाओं का वे उत्तर देते है। साधनाद्वारा संकीर्णता छोडकर सर्वसंग्राहक स्तर को प्राप्त करने का अनुभव उनके अनेकांतवाद या स्यादवाद विचारो में दिखायी देता है। किसी भी चिजका चारो दिशाओं से विचार करनेका इशारा यहा मिलता है। अलग विचारोंके विरोधी पक्ष के बारे में समझदारी दिखानेका मानसिक धैर्य यहाँ अभिप्रेत आहे। स्याद्वाद से प्राप्त होनेवाला सम्यगज्ञान और अहिंसासे मिलनेवाला सम्यगदर्शन इन दोनोंका सार सम्यक चारित्र्य में प्रतिध्वनित होना चाहिए। हर किसीपर अपने अपने कर्म फलोंकी जवाबदेही होती है, इस कारण मोक्ष के लिए क्रियाक्षय करे और हर किसी को अपना उद्धार स्वयं को ही करना होगा, कोई परमेश्‍वर मोक्ष देनेवाला नही है ऐसा उन्होने कहा।
    मोक्ष का अधिकारी कौन ? अहिंसा, कर्म आदी उपदेशों को देखते हुए भगवान श्रीकृष्ण के गीता में दिए हुए क्रांतिकारी विचारोंकी याद आ जाती है । केवलज्ञान के बाद 42 वर्ष उन्होने श्रमणपंथ संघ निर्माण और प्रसार का कार्य किया और 72 साल की आयु में उनका अश्‍विन अमावस्या को निर्वाण हुआ।
    सो जयइ जस्स केवलणाणुज्जलदप्पणम्मि लोयालोयं । पुढ पदिबिंब दीसइ वियसिय सयवत्तगब्भगउरो वीरो ॥- जिसके केवलज्ञानरुपी उज्ज्वल दर्पण में लोक और अलोक प्रतिबींबीत समान विशद रुपसे दिखायी देते है और जो विकसित कमल पुष्प परागों के समान सुवर्णकांती से तेजोमय है, ऐसे भगवान महावीर का जयजयकार हो !
लेखन एवं संशोधन- दामोदर प्र. रामदासी

Saturday, October 1, 2016

संत ज्ञानेश्‍वर ने चामुंडा देवीको अर्पित किया बली ! (हिंदी)

संत ज्ञानेश्‍वर ने चामुंडा देवीको अर्पित किया बली !

क्या हम संतोने अनुप्राणित किए हुए मार्गपर चलनेवाले साधक है ? क्या हम भागवतधर्मरुपी भगवान को समर्पित है ? क्या हरीप्रेम से हमारा हृदय विभोर हो जाता है ? क्या हम भक्तिप्रेमरुपी सद्गुरुने बतलाए मार्गपर जा रहे है ? कुलस्वामीनीकी उपासना में क्या सचमुच हमारा नवरात्र धन्य हुआ है ? अगर इसका उत्तर हा है तो दशहरे के दिन माता के नाम अर्पीत होनेवाले बलीप्रथाको हम विरोध करे। संत ज्ञानेश्‍वर बलीका सत्य अर्थ समझाते है।
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडे । दिधली बळी ॥ ज्ञानेश्‍वरी-12-53॥
    महावैष्णव ज्ञानेश्‍वर महाराज की उपासना यात्रा में किस भैंसे की और दुंबे की बली दि जाती है ? यह समझनेका हम प्रयास करेंगे ।
    संकल्प विकल्प रुपी दुंबा एवं मनरुपी भैंसा इनको प्राणशक्ति चामुंडा देवी को बली दिया है ! ऐसे संत ज्ञानेश्‍वर बता रहे है। ज्ञानदेव का ऐसा नवरात्री का समापन विलक्षण है । यह एक आंतरिक रहस्य है जिसमे मन-चित्त की बली देने की यह यौगीक पद्धती सद्गुरुकृपाके बिना असंभव है इसी कारण से एक मर्यादित स्तर की चिंतना ही यहा प्रकट करनेका प्रयास है।
     उपासना में जो सहज ही होनेवाला है उस विलक्षण घटना में शुरु से ही मन या चित्त को जुलुम जबरदस्तीसे दबानेका कारण नाही, इस यात्रा में सुक्ष्म स्थिती में जाते समय उपासना का संवेदनशिल नाजुक प्रांत शुरु हो जाता है। मन का या चित्त का क्रियासंभव यह केवल कुंडलिनी प्राणशक्तीके तेज का ही होता है। अपेक्षित मन मौनी और चित्त चैतन्य यह सद्गुरुकृपासे सहज ही घटीत होता है।
    अपनी गुरुपरंपरा बताते हुए ज्ञानेश्‍वर कहते है की आदिनाथ याने शिव जो सारे सिद्धों के गुरु है उनका मच्छिंद्र प्रमुख शिष्य है। मच्छिंद्रनाथ ने गोरक्षनाथ को बोध दिया और गोरक्षने गहीनीनाथ को । गहीनीनाथ ने निवृत्तीनाथपर कृपा की और निवृत्तीनाथ ने अपने छोटे भाई ज्ञानदेव को सार दिया। इस परंपराको देखकर कैवल्यरुप संत ज्ञानेश्‍वर पर नाथपंथीय हठयोगका प्रभाव है यह बात स्पष्ट हो जाती है ।
    हठयोग शक्तिवादी है। इसमे शक्ति और ज्ञान निष्ठा के साथ उपासक का जीवन समर्पित होता है। ज्ञान याने शिव और कुंडलिनी याने शक्ति। यह शिवशक्तिसामरस्यान्वित उपासना हठयोग मार्ग से फलद्रुप होती है। दुसरा कोई संप्रदाय जिस को चामुंडा ऐसा संबोधित नही करता उस कुंडलिनी शक्ति या प्राणशक्ति को ‘चामुंडे’ ऐसा कहकर उस अतिप्राचीन नाथपरंपराका ज्ञानेश्‍वर गौरवता पूर्ण उल्लेख करते है।
    चामुंडा यह अज्ञ लोगोंकी देवी है। अतिवेगवान विकार वायुसे त्रस्त होने से विगलितगात्र अवस्था जिन्हे प्राप्त हुई है, बंधन में फँसे होने के कारण आधिभौतिक, आधिदैविक एवं अध्यात्मिक दु:ख का अनुभव लेनेवाले किसीभी जीव को अज्ञ कहा गया है। ऐसे अज्ञ जीवोंके सारे बंधन तोडके उनका शिवत्व से मिलन करानेवाली यह चामुंडा ‘महदंबा’ है।
    चामुंडा याने तपस्विनी कुमारिका। जिसकी उपासना करके उपासक को शिवत्व का स्मरण आता है। नवरात्री में यह समर्पणका चितशक्तिविलास अपनेआप चलता रहता है। जो प्रारंभ में प्रकृतीवशात मै अनाथ हूँ, ऐसा अनर्गल बोलता रहता है वही जीव चामुंडा की कृपा से शिवत्व का स्मरण आते ही अपनेआप नाथ हो जाता है और औरोंको भी सनाथ करने का सामर्थ्य प्राप्त करता है।
    नाथपंथी बाहरसे शिव, भीतरसे शाक्त और समाज में वैष्णव होना चाहिए ऐसाही संदेश है। उस कारण वैष्णवता उसका हृदय, शिवता यह मस्तक तो शक्तियुक्त होना ही मन होता है। स्वभावत: वह शक्तिमय, योगनिष्ठ, जनहितकारी, आचारवान होता है। इसी कारण से वह ‘नाथ’ इस संज्ञाको पात्र हो जाता है।
    प्रारंभ में मन-चित्त की क्रिया जब मलीन होती है तब ‘नाथत्व’ अप्रकट रहता है। जीवकी यह अनाथ अवस्था होती है। वहा पशुवत चेतना प्रभावी होती है।उपासना की इस सहज यात्रा में उस संवेदनशील मोडपर वह मलीनता कुंडलिनी में लीन हो जाती है। यह सहज लीनता महत्त्वपूर्ण घटना सिद्ध होती है।
    मनोदोष याने संकल्प विकल्प है, चित्तदोष याने ‘असत’ पर श्रद्धाशील होना है। यह प्राणशक्ति जागृत होते ही यह दोष नष्ट होते है। अर्थात इन दोषों को ‘अर्पण’ करना ज्ञानदेव को अपेक्षित है, इसी कारण से ज्ञानदेव के नवरात्री में देवीका ठाट असामान्य है। यहा वे ‘वीरयोगी’ लक्षणा प्रकट कर रहे है। यह वीरयोगी चामुंडा भवानी को संकल्प विकल्परुपी बली अर्पित कर शिव हो जाता है।
    उसका नवरात्र जागर सिद्ध हो जाता है, वह अज्ञान का सिमोल्लंघन करके अनंत चैतन्य के प्रांगण में विजयोत्सव मनाता है। आगे भी उत्कट उपासनारुपी पुर्णिमा को कोजाग्रती ? प्रश्‍न पुछनेवाली शक्ती ऐसे ‘जागृत हुए’ नाथ को देखकर प्रसन्न हो जाती है। ज्ञानरुपी चंद्र के शितल प्रकाश में अमृतस्य पुत्र: ! इस भावमयी दुग्धामृत का प्राशन कर वह अमर हो जाता है। संत ज्ञानेश की परंपरा ऐसे नाथ - वैष्णव के प्रवेशसे धन्य हो जाती है ! ऐसे तापहीन मार्तंड का यह मस्त नृत्य, यह आनंदगान अस्तित्व में चलता रहता है।
    भवतारिणी चामुंडा के चरणो में प्रतिक्षण समर्पित भावमयता का यह अखंड जागर हम शुरु करे और अज्ञानरुपी भैंसा उसके चरणो में बली दे। जय चामुंडा भवानी !
लेखनसेवा- दामोदर प्र. रामदासी !

संत ज्ञानेश्‍वरांनी चामुंडा देवीला अर्पण केलेला बळी ! (मराठी)

संत ज्ञानेश्‍वरांनी चामुंडा देवीला अर्पण केलेला बळी !
काय आपण संतांनी अनुप्राणित केलेल्या मार्गाने जाणारे वारकरी आहोत ? काय आपण भागवतधर्मरुपी विठ्ठलाला समर्पित आहोत ? काय हरीप्रेमानं आपलं हृदय उन्मळुन येतं ? काय आपण भक्तिप्रेमरुपी सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गाने जाणारे आहोत ? कुलस्वामीनीच्या उपासनेमध्ये काय खरोखरंच आपले नवरात्र धन्य झाले असे वाटते आहे ? याचे उत्तर हो असेल तर दसर्‍याला देवाच्या नावाने अर्पण केला जाणार्‍या बळी प्रथेला आपण विरोध करु. ज्ञानेश्‍वर माऊलींनी बळीचा खरा अर्थ समजाऊन सांगितला आहे.
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडे । दिधली बळी ॥ ज्ञानेश्‍वरी-12-53॥
    महावैष्णव ज्ञानेश्‍वर माऊलींच्या उपासना यात्रेत कुठल्या रेड्याचा व मेंढ्याचा बळी दिला जातो ? हे पहिल्याच माळेला आपल्याला कळले तर नवरात्रीच्या जागरणाला वा उपासनेला ते पूरक ठरु शकेल.
    संकल्प विकल्प हा मेंढा व मनरुपी रेडा यांना प्राणशक्ति चामुंडा देवीस बळी दिला आहे, असे संत ज्ञानेश्‍वर सांगतात. ज्ञानदेवांचे असे नवरात्र समापन विलक्षण आहे. हे खुप आंतरिक रहस्य आहे की ज्यात मन-चित्ताची बळी देण्याची ही यौगीक पद्धती सद्गुरुकृपेशिवाय असंभव आहे म्हणुनच एका मर्यादेपर्यंतच शब्दांचा वापर करण्याचे हे धाडस आहे.
    उपासनेत जे सहजच होणार आहे त्या विलक्षण घटनेत सुरुवातीपासुनच मनाला वा चित्ताला जुलुम जबरदस्तीने दाबण्याचे कारण नाही, या वाटचालीत सुक्ष्मामध्ये उतरत असताना उपासनेचा संवेदनशिल नाजुक भाग चालु होतो. मनाचा वा चित्ताचा क्रियासंभव हा केवळ कुंडलिनी प्राणशक्तीच्या तेजाचाच असतो. अपेक्षित मन मौनी व चित्त चैतन्य हे सद्गुरुकृपेने स्वभावेच घडुन येते.
    आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥1॥ मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष बोलला गहीनीप्रती। गहीनीप्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवा सार चोजविले॥3॥ आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख करताना कैवल्यरुप माऊलींवर नाथपंथीय हठयोगाचा प्रभाव आहे हे स्पष्टच होते.   
    हठयोग शक्तिवादी आहे. यात शक्ति व ज्ञान निष्ठेने उपासकाचे जीवन समर्पित असते. ज्ञान म्हणजे शिव व कुंडलिनी म्हणजे शक्ति. ही शिवशक्तिसामरस्यान्वित उपासना हठयोग मार्गाने जाते. दुसरा कुठलाही संप्रदाय ज्यास चामुंडा संबोधित नाही त्या कुंडलिनीला, प्राणशक्तिला ‘चामुंडे’ संबोधुन त्या अतिप्राचीन नाथपरंपरेचा माऊली गौरवाने उल्लेख करतात.
    चामुंडा ही अज्ञ लोकांची देवी आहे. विकाराच्या वार्‍याने अतिशय फडफडल्यामुळे विगलितगात्र अवस्था प्राप्त झालेल्या, बंधनात अडकलेले असल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक व अध्यात्मिक दु:खाचा अनुभव घेणार्‍या कोणाही जीवाला अज्ञ म्हटले जाते. अशा अज्ञांची समस्त बंधने तोडुन त्यांची शिवत्वाशी गाठ भेट घडवून आणणारी ही चामुंडा ‘महदंबा’ आहे.
    चामुंडा म्हणजे तपस्विनी कुमारिका. जिची उपासना करुन उपासकाला शिवत्वाचे भान येते. नवरात्रात हा समर्पणाचा चितशक्तिविलास आपोआप चालु राहतो. जो प्रारंभी प्रकृतीवशात आपण अनाथ आहोत असे बरळत असतो तोच चामुंडेच्या कृपेने व शिवत्वाच्या भानाने आपोआप नाथ होतो व इतरांना सनाथ करण्याचे सामर्थ्य मिळवतो.
    नाथपंथी बाहेर शिव, आत शाक्त व समाजात वैष्णव असावा असा संदेशच आहे. त्यामुळे वैष्णवता हे त्याचे हृदय, शिवता हे मस्तक तर शक्तियुक्त असणे हे मन होते. साहजिकच तो शक्तिमय, योगनिष्ठ, जनहितकारी, आचारवान असतोच. म्हणुनच तो ‘नाथ’ या संज्ञेला पात्र ठरतो.
    प्रारंभी मन-चित्ताच्या क्रिया जेव्हा मलिन असतात तेव्हा ‘नाथत्व’ अप्रकट असते. जीवाची हीच अनाथ अवस्था असते. तिथे पशुवत चेतना प्रभावी ठरते. उपासनेच्या सहज यात्रेत ती संवेदनशील वळणावर कुंडलिनीत लीन होते. ही सहज लीनता महत्त्वाची घटना ठरते.
    मनोदोष म्हणजे संकल्प विकल्प होत, चित्तदोष म्हणजे ‘असत’ यावर श्रद्धाशील असणे होय. ही प्राणशक्ति जागृत होताच हे दोष नाहिसे होतात. अर्थात या दोषांचे ‘अर्पण’ करणे ज्ञानेशांना अपेक्षित असल्याने माऊलींच्या नवरात्रात देवीचा थाट असामान्य आहे. इथे ते ‘वीरयोगी’ लक्षणा प्रकट करतात. हा वीरयोगी चामुंडेला असा बळी अर्पण करुन शिव होतो.
    त्याचा नवरात्र जागर सिद्ध होतो, तो अज्ञतेचे सिमोल्लंघन करुन अनंत चैतन्याच्या प्रांगणात विजयोत्सव साजरा करतो. त्या पुढेही - उपासनेच्या उत्कट पोर्णिमेला कोजागरती ? विचारत येणारी शक्ती अशा ‘जागलेल्या’ नाथाला पाहुन प्रसन्न होते. ज्ञानरुपी चंद्राच्या शितल प्रकाशात अमृतस्य पुत्र: ! या भावमयतेचे दुग्धामृत प्राशन करुन तो संजीवन झालेला असतो. ज्ञानेशांची परंपराही या नाथ - वैष्णवाच्या अशा प्रवेशाने धन्य होते ! अशा तापहीन मार्तंडांचे धुंद वारी नृत्य, हे आनंदगान अस्तित्वात चालूच राहते.
    भवतारिणी चामुंडेच्या चरणी प्रतिक्षणाला समर्पित भावमयतेचा हा अखंड जागर आपण सुरु करुयात व अज्ञानाचा रेडा तिच्या चरणी बळी देऊयात. जय चामुंडा भवानी !
लेखनसेवा- दामोदर प्र. रामदासी !

Tuesday, August 23, 2016

सहजीया वैष्णव पंथ ! भाग 1 (हिंदी)

कृष्णजन्माष्टमी के निमित्त भावपुष्प

सहजीया वैष्णव पंथ !
भाग 1


    भगवान विष्णु कृपाका उत्सव कही भी शुरु हो सकता है; ऐसा संदर्भ ऋग्वेद में है। यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विदथाभिस्वरन्ति। इनो विश्‍वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश॥ (ऋग्वेद 1.164.21) अर्थात अमृतका कुंभ जिसके  स्वाधीन है ऐसा परमात्म तत्त्व- महान आत्मा- जगत्स्वामी सर्वज्ञ ईश्‍वर मेरे जैसे अपक्व स्थिती के जिज्ञासु साधकजीवन में प्रवेश करता है; अर्थात किरणों में सूर्यप्रकाश जैसा सभी स्तरोंपर प्रवेश करता है वैसे ही यह परमात्मा साधकजीवन में स्वप्रकाश लेकर  अवतरीत होता है। तथापी यह कृपा साधक जीवन के शुरुआती समय की है, भगवान का यह रुप प्रभातसमय के सूर्यसमान जैसा है। जहा जिवात्मा प्रथम जागृत होता है। विष्णुमय जगत का भावोत्सव, समर्पणका गंगा तट तो अभी भविष्य के गर्भ में है। जहाँ यह अमृतकुंभ उलटा होगा।
    शरण्य प्रपत्तिदशा (चित्त की शरणमार्गीय दशा) उपासकको आरंभ में प्राप्त होती है, भगवान से शरण्य एकता होती है। स्व-तंत्रता कृष्ण तंत्रता हो जाती है। बालक को माँ गोदी में लेती है। वैसे ही सहजसाधना का कृपापंथ याने भक्तियोग भगवान ही घटीत करते है। ऐसे समय गोदी में मजे से बैठा हुआ बालक माँ को एकटक देखता रहता है। उस समय माँ के बारे में अनेकानेक विचारों से उसका मन भर जाता है।
    विराटका सिकुडना याने सगुण श्रीकृष्ण रुप और सगुण का अनंत विस्तार याने विराट। यहाँ भक्त प्रेम के कारण विराट सिकुडा हुआ है। वह पार्थसारथी भक्त को अभ्युदय और नि:श्रेयस के धर्ममार्ग पर ले जा रहा है। सगुण की लीला दिखाते समय उस परमसद्गुरुके अमृतशब्द पर किया हुआ ध्यान उपासकको प्रपंच और परमार्थ दोनो बातो में सिद्धी दिलाता है।
    उपासक की परिशुद्ध और निर्मल प्रज्ञा को भगवान के अनेक रुप दिखायी देते है। श्रीकृष्ण चेतना अध्यात्म की परम गहनताए और अभिव्यक्ति की अलौकीक उंचाइयाँ प्राप्त करते समय गंभीर रस की अपेक्षा आनंदरुपी अमृतसागर के उबाल धारण करती है जिसमें उपासक नखशिखांत भिग जाता है।
    मानवजाती के इतिहास में इतनी समग्रतासे और अनेक अंगों से जीवन को सहजता से स्वीकार करने वाली श्रीकृष्ण जैसी चेतना दुसरी नही हुई । सृष्टी ने दिए हुए सारे सुकोमल या नुकीली भावनांओं का सन्मान उसने बढाया। दुखी चित्त के काँटोंवाले जीवन को खिलने का सपना दिया। उदासीनता या दमन का निषेध करते समय - उन सारी भावनाओं में क्या मै नही बह रहा ? फिर तेरे सामने या तुझ में जो भी प्रकट हो रहा है उसका उत्सव मनाने के अलावा तेरे हातो में अब क्या रह जाता है ? इस प्रश्‍न से उस उपासक को जीवन का प्रसाद दिया ।
    उसने ‘अकारण आनंदीत हो’ का मंत्र दिया। फुल किस ध्येय से खिलता है ? वायु का ध्येय क्या है ? उत्तर है अकारण !
    शरीर के स्पंदन, बहनेवाली अनंत भावनांए इनका सहजस्वीकार कर ने को उसने बाध्य किया। इनसे लडने की अपेक्षा, रुपांतरण का मार्ग दिखाया। कारण वे शक्तियाँ अपनी ही तो है ! उनसे लडना याने एक हातने दुसरे हातसे लडने जैसा है ।
    विषयेभ्य: परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके। उभयेषामिन्द्रियाणाम् स दम: परिकीर्तित:॥विवेकचुडामणि-23॥ कर्म और ज्ञान इंद्रियों का प्रत्याहार अर्थात उन्हे अंतर्मुख करना, केंद्र की ओर वापसी याने दमन है ऐसे आदि शंकराचार्य कहते है। कुछ जीवोंको लगता है की दमन याने भावनाओं को दबाना, अरे यह तो भक्तिविरोधी है। सृष्टी ने दि हुई भावना विष्णुमय है। वह तो विष्णुकी ही कृपा है। तद्विष्णो: परमं पदम् सदा पश्यन्ति सूरय:। दिवीव चक्षुराततम्॥ (ऋग्वेद 1.22.20) इस व्यापक भगवान का साधकको पूर्ण सहयोग होता है। इसका ही उदात्त प्रकाशमान रुप साधकजन अंतराकाश में निहारते रहते है। उस कृपा के कारण वह साधक प्रकाशीत होता है।
    आंतरजगत विष्णुमय होने के बाद उस उपासकका स्वधर्मचक्रप्रवर्तन विविध स्तरों पर शुरु हो जाता है। सारे भेद नष्ट होते है। अनेकानेक जन्मों की अमंगलता समाप्त हो जाती है। उपासकको परिपूर्ण करने में विष्णुतत्त्व मदत करता है। इस कारण सारी भावनांए शरीरमन में एकरस में होती है। उनका कृष्णमय होना ही क्रांती का समय है। उस कृष्ण परमात्मा को आत्महिंसा या तथाकथित दमन कबुल नही है।
    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥गीता11-33॥ हे सव्यसाची (बांए हाथ से बाण छोडने की क्षमतावाला) इस कारण तू उठ, यश प्राप्त कर। शत्रू को परास्त कर धनधान्यसंपन्न राज्य का भोग ले। यह सारे शूरवीर पहले ही मेरे हाथों से मारे गए है। तू बस निमित्तमात्र है !
    कृष्ण रस से रसमय हुआ ऐसा उपासक यह उपदेश पाकर पलायन नही करता। भक्ति का सामर्थ्य प्राप्त हुआ वह- अगर पुरुष हुआ तो स्त्री से भागता नही। अहिंसा और शांतीरुपी धर्मक्षेत्र से सिधे कुरुक्षेत्र के युद्ध में, हिंसा के दावनल में उतरनेकी हिंमत रखता है। बाहर अनंत संघर्ष आहे पर भीतर मात्र उसकी अनंत शांती भ्रष्ट नही होती।
    जीवनका समग्रतासे स्वीकार करनेवाली चेतना उपासक में निर्माण करना यही तो उसकी लीला का ध्येय है। फिर अमृत हाथ में आते ही उस उपासकको विष का क्या डर ? अहिंसा सिद्ध होते ही हिंसा का क्या भय ? और अगर वह अहिंसा हिंसा को डरती हो, तो उसे नपुंसकच कहना ही उचीत होगा । समस्त द्वंद्वों का एक साथ स्वीकार यही कृष्ण भक्ति है ! यही समर्पण है !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखनसेवा - दामोदर प्र. रामदासी

विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !! भाग 1 (मराठी)

कृष्णजन्माष्टमी च्या निमित्ताने लेखन भावपुष्प

विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !!
भाग 1

    भगवान विष्णु कृपेचा सोहळा कुठेही करु शकतात; असा उल्लेख ऋग्वेदांत आहे. यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विदथाभिस्वरन्ति। इनो विश्‍वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश॥ (ऋग्वेद 1.164.21) अर्थात अमृताचा कुंभ ज्याच्या स्वाधीन आहे ते परमात्म तत्त्व- महान आत्मा- जगत्स्वामी सर्वज्ञ ईश्‍वर माझ्यासारख्या अपक्व दशेतील जिज्ञासु साधकजीवनात प्रवेश करता झाला; अर्थात किरणांत सूर्यप्रकाश जसा सर्वत्वाने प्रवेशतो तसा हा परमात्मा साधकजीवनात स्वप्रकाशाने अवतरतो. तथापी ही कृपा साधकांच्या अपक्वकाळी आहे हे लक्षात ठेवावे. भगवंताचे हे रुप प्रभातकाळच्या सूर्यासारखे आहे. जिथे जिवात्मा प्रथम जागृत होतो. विष्णुमय जगताचा भावोत्सव, समर्पणाचा गंगा तट तर अजुन पुढेच आहे. जिथे हा अमृतकुंभ पालथा होईल.       
 पै आपुलेनि भेदेविण। माझे जाणिजे जे एकपण। तयाचि नांव शरण। मज येणें गा॥ ज्ञा. 18.1398॥
    शरण्य प्रपत्तिदशा (चित्ताची शरणमार्गीय दशा) उपासकास सुरुवातीस प्राप्त होते, भगवंताशी शरण्य एकता होते. स्व-तंत्रता कृष्ण तंत्रता होऊन जाते. आईने लेकराला कडेवर घ्यावे तसे सहजसाधनेचा कृपापंथ म्हणजे भक्तियोग भगवंत घडवून आणतात. अशावेळी कडेवर बसलेले लेकरु आईकडे मौजेने बघायला लागते. आईविषयीच्या अनेकानेक भावनांनी त्याचं चित्त भरुन जातं.
    विराटाचे संकर्षण म्हणजे सगुण श्रीकृष्ण तर सगुणाचे अनंत विस्तरण म्हणजे विराट. इथे भक्तप्रेमापोटी विराटाने संकर्षण केलेले आहे. तो पार्थसारथी भक्ताला अभ्युदय व नि:श्रेयसाच्या धर्ममार्गावरुन नेत आहे. सगुण प्रत्ययाची लीला दाखवताना त्या परमसद्गुरुच्या अमृतशब्दांवरील ध्यान उपासकाला प्रपंच व परमार्थ दोन्हीमध्ये सिद्धी दिल्याशिवाय राहत नाही.
    उपासकाच्या परिशुद्ध व प्रांजळप्रज्ञेला भगवंताची अनेक रुपे दिसतात. श्रीकृष्ण चेतना अध्यात्मातील परम गहनता व अभिव्यक्तिची अलौकीक उंची गाठतानाही गंभीर रसापेक्षा आनंदरुपी अमृतसागराचे रुप धारण करते जिच्या उकळ्या उपासकाला आचिंब भिजवून टाकतात
    मानवजातीच्या इतिहासात इतक्या समग्रतेने व चहुअंगाने जीवनाला सहजतेने स्वीकारणार्‍या श्रीकृष्णासारखी चेतना दुसरी झाली नाही. सृष्टीने दिलेल्या सर्व सुकोमल वा टोकदार अशा विविध भावनांचा सन्मान त्याने वाढवला. दु:खी चित्ताच्या काटेरी आयुष्याला उमलण्याचे स्वप्न दिले. उदासीनता वा दमनाचा निषेध करत - त्या सर्व भावनांतून मीच वाहत नाही का ? मग आता तुझ्यासमोर वा तुझ्यातुन जे प्रकट होईल त्याचा उत्सव साजरा करण्यापलिकडे तुझ्या हातात काय आहे ? या प्रश्‍नाने त्या उपासकाला जीवनाचे पसायदान दिले.
    त्याने ‘अकारण आनंदी व्हा’ चा मंत्र दिला. फुल कुठल्या ध्येयाने उमलते ? वार्‍याचे ध्येय काय ? उत्तर आहे अकारण !
    शरीराची स्पंदने, वाहणार्‍या अनंत भावना यांचा सहजस्वीकार स्वीकारायला तो भाग पाडतो. त्यांच्याशी लढण्यापेक्षा, दमनापेक्षा रुपांतराचा मार्ग दाखवतो. कारण त्या शक्ति आपल्याच आहेत. त्यांच्याशी लढणे म्हणजे एका हाताने दुसर्‍या हाताशी लढल्यासारखं आहे.
    विषयेभ्य: परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके। उभयेषामिन्द्रियाणाम् स दम: परिकीर्तित:॥विवेकचुडामणि-23॥ कर्म व ज्ञान इंद्रियांचा प्रत्याहार अर्थात त्यांना अंतर्मुख करणे म्हणजे दमन असे आदि शंकराचार्य सांगतात. काहिंना वाटणारे दमन (भावनांना दाबुन टाकणे असे समजणे) भक्तिविरोधी आहे. सृष्टी प्रदत्त भावना विष्णुमय आहेत किंबहुना विष्णुंचीच कृपा आहे. तद्विष्णो: परमं पदम् सदा पश्यन्ति सूरय:। दिवीव चक्षुराततम्॥ (ऋग्वेद 1.22.20) या व्यापक भगवंताचा साधकास पूर्ण सहयोग असतो. याचेच उदात्त प्रकाशमान रुप साधकजन अंतराकाशात न्याहाळतात, त्या कृपेने तो साधक प्रकाशतो.
    आंतरजगत विष्णुमय झाल्यावर त्या उपासकाचे स्वधर्मचक्रप्रवर्तन विविध स्तरांवर आत सुरु होते. सर्व भेद मावळतात. जन्मोजन्मीची अमंगलता मावळते. उपासकाला परिपूर्ण करण्यास विष्णुतत्त्व मदत करते. म्हणूनच त्या सर्व भावभावना शरीरमनांतून एकरस असतात. त्यांचं कृष्णमय होणं ही घटना क्रांती घडवून आणते. त्या कृष्णाला आत्महिंसा वा तथाकथित दमन मान्य नाही.
    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥गीता11-33॥ हे सव्यसाची (डाव्या हातानेही बाण सोडु शकणारा) म्हणून तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. तू फक्त निमित्तमात्र हो !
    कृष्ण रसाने रसमय झालेला असा उपासक हे ऐकून पलायन करत नाही. भक्तिचं सामर्थ्य लाभलेला तो- पुरुष असला तर स्त्री पासुन पलायन करत नाही, अहिंसा व शांतीस्वरुपाच्या धर्मक्षेत्रावरुन थेट कुरुक्षेत्रावरील युद्धात, हिंसेच्या दावनलात उतरायची छाती ठेवतो. बाहेर अनंत संघर्ष आहे पण आत मात्र त्याची अनंत शांती ढळत नाही.
    आयुष्याचा समग्र स्वीकार झालेली चेतना उपासकात जन्माला घालणं हेच तर त्याच्या लीलेचं ध्येय, मग अमृत हाती आल्यावर त्या उपासकाला विषाची काय भिती ? अहिंसा सिद्ध झाल्यावर हिंसेचे काय भय ? जर ती अहिंसा हिंसेला घाबरत असेल, तर तीला नपुंसकच म्हणायला हवी. समस्त द्वंद्वांचा एक साथ स्वीकार हीच कृष्ण भक्ति ! हेच समर्पण !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखनसेवा - दामोदर प्र. रामदासी

Friday, August 5, 2016

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥ समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक ॥
समर्पणाची कसोटी व कर्मसंन्यास (मराठी)

    आत्मदानाची दिव्यता म्हणजे समर्पण भाव. समर्पण म्हणजे भगवंताप्रति असलेली सर्वोच्च अविचल स्थिती. समृद्ध प्रगतियान. यतोऽअभ्युदय नि:श्रेयस सिद्धी स धर्म:॥ अभ्युदय अर्थात प्रापंचिक व नि:श्रेयस अर्थात पारमार्थिक सर्वोच्च लब्धता म्हणजे धर्म पण या पुरुषार्थासाठीही हवी पूर्ण समर्पणाची चित्तस्थिती. समर्पणाच्या भावना जीवनास लक्ष्याकार करतात. लक्ष्य व वेध घेणारा दोघांनाही दिव्यता देतात. हेच भगवंताप्रति असलेले भागवत आत्मनिवेदन वा अव्यभिचारी प्रेम होय. वेद ज्यास यज्ञ म्हणतात त्यास अध्यात्मात भक्ति म्हणतात, समर्पण शब्दात वरील सर्व भाव अनुस्युत होतात. अर्थात यज्ञ प्रवृत्तीत अभिलाषा डोकावते हा विचार अलाहिदा ! जे भक्तिंत वा समर्पणात नसते.
    मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥गीता 8.7॥- अर्थात माझ्याच ठिकाणी मन व बुद्धी अर्पिली आहेत असा तू मलाच प्राप्त होशील यात संशय नाही.
    तू मन बुद्धि साचेसीं। जरी माझिया स्वरूपी अर्पिसी। तरी मातेंचि गा पावसी। हे माझी भाक॥- माऊली म्हणते- हे अर्जुना, तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरुपात अर्पण करशील तर मग माझेच रुप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो.
    यात भगवंताने वापरलेला प्रतिज्ञापूर्वक हा शब्द सृष्टीचा सनातन नियम आहे. सिद्धांतरुप आहे. त्यामुळे या समर्पित होण्याच्या भावदशेला आपोआपच महनीयत्व प्राप्त होते.
    यत्करोषि यदश्‍नाचि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥ गीता 9.27॥ अर्थात घडणार्‍या प्रत्येक क्रियेत ईश्‍वरार्थ धारणा ठेवणे हा समर्पणाचा प्रथम पाठ होतो. कारण ज्याप्रति समर्पित व्हायचे ती गोष्टही व्यापक व पूर्ण हवी. अपुर्‍या पदार्थांप्रति समर्पित होणे म्हणजे तसेच गुणसमुच्चय समर्पित होणार्‍या चित्तात प्रकट झाले म्हणून समजावे.
    म्हणून समर्पित होताना काय चित्त दशा हवी ? तर 1) जसा मी देवास हवा होतो तसेच त्याने मला घडवले व तेवढेच त्याने मला दिले 2) जे दिले तेही त्याच्यासाठीच व त्याने माझे सामर्थ्य पाहुन मला दिले, ते देणे किती असावे हे मी ठरवु नये वा तशी वासना करु नये व दिलेले ते मी त्याच्यासाठीच वापरायचे आहे. 3) जसा फुलास सुगंध, वार्‍यात वाहणे दिले तसे. तेव्हा त्या फुलाने वारा होणे वा वार्‍याने फुल होण्याचा हट्ट करु नये. कारण तसा हट्ट हा त्या देवाने जे दिले त्याप्रति अप्रसन्न होण्यासारखे आहे अशा चित्तात समर्पण ढासळले असे समजावे. आपापल्या दिलेल्या शक्तिने समर्पित होणे हेच प्रसन्नतेचे रहस्य आहे.
    4) म्हणून स्वत:प्रति अज्ञानाचा वा कमीपणाचा वा अपराधीवृत्तीचा गंड हा पारमार्थिक गुन्हा आहे. कर्मवृत्तिचा त्याग वा निवृत्ती हे ढोंग होऊन बसते कारण तसे करणे म्हणजे देवाने जे माझ्यासाठी नेमून दिले त्याप्रति नाखुष असणे आहे वा त्या कर्मांच्या माध्यमातून देवाला माझा समर्पणाचा भाव हवा होता त्याला मीच खोडा घातल्यासारखा होईल. म्हणून जे माझ्याकडुन कर्म होते आहे ते माझ्यामार्फत तोच करतो आहे व ते त्यालाच समर्पित होते आहे हा भावच ईशपूजा आहे. 5) म्हणुन त्या सर्व कर्मांच्या बाबतीत अखंड प्रसन्नभाव व उत्साह हा चित्ताच्या ठिकाणी चोवीस तास राहिला असेल तर देव माझ्यावर खुश आहे असे समजावे.
    बाह्य कर्मांबरोबर मन (संकल्प व भोग), चित्त (आस्था), बुद्धी (स्मृति व गति) व अहंकार (अभिमान व अस्मिता) या सर्व अंतरीय शक्ति ईश्‍वरार्थ वापरणे हे स्वाभाविकच आले.
    ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असु द्यावे समाधान ॥तुकाराम॥ यात ठेविले या संकल्पनेतील गहनता चिंतनीय होऊन जाते.
    जगाच्या खेळात नेमून दिलेले काम इतरांच्या सहयोगाने करावे लागते तेव्हा एखाद्याने त्या खेळात ते काम टाळले तर खेळातील आनंद संपून जातो. त्यांना आनंदही हवा आहे पण कामही नको आहे. असे खेळाडु खेळ मोडतात वा खेळ टाकुन वेगळे होतात. या जीवांना तथाकथित कर्मसंन्यासी जाणावे. यांना आनंदाची वासना आहे पण खेळ नकोय. एक प्रकारे देवनिर्मित खेळातील हा अपराधी ठरतो कारण त्या खेळाला त्याने खोटे मानलेले असते.
    माऊली देह असे पर्यंत कर्मत्याग अशक्य आहे असे ठणकाऊन सांगतात- तैसा शरीराचेनि आभासे। नांदतु जव असे। तव कर्मत्यागाचे पिसे। काइसे तरी॥ज्ञा.18.222॥ व या पाच कारणांमुळे कर्म घडते असे ते सांगतात- 1) देह- तैसी यथा लक्षणे। आइके कर्मकारणे। तरी देह हे मी म्हणे। पहिले एथ॥18.315॥, 2) कर्ताजीव- आणि कर्ता हे दुजे। कर्माचे कारण जाणिजे। प्रतिबिंब म्हणिजे। चैतन्याचे जे ॥18.321॥, विभिन्नइंद्रिये- ते पृथक्विधकरण। कर्माचे इया कारण। तिसरे गा जाण। नृपनंदना॥18.331॥, कर्तृत्वशक्ति- तैसी क्रियाशक्ति पवनी। असे जे अनपायिनी। ते पडिली नानास्थानी। नाना होय॥ ते भेदिली वृत्तिपंथे। वायुशक्ति गा एथे। कर्मकारण चौथे। ऐसे जाण॥18.333/343॥ व दैव-देवांचा समुदाय- ते देववृंद बरवे। कर्मकारण पांचवे। अर्जुना एथ जाणावे। देवो म्हणे॥18.351॥. कर्मसंन्यास तोच ज्यात अहंकार रहित ईश्‍वरार्पण वा सद्गुरुर्पण भाव आहे.
    अहं-बुद्धि-चित्ताप्रति नकारात्मक भाव सोडुन त्यांना ईश्‍वराप्रती जडवुन ठेवणे व जे जे माझ्याकडुन होईल ते सर्व त्यास अर्पण आहे हा भावच कर्मसंन्यास होय. परि तोचि संन्यासु वीरा। करणीयेचा झणे करा। आत्मविवेकु धरा। चित्तवृत्ति हे॥ज्ञा.18.1261॥ ऐसे चैत्य जाते सांडिले। चित्त माझ्या ठायी जडले। ठाके तैसे वहिले। सर्वथा करी॥ज्ञा.18.1268॥
    स्वामी विवेकानंद म्हणतात हे जग म्हणजे एक शाळेच्या खेळाचं मैदान आहे व आपण शाळकरी पोरं त्या मैदानावर खेळण्यासाठी सोडलेली आहोत. ही बुद्धी आल्यावर या जगात हसण्याशिवाय, खेळाडुवृत्तीशिवाय काही शिल्लक राहत नाही. असं असताना आपल्यातून खेळणाराही तोच, खेळही तोच होतो. त्यामुळे धरुन ठेवावं असं काही राहत नाही. हा खेळच चिद्विलास आहे.
    भोगविषयांवरील आसक्तिभावनेपेक्षा प्रेमाची भावना महत्त्वाची. भोगही तोच. अहं भावनेप्रति अपराधभाव धरण्यापेक्षा त्याला व्यापक स्वरुप देणं अगत्याच होतं. लोभही त्याचा, दंभही तोच, मोहातला मोहनही तोच अशावेळी षड्विकार ही विकाराची भावना जाऊन षडभावयुक्त असा मी तोच आहे असे व्यापकत्व येते. या धारणेमुळे आत्मगंडयुक्त चित्ताची विपन्नावस्था नाहीशी होते. ईश्‍वरीय प्रेमाची अद्वितीय भावनाच ऋजुता आहे ! ती प्रकट होते. त्या व्यापक अहंतेमध्ये त्या भगवंताचे अवतरण होते.
    भक्तिगंगेच्या तिरावर आलेला शरणागत उपासक सद्गुरुंच्या साक्षीने त्या गंगेच्या प्रवाहावाबरोबर स्वत:ला सोडून देतो. या समर्पणाला बुद्ध स्रोतापन्न होणं म्हणतात. अर्थात हे समुद्राच्या आकांक्षेने नसते तर ते वाहणंच लक्ष असते. आता कुठे पोहोचण्यासाठी हे तरंगत वाहणे नसते.
    शरणागत भाव मंदिराचा अत्युच्च कळस म्हणजे समर्पणता ! अर्थात त्यात समत्व भावनेने अर्पण होणे हा भाव अंतर्भुत असतोच. आता सुखदु:खाच्या भावनीक आवाहनाला उपासक भगवंताप्रति समर्पित करत राहतो. कारण योगभ्रष्टतेची आत्मपीडा त्याला मिटवायची असते. त्याची ही भोगभावनेप्रति उपेक्षा शुष्क नसते तर समर्पित असल्याने उत्साहमय असते. ऐलतीरावरील भोगमय अभ्युदयाचा सुखसोहळा अनुभवल्यावर आलेला तो वीतराग असतो. त्याला पैलतीरावरचा अकारण आनंदसोहळ्याचा वैकुंठ खुणावत असतो. त्याला त्या भोगाविषयी आसक्तीही नसते वा क्रोधही नसतो, यालाच कृष्ण अनासक्त योग म्हणतात.
    त्या उपासकाचे अंधाराशी भांडण मिटलेले असते कारण तो प्रकाशाचा पांथस्थ झालेला असतो. अर्थात तो अंधार आहे ही व्याख्याही आता त्याच्या चित्तात उमटत नसते ! कारण ईश्‍वरप्रेमातच तो क्षणाक्षणाला उगवत राहतो. असे अंतरीचे रसार्जन दिव्य आहे.
    श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखकु - दामोदर प्र. रामदासी

मय्यर्पित मनोबुद्धि : समर्पणकी कसोटी और कर्मसंन्यास (हिंदी)

मय्यर्पित मनोबुद्धि :
समर्पणकी कसोटी और कर्मसंन्यास (हिंदी)

    आत्मदानकी दिव्यता याने समर्पण भाव। समर्पण याने भगवंत के प्रति सर्वोच्च अविचल स्थिती। समृद्ध प्रगतियान।
    यतोऽअभ्युदय नि:श्रेयस सिद्धी स धर्म:॥ अभ्युदय अर्थात प्रापंचिक एवं नि:श्रेयस अर्थात पारमार्थिक सर्वोच्च लब्धता याने धर्म पर इस पुरुषार्थ के लिए चाहिए संपूर्ण समर्पण कि चित्तस्थिती। समर्पण कि भावना जीवन को लक्ष्य बनाती है और लक्ष्य एवं लक्षवेधी दोनों को ही दिव्यता प्रदान कराती है। यही है भगवंत के प्रति भागवत आत्मनिवेदन या अव्यभिचारी प्रेम ! वेद जिसे यज्ञ कहते है, उसे अध्यात्म में भक्ति कहते है। समर्पण शब्द यह सर्व भावयुक्त है। अर्थात यज्ञ प्रवृत्ती में अभिलाषा होती है, यह विचार अलाहिदा ! जो भक्ति में या समर्पण में नहि होता।
    मय्यर्पित मनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥गीता 8.7॥- अर्थात मुझे मन एवं बुद्धी अर्पण करो, ऐसा तु मुझेही प्राप्त हो जाएगा, इस में संशय नहि।
    संशय मत रख इन शब्दो में भगवान प्रतिज्ञतापूर्वक यह बात कह रहे है यह सुनिश्‍चित हो जाता है।
    प्रतिज्ञतापूर्वक यह शब्द सृष्टीका सनातन नियम है, यह शब्द अंतिम सिद्धांतरुप है। इस कारण इस समर्पण होनेवाले की भावदशा को अपनेआप महत्त्व प्राप्त हो जाता है।
    यत्करोषि यदश्‍नाचि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्॥ गीता 9.27॥ अर्थात होनेवाली प्रत्येक क्रिया में ईश्‍वरार्थ धारणा रखना यह समर्पण का प्रथम पाठ है। कारण जिसके प्रति समर्पित होना है, वह पदार्थ भी व्यापक एवं पूर्ण चाहिए। आधेअधुरे पदार्थों के प्रति समर्पित होना याने वैसे ही गुण समर्पित होनेवाले चित्त में प्रकट हो जाएंगे यह बात गौर करने लायक है।
    इस कारण समर्पित होते समय चित्त किस दशा मे चाहिए ? 1) भगवान ने मुझे उसे जैसा चाहिए वैसाही बनाया हुआ है, और उतनाही मुझे दिया है। 2) जो दिया है वह उसके लिए और मेरी सामर्थ्य देखकर मुझे दिया है। वह दिया हुआ कितना चाहिए यह तय करने का अधिकार मुझे नहि है और वैसी वासना भी मुझे नहि रखनी चाहिए । और दिया हुआ मुझे उसके लिएही उपयोग करना है। 3) जैसे फुलो में सुगंध, वायु में बहने का गुण उसने दिया है, तब फुलने वायु होने की अपेक्षा रखना या वायु ने फुल होने का हट करना गलत है और भगवान के इच्छाप्रति अप्रसन्न होने जैसा है। ऐसी चित्त कि स्थिती में समर्पण का पतन हुआ है ऐसा समझना उचित होगा। उसने दि हुई सामर्थ्य से उसके प्रति समर्पित होना ही प्रसन्नता का रहस्य है।
    4) अपने प्रति अज्ञान का या कमदर्जे का भाव या अपराधवृत्तीकी ग्रंथी यह पारमार्थिक गुनाह है। कर्मवृत्तिका त्याग या निवृत्ती यह ढोंग हो जाता है कारण वैसी कृती अर्थात भगवान ने जो मेरे लिए कार्य बनाया है उसके प्रति नाखुष होने जैसा है। और उन कर्मों के माध्यम से भगवान को मेरा समर्पण का भाव चाहिए था उस भाव को जैसे मै ही उखाड के फेंक रहा हूँ । इस कारण जो कर्म मुझसे हो रहे है वह मेरे माध्यम से वह कर रहा है और उसे ही समर्पित हो रहे है ऐसी भावदशा ईशपूजा है। 5) इस कारण उन सारे कर्मों के प्रति अखंड प्रसन्नभाव और उत्साह अगर चित्त में चोबीसो घंटे है तो भगवान मुझ पर खुष है ऐसा समझना चाहिए।         बाह्य कर्मों के साथ मन (संकल्प एवं भोग), चित्त (आस्था), बुद्धी (स्मृति एवं गति) और अहंकार (अभिमान एवं अस्मिता) यह सारी अंतरीय शक्तियाँ ईश्‍वरार्थ उपयोग में लाना यह बात स्वाभाविक हो जाती है।
    चित्त मे समाधान के साथ, अनंत ने मुझे जैसा रखा है मैं वैसा ही रहुँगा - संत तुकाराम कि इस वाणी में रखने कि संकल्पना कि गहनता चिंतनीय हो जाती है।
    संसार कि इस क्रिडा में सोंपा गया काम औरों की सहायता से यथासंभव करना पडता है, ऐसे में किसी खिलाडी ने अगर उस कार्य को टाल दिया तो उस क्रिडा का आनंद समाप्त हो जाता है। ऐसे खिलाडी को आनंद भी चाहिए पर कार्य के बीना। ऐसे खिलाडी खेल को बिगाड देते है या उस खेल से अलग हो जाते है। ऐसे जीवों को तथाकथित कर्मसंन्यासी कहते है। इनको आनंद कि तो वासना है पर खेल नहि चाहिए। एक प्रकारसे भगवाननिर्मित क्रिडा में यह तो अपराधी सिद्ध हो जाता है। क्योंकी उसने उस खेल को ही झुटा समझा है।
    संत ज्ञानेश्‍वर (भक्तों कि मां) गीतापर टीका करते समय, जब तक देह है तबतक कर्मत्याग अशक्य आहे यह बात पुरे जोरसे कहते है- और इन पांच कारणों से कर्म घटीत होता है ऐसे कहते है- देह, कर्ताजीव, विभिन्नइंद्रिये, कर्तृत्वशक्ति और दैव-देवोंका समुदाय। कर्मसंन्यास वही है जिस में अहंकार रहित ईश्‍वरार्पण या सद्गुरुर्पणका भाव है।
    अहं-बुद्धि-चित्त के प्रति नकारात्मक भाव छोडकर उन्हे ईश्‍वर के प्रती जुडाकर रखना और जो जो मेरे कार्य है उन्हे उस ईश्‍वरप्रति समर्पण करना यह भाव ही कर्मसंन्यास है।
    स्वामी विवेकानंद कहते है यह संसार याने शाला का बडा मैदान है। और हम उस शाला में जानेवाले बच्चों को उसपर खेलने के लिए छोडा गया है। ऐसी बुद्धी आनेपर फिर इस जगत में हसने के या खिलाडुवृत्ती के अलावा क्या हात में रह जाता है। ऐसे में हमारे माध्यम से खेलने वाला भी वह और खेल भी वह । इस कारण पकडने लायक क्या रह जाता है ? इस खेल को हि संत ज्ञानेश्‍वर चिद्विलास कहते है।
    भोगविषयों के प्रति आसक्ति कि भावनांओं को अपेक्षा प्रेम कि भावना महत्त्वपूर्ण है । भोग भी वही है। अहं भावनांओं के प्रति अपराधभाव पकडने कि अपेक्षा उसे व्यापक स्वरुप देना उचित है। लोभ भी उसका, दंभ भी वही, मोह में मोहन ही वही। ऐसी स्थिती में षड्विकारों के प्रति यह विकार है ऐसी भावना जाकर षडभावयुक्त ऐसा मै वहि हूँ ऐसा व्यापक भाव उतर आता है। इस धारणा के कारण आत्मगंडयुक्त चित्त कि विपन्नावस्था समाप्त होती है। ईश्‍वरीय प्रेम कि अद्वितीय भावना ही ऋजुता है ! वह प्रकट हो जाती है। उस व्यापक अहंता में उस भगवंत के अवतरण हो जाते है।
    भक्तिगंगा किनारे आया हुआ शरणागत उपासक सद्गुरु के सामने उस गंगा के प्रवाह के साथ अपने आपको बहा देता है। इस समर्पण को बुद्ध स्रोतापन्न होना कहते है। अर्थात यह समुद्र की आकांक्षा के लिए नहि है वरन् वह बहना हि लक्ष है। पहुँचने के लिए यह बहना नहि होता ।
    शरणागत भाव के मंदिर का शिखर याने समर्पण भाव ! अर्थात उसमे समत्व भावना के साथ अर्पण होना उस भाव के अंतर्निहित है। अब सुखदु:ख कि भावनाओं का आवाहन उपासक भगवंत के प्रति समर्पित करता रहता है। कारण योगभ्रष्टताकी आत्मपीडा उसे मिटानी होती है। उसकी यह भोगभावनाओं के प्रति उपेक्षा में शुष्कता नहि होती वरन् समर्पित भाव होने के कारण वह उत्साहमय होता है। इस किनारे पर भोगमय अभ्युदय का सुख उत्सव मनाने के बाद आया हुआ वह वीतराग होता है। उसे उस किनारे का अकारण आनंदउत्सव का वैकुंठ बुला रहा है। उसे उस भोगविषय के प्रति आसक्ती भी नहि होती और क्रोधही भी नहि आता, इसेहि कृष्ण अनासक्त योग कहते है।
    अब उपासकका अंधेरे के साथ झगडा समाप्त हो चुका है, कारण अब वह प्रकाश पथ का पांथस्थ बन चुका है। अर्थात वह अंधेरा है ऐसी व्याख्या भी उसके चित्त में प्रकट नहि होती ! कारण ईश्‍वरप्रेम मे हि क्षणक्षण वह उगता रहता है। ऐसा यह भीतर का रसार्जन दिव्य है।
गुमशुदि से अब तो पाला पड गया है इश्क का।
रहनुमा गुमराह दोनों की खतम है राह अब॥रहिमन॥
    श्रीकृष्णार्पणमस्तु !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

Wednesday, July 13, 2016

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)

विरक्त जाला संसारी । या नाव मुमुक्षु॥ (मराठी)
मुमुक्षे चे तीन स्तर


    आपण धावतो पुष्कळ पण पोहचत मात्र नाही. आयुष्याचा हिशेब मांडायला बसल्यावर संसाराच्या चारदोन काटक्यांशिवाय हाती काही लागत नाही. आतमध्ये खोलवर रिक्तता जाणवते आणि आयुष्याची संध्याकाळ म्हणजे पश्‍चात्ताप आणि.... भय इथले संपत नाही ही भयंकर अवस्था !
    या भवसागराच्या भोगतटावर युगानुयुगे शांतिसमाधानाची भीक मागत जीव उभा राहिला. आशा निराशेच्या द्वंद्वांची फसवणुक अव्याहतपणे भोगीत तो अभिलाषेने तिष्ठत होता ! भोगसुखाच्या ओलाव्याने अनेकदा शहारलाही, पण अंतरंगी शुष्कता अनुभवत गेला ! अनंत काळ ओसरला, पण शांतीची गुणगुण, सुखाची रुणझुण अनुभवली नाही आणि पश्‍चात्ताप वाटु लागला- जाला प्रपंची उदास। मने घेतला विषयत्रास। म्हणे आता पुरे सोस। संसारीचा॥दा. 5.8.4॥ असं कुठल्यातरी वळणावर वाटु लागतं. या भावनेनं त्याचं मन व चित्त संपृक्त होतं.
    समीपवर्ती विषयांशी तादात्म्य पावणारं, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ असं मन हे वस्तुतंत्र आहे तर कोणत्याही काळी व स्थळी भावनिष्ठेशी एकरुप होणारं, वृत्तिविशेष असं चित्त हे द्रव्यतंत्र आहे.
    अशा त्या चित्तात दुसर्‍या किनार्‍याचं आकर्षण वाटु लागतं, बद्धतेच्या शृंखला मोडून मुक्त व्हायला ते आसुसतं आणि सुरु होतो प्रवास. त्या सत्यशोधक चित्तात सुरुवातीला असलेली कुतुहुलाची भावना संदेहमय असते. पण धक्केचपेटे सोसलेलं ते बिच्चारं या अज्ञाताच्या कृष्णविवरात उतरायला तयार होतं ही त्या अनंताचीच कृपा ! ते कधी भरकटतं, जिज्ञासेपोटी प्रश्‍नही विचारत बसतं.  पण अर्थात या कुतुहुलाने का कोठे तो भगवंत भेटतो.
    अर्थात पुढे वारीचे सातत्य सुरुच राहते. पावलं चालत राहतात. उन पाऊस झेलत, तीव्र जिज्ञासा थांबु देत नाही. बौद्धिक पांडित्य अंतर्ममनाचा गाभा व्यापेलही पण तेवढ्याने भागणार नाही. जो पर्यंत तो वारकरी उपासक मस्तकाशी संबंधीत आहे तो पर्यंत विठ्ठल दूरच. पण सद्गुरुकृपेनं चालणं काही थांबत नाही. मग शेवटी परेच्या गहनतेत चेतना उतरते, विठ्ठल जीवनमरणाचा प्रश्‍न होऊन जातो. विठ्ठलाला उपासक ‘संपूर्ण’ हवा असतो. केवळ डोक्याने नाही तर हृदयासकट.
    मस्तकातून हृदयात उतरणारा तो बद्ध मुमुक्षु उपासक होतो. अनासक्त व्हायची तीव्र भावना म्हणजे मुमुक्षा ! संसारचक्रातून सुटण्याची धडपड म्हणजे मुमुक्षा ! पण यातही सुरुवातीला उपासनेमध्ये एकतृतीयांश शक्ति तो पणाला लावतो कारण जुने संस्कार मागे ओढत राहतात. काहीसं यश पदरी पडलं असं वाटतं. असा उपासक अस्वस्थ नसतो पण शांतही नसतो. संसारापासून सुटलेला पण परमार्थ न गवसलेला अशी सैराट अवस्था असते ! सत्प्रवृत्त पण निस्तेज ! काटे गळुन पडलेले आहेत पण फुलं उमलली नाहीत अशी ही चिडचिडी अवस्था मिळालेला, त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं काहीतरी मिळवलेलं आहे हे जाणवतं पण तरीही काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. यांच्या सान्निध्यात, हे आपल्यावर चिडणार नाहीत पण क्षमाही करणार नाहीत. ते आपल्याला शोषून घेतील. अनेक संन्याशांबाबत हे अनुभवायला येतं. या इयत्तेतल्या तिबेटी लामाला गावात फिरकु देत नाहीत. हिमालयात हिंदु संन्यासालाही झाडाला हातही लावु देत नाहीत. कारण यांच्या स्पर्शानं झाडं मरतात. अशा लामा व संन्याशांसाठी एकांतातले वेगळे मठ असतात. एखाद्या बेटासारखे एकांडे या उपासकांची मोक्षाची इच्छा मृदु असते असं पतंजली म्हणतात. मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य व तीव्र या तीन अवस्था आहेत.
    पण त्या वारीत संत समागम त्याला प्रेरीत ठेवतो. मार्ग दाखवतो. संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) आणि         वारी पुढे चालुच राहते. मग उपासनेमध्ये दोन तृतीयांश शक्ती लावणारा मुमुक्षु उपासक थोडी भर पडल्यासारखा पर्वतशिखरासारखा शांत होतो. चंचल मनोदशा स्थिर होते. त्याच्या सान्निध्यात ती शांती आपल्यालाही वेढुन टाकते. बागेत गेल्यावर फुलांचा सुगंध येतो तसं होतं. तो वाळवंटातून हिरवळीवर आल्यासारखा असतो आणि हे अक्षरश: जाणवतं. पण निगुढ शांतीही अवगुंठनासारखीच असते. तिथे सळसळता उत्सव नसतो, चिद्विलास नसतो ! पतंजली याला मध्य मुमुक्षा म्हणतात. पण ती शांतीही आता परमानंदमय पंढरपूर इथे जवळच कुठेतरी असल्याचं द्योतक ठरते.
    पण मुमुक्षेच्या शेवटच्या स्थित्यंतरात सर्वस्व ओतले जाते. वारीच्या वाटेवरला ‘धावा’ आता तीव्र होतो. या धुंदीनं आपोआप नर्तन असलेलं कीर्तन सुरु होतं, वेडपीसं ! आत चंद्रभागा ओसंडून वाहु लागते व तो त्यात तो सुस्नात होतो. या आनंदाची चिन्ह म्हणजे भक्तिरुपी गोपीचंदनाचा टीळा आणि वैराग्यरुपी बुक्का त्याच्या भाळी लागतो. या आनंदाचं वर्णन करावं तरी कसं?
    एकादशीला एकच दशा लाभलेला भक्त विठ्ठलाच्या पूर्वेकडील महाद्वारात उभा आहे, दर्शन करुन पश्‍चिम द्वाराने त्याला बाहेर पडायचं आहे. सद्गुरु त्याला पश्‍चिम द्वाराकडे अर्थात निर्गुणतेकडे नेत आहेत. पश्‍चिमेंचे जे क्षितीज आहे ते हृदय आहे. चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्रात येताच आपला अहं असलेला स्वरुपभाव अस्ताला नेते व तिथे तिचे स्वरुप भक्तवर मारुति ‘विरलोदय भाव’ या संज्ञेला प्राप्त होते. म्हणून मारुति तत्त्व भक्तिच्या प्रदेशात महनीय आहे.
    समर्पणाचा भाव ही जिथे समर्पित होतो अशी एकच दशा म्हणजे एकादशी ! या एकादशीला ती ‘मारुती’ दशा प्राप्त होण्यासाठी महाद्वारात आता उभा असलेल्या भक्ताला पश्‍चिमद्वाराकडे जाताना मध्ये पितांबर परिधान केलेले, कटीवर हात व ज्यांचे कोमल नेत्रद्वय चरणांकडे झुकलेले आहेत, कारण तो भक्त सर्वभाव वा अगदी शेवटचा राहिलेला सूक्ष्म अहंकार, अस्मिता, वा परत परत जन्माला घालणारी बीजे, त्या पायांपाशीच समर्पित करतो, त्या भक्ताच्या सबीज समाधीचे हे कौतुक पाहणारे भगवान विठ्ठल त्याला भेटतात. तो सावळा सगुण परमात्मा भक्ताला पश्‍चिमेकडे जाण्याआधी मध्येच अडवतो आणि प्रेमाच्या गोष्टी दोघांत सुरु होतात.
    खरं तर तो पश्‍चिम द्वारीचाच निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करुन आलेल्या, थकलेल्या भक्ताला आलिंगण्यास सगुणरुपात धावत धावत येतो. तोपर्यंत भक्तही गाभार्‍यापर्यंत पोहोचलेला आहेच. त्या राउळात भक्ताला भगवंत कवटाळतो. हेच ते भगवान विठ्ठलाचे राउळ अर्थात भक्ताच्या हृदयातील सगुण दर्शन होय ! बरं या भगवंताला हे असं कवटाळल्याशिवाय पश्‍चिमद्वारांवर जाता येत नाही ! कारण ते द्वार पिछाडीला आहे.
    हे समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणौनि भक्तांमाजी रावो। आणि ज्ञानिया तोचि॥ज्ञा.7.136॥ हा एकात्म, सोलीव सुखाचा लाभ झालेला उपासक गाऊ लागतो- सोलीव ते सुख अति सुखाहुनी। उभे ते अंगणी वैष्णवांच्या॥तुकाराम 323॥
    सद्गुरु हा सर्व सोहळा पार पडेपर्यंत तिथे असतातच.
      मग उपासक अभक्त होऊ शकत नाही असा भक्त होतो. तो भक्त म्हणजे विश्‍वाचा प्रसन्न प्रभव ! तो भक्त म्हणजे विश्‍वप्रेमाचा सजीव साक्षात्कार ! त्या राऊळात त्याची वारी सुफल संपूर्ण जाहली !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)

तेरा तो यहाँ कछु नहीं रे। रामदास कहे ॥ (हिंदी)
मुमुक्षा के तीन स्तर

    हम भाग रहे है पर कही पहुँचते नही। जीवनका हिसाब करते समय संसारके चार-दो सुख दुख की बातोंसिवाय हात क्या लगता है ? भीतर गहनता में एक रिक्तता अनुभव में आती है। जीवनका संध्या समय याने पश्‍चात्ताप लगता है और ... डर कभी समाप्त नही होता।
    इस भवसागर के भोगतटपर अनेक युगोंसे शांति-समाधान की भीक मांगता हुआ जीव खडा है। आशा और निराशा के द्वंद्व फसां रहे है, सतत फसता हुआ जीव अभिलाषासे खडा है ! भोगसुख से भिगोया हुआ जीव ना जाने कितनी बार रोमांचित नही हुआ ? पर भीतर रुखेपन को अनुभव करता है। अनंत समय गया, पर शांतीके स्वरोंकी गुनगुन, सुख की रुणझुन अनुभव में नही आयी और पश्‍चात्ताप लगने लगा। अब बस बहुत हुआ ! इस भावनासे उसका मन और चित्त भर गया।
    वर्तमान स्थिती के विषयों से तादात्म्य होनेवाला, संस्कारबद्ध, स्मृतिमय, जड, वस्तुनिष्ठ ऐसा मन यह एक वस्तुतंत्र है और किसी भी समय और जगह में भाव के साथ एकरुप होनेवाला, वृत्तिविशेष ऐसा चित्त यह द्रव्यतंत्र आहे ।
    ऐसे चित्त को दुसरे किनारे का आकर्षण लगने लगता है। बद्धता की शृंखलाओं को तोडकर मुक्त होने के लिए वह तडपता है और फिर शुरु हो जाती है एक यात्रा । उस सत्यशोधक चित्त में शुरुआती कौतुहल की भावना संदेहमय होती है, पर मारापीटा गया वह बेचारा मन इस अज्ञात के कृष्णविवर में उतरने को राजी हो जाता है यह भी उस अनंत की ही कृपा है ! वह कभी भटकता है, जिज्ञासा के आहोश में अनेक प्रश्‍नही पुछता है पर केवल कौतुहल से क्या भगवंत मिलता है ?
    विठ्ठल की दिशा में उसकी वारी याने यात्रा चालु रहती है। पाँव रुकते नही। गरमी, बारीश सहन करता हुआ, तीव्र जिज्ञासु चलता रहता है। बौद्धिक पांडित्य अंतर्मन को व्याप्त करता है पर उससे क्या होगा ? जबतक वह वारकरी, उपासक मस्तक से संबंधीत है तबतक विठ्ठल दूरही है। पर सद्गुरुकृपा से चलना रुकता नहीं। अंत में गहनता में चेतना अवतीर्ण होती है। विठ्ठल जीवनमरण का प्रश्‍न बन जाता है। विठ्ठल को उपासक ‘संपूर्ण’ चाहिए। आधाअधुरा नही। केवल मस्तिष्क से नही वरन हृदय के साथ चाहिए।
    मस्तक से हृदय में उतरनेवाला बद्ध मुमुक्षु उपासक बन जाता है। अनासक्त होने की तीव्र भावना याने मुमुक्षा ! संसारचक्र से बाहर छुटनेकी छटपटाहट याने मुमुक्षा ! पर इस में भी शुरुआती दौर में वह एकतृतीयांश शक्ति ही लगाता है। क्यों की पुराने संस्कार छुटे नही छुटते, कुछ सफलता हात लगी है ऐसा लगता है। ऐसा उपासक अस्वस्थ नही होता पर शांत भी नही होता। संसार से छुटा हुआ पर अभी परमार्थ भी नही मिला है ऐसी स्थिती उसकी बनी रहती है। सत्प्रवृत्त पर निस्तेज ! काटे निकल गए पर फुल अभी खिले नही ऐसी संतप्तग्रस्त भावदशा में वह आ जाता है। उसे देखकर यह तो पता चल जाता है की थोडा कुछ तो मिला है पर यह भी पता चलता है की अभी कुछ मिलना भी बाकी है। उसके सान्निध्य में, वह चिढता नही पर क्षमा भी नही करता। ऐसा उपासक हमारी ऊर्जाका शोषण करता है। ऐसे अनेक संन्यासीयों के बारे में अनुभव में आता है। ऐसी अवस्था के तिबेटी लामा को गाव में आने नही देते। हिमालय में इस अवस्था के हिंदु संन्यासी को वृक्ष को स्पर्श नही करने देते। कारण वह वृक्ष उस स्पर्श से मर जाता है।  ऐसे लामा और संन्यासीओं के लिए एकांत में अलग मठ बनाए जाते है। समुद्र के अकेले द्वीप के समान ऐसे उपासकोंकी मोक्ष की भावना शुरुआती दौर में मृदु होती है ऐसे पतंजली कहते है।- मृदुमध्याधिमात्रत्वात्ततोऽपि विशेष:॥ समाधीपाद 1.22 ॥ अर्थात मृदु, मध्य और तीव्र यह तीन अवस्थाँए है ।
    पर उस वारी में याने अंतर्यात्रा में संत समागम उसकी प्रेरणा बन जाता है। उसे मार्ग दिखाता है। संतांचे संगती मनोमार्ग गती। (ज्ञानेश्‍वर 744. हरिपाठ) और वारी आगे चलती रहती है। फिर उपासना में दो तृतीयांश शक्ती लगानेवाला मुमुक्षु उपासक बाद में पर्वतशिखरों जैसा शांत होता चला जाता है। चंचल मनोदशा धीरेधीरे स्थिर होती जाती है । उसके सान्निध्य में वह अद्भुत शांती हमें भी विभोर कर देती है। जैसे बगीचे में फुलोंकी सुगंध आती है वैसे । जैसे वह रेगिस्तान से हरियाली में आया हुआ हो। और इसकी अक्षरश: प्रतीती हमे आती है। पर यह रहस्यमयी शांती भी घुँघट के समान होती है। जैसे कुछ अभी भी छुपा हुआ हो। वहा रसधार या उत्सव नही होता, चिद्विलास नही होता ! पतंजली इसे मध्य मुमुक्षा कहते है। पर वह शांती भी अब परमानंदमय पंढरपूर यही कही पास में है इसका प्रतीक होती है।
    मुमुक्षा के अंतीम अवस्था में सर्वस्व का समर्पण हो जाता है। उस यात्रा के अंतीम पडाव की दौड तीव्र गतीसे शुरु हो जाती है। इसी नशा में अपनेआप नर्तन और कीर्तन शुरु हो जाता है। किसी पागल के समान धुंद! भीतर की चंद्रभागा नदी तुफान मचा देती है। उसी में स्नान कर वह वारकरी उपासक सुस्नात हो जाता है। इस आनंद के चिन्ह याने भक्तिरुपी गोपीचंदन तिलक और वैराग्यरुपी काले रंगका टीका उसके भालप्रदेश की शोभा बन जाता है। इस आनंद का वर्णन करु तो कैसे करु?
    एकादशीको एकही दशा याने अवस्था का लाभ हुआ भक्त भगवान विठ्ठल के मंदिर के पूर्व दिशा के महाद्वार में खडा है, दर्शन करके उसे पश्‍चिम द्वार से बाहर जाना है। सद्गुरु उसे पश्‍चिम द्वार से अर्थात निर्गुण अवस्था की ओर ले जा रहे है। पश्‍चिम का क्षितीज तो हृदय है। चित्कला जगदंबा कुंडलिनी हृदयचक्र में आते ही ‘अहं’ का भाव अस्त हो जाता है, और वहा उसका स्वरुप भक्तवर हनुमानजी ‘विरलोदय भाव’ इस संज्ञा को प्राप्त हो जाता है। इस कारण हनुमान तत्त्व भक्ति के क्षेत्र में महत्वपूर्ण है।
    समर्पण का भाव जहाँ समर्पित हाता है ऐसी एकही दशा याने एकादशी ! इस एकादशीको वह ‘हनुमान’ दशा प्राप्त होने के लिए महाद्वार में खडे उस भक्त को पश्‍चिमद्वार की ओर जाते समय बीच में पितांबर परिधान किए हुए, कटीपर हात और जिनके कोमल नेत्रद्वय चरणों की ओर झुके हुए है, कारण वह भक्त सर्वभाव या अंतिम अवस्था का बचा हुआ सूक्ष्म अहंकार याने अस्मिता, या पुन:पुन: जनम देनेवाले बीज, उन चरणों में समर्पित करता है, उस भक्त की सबीज समाधी का यह लाडदुलार देखनेवाले भगवान विठ्ठल मिल जाते है। वह सांवला सगुण परमात्मा भक्त को पश्‍चिम की ओर जाते समय बीच में ही रोकता है, और प्रेमपूर्ण संगोष्ठीयाँ दोनो में होने लगती है।
    वैसे देखा जाए तो पश्‍चिम द्वार का वह निर्गुण परमात्मा अखंड वारीरुपी तपश्‍चर्या करके थकेमाँदे भक्त को आलिंगन देने के लिए सगुणरुप में दौडता हुआ आता है। तबतक वह भक्त भी गर्भगृहतक आ जाता है। उस मंदिर में भक्त को भगवान आलिंगन देते है यही है भगवान विठ्ठल का राउळ याने मंदिर अर्थात भक्त के हृदय में हुआ सगुण दर्शन ! और इस आलिंगन के बिना पश्‍चिमद्वार तक भक्त नही जा सकता। ! कारण वह द्वार पिछे की ओर है। सद्गुरु इस उत्सव को देखते हुए वही खडे रहते है।
      फिर वह उपासक अभक्त नही हो सकता ऐसा भक्त बन जाता है। वह भक्त याने विश्‍व की प्रसन्न अभिव्यक्ति ! वह भक्त याने विश्‍वप्रेम का सजीव साक्षात्कार ! उस मंदिर में उसकी वारी याने उपासनाकी यात्रा सुफल संपूर्ण हो गयी !
जय हरी विठ्ठल !
लेखक - दामोदर प्र. रामदासी

Monday, July 4, 2016

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य (मराठी)

गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य


I am a voice without form स्वामी विवेकानंदांच्या या वाक्यात एक गहन सत्य लपलेलं आहे. आश्‍वासन आहे. व्यक्तिगत चेतनेचा अंतिम अविष्कार म्हणजे ईश्‍वर. दगडही ईश्‍वर होण्याच्या मार्गावर आहेत. भारतातील अध्यात्मिक धारणा हीच आहे की ईश्‍वर निर्माण कर्ता यापेक्षा अस्तित्वाचा अंतिम कळस आहे. आपल्याकडे कळसाचही दर्शन घेतात. ते कदाचित त्याचंच प्रतिक असावं. बीजरुपातला तो ईश्‍वर कधीनाकधी उमलतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला ! या अपरोक्षानुभूतिनंतर त्या सिद्धाच्या अस्तित्वाने आसमंत दरवळतो. इतरेतर सामान्यजन जे त्या उमलत्या अस्तित्वाच्या सान्निध्यात येतात तेही सुगंधीत होतात. त्यांनाही ईश्‍वर व्हायला तो मदत करतो. असा तो सद्गुरु हा प्रकट ईश्‍वर आहे.
    गुरु तीन प्रकारचे- पहिला गुरु तो की जो विद्येची आस असणार्‍याला विद्येचे दान देतो. तो विद्यागुरु वा शिक्षक. हा केवळ ज्ञान देतो पण अस्तित्व नाही. तो मस्तकात केंद्रीभूत व्हायला शिकवतो. ‘जे जाणल्याने सर्वच जाणलं जाते ते शिकलास का ?’ पिता उद्दालक गुरुकुलातुन शिक्षण पूर्ण करुन घरी अंगणात प्रवेश करणारा आपला पुत्र श्‍वेतकेतुला हा प्रश्‍न विचारतो. तेव्हा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी परत आश्रमात आलेल्या आपल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा ऐकुन, अज्ञानाच्या एकाच नावेत बसलेले ते विद्यागुरु श्‍वेतकेतुपुढे केवळ विधीच सांगतात व आपण ते जाणत नाही आहोत ही प्रांजळ कबुली देतात. तेव्हा श्‍वेतकेतू ते जाणण्यासाठी जंगलात निघून जातो.
    ‘हि विद्या शिकुन मी काय करु ? केवळ पोटभरु असं बाह्य पदार्थ वा विषयांच्या ज्ञानापेक्षाही अधिक किंमतीचं ते मला जाणायचं आहे’ असं आपल्या मोठ्या भावाला शाळेत मी का जात नाही याचे कारण सांगणारे गदाधर वा रामकृष्ण परमहंस शैक्षणिक विद्येपेक्षा अधिक महनीय असं काही आहे हे जाणत असतात.
    विद्यार्थी हा माहितीच्या शोधात असतो तर शिष्य रुपांतरणाच्या !
    अधिक किंमतीचं, जे जाणल्यानं सगळंच जाणलं जातं ते शिकणं अधिक महत्त्वाचं आहे किंबहुना आयुष्याचं सार आहे आणि ते शिकवण्याची जबाबदारी घेतात ते सद्गुरु जे देह धारण करुन असतात.
    ‘होय ! मी त्याला पाहिलं आहे. जसं मी तुला बघतो अगदी तसंच. किंबहुना याही पेक्षा सुस्पष्टपणे. काय तुला त्याला बघायचंय ?’ असा आत्मविश्‍वास पूर्वक म्हणणारा साधु नरेंद्राने यापूर्वी कधीच बघितला नव्हता. आणि हा आत्मविश्‍वास सार्थ करणारा स्पर्श त्याला त्या गुरुकडुन मिळाला आणि आयुष्य बदललं. तो स्रोतापन्न झाला ! निर्विकल्प समाधी नंतर नरेंद्रनाथ हेच म्हणाले की ‘त्यांनी मला दाखवलं ! मी माझाच चेहरा बघितला !’ पुढे तोही पुढे त्याच सद्गुरुंच्या अढळस्थानी कारुण्यानं बसलाही. ते सद्गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस व तो नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद.
    आम्हाला तुम्ही काही शिकवाल का ? असं एकानं रमण महर्षींना विचारलं तर ते म्हणाले, नाही ! मी शिकलेलं विसरायला लावतो ! असे सद्गुरु त्या बालकवत समर्पित शिष्याला त्याचं भान द्यायला उत्सुक असतात. त्यानं गोळा केलेला कचरा साफ करतात. त्याला त्याचाच चेहरा दाखवतात. असे सद्गुरु अस्तित्व देतात ज्ञान नाही. ते विकेंद्रित शिष्याला केंद्राकडे नेतात. ते मस्तकातून उपटून काढतात. दुसरीकडे पुनररोपण करतात. कदाचित ते सुरुवातीला पीडादायक असतं, ते उपटणं, पानं गळणं, मातीत मुळांचा जम बसणं सारं वेदनादायी, प्रसुती वेदने सारखं पण तो शिष्य वटवृक्ष होतो. त्याचा नवीन जन्म झाला कि तो द्वीज होतो. ब्राह्मण होतो! सॉक्रेटीस म्हणायचे मी सुईण आहे. आणि ते खरं आहे कारण सद्गुरु अहम च्या मृत्यु नंतर अस्तित्वाचे भान देणार्‍या नवीन जन्माच्या प्रसुतीत मदत करतात.
    परीस आपणाऐसें करीना। सुवर्णें लोहो पालटेना।उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरुचा॥दा.1-4-15॥ परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने लोखंडाला सोनं बनवत नाही पण सद्गुरु कृपा झालेला उपासक मात्र अनेकांचा उद्धारकर्ता होतो.
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात काळाच्या पलिकडे असल्यामुळे तो गुरुंचा गुरु आहे, परमसद्गुरु आहे. सद्गुरु जेव्हा देह त्यागतात तेव्हा काळाच्या पल्याडचं अस्तित्व होतात तेव्हा ते परमसद्गुरु होतात. ओंकारस्वरुप ! यातही काही जण परत परत जगाच्या कल्याणासाठी येतात तर काही कधीच येत नाहीत. त्यांचं महापरिनिर्वाण होतं. दिवा परत लावण्याची शक्यताच मावळते. जसे कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद इ. परत परत येत आहेत. ‘मी दोनशे वर्षांनी परत येणार आहे !’ असे रामकृष्ण नरेंद्रनाथांना म्हणाले होते.
    देहात असताना सद्गुरु जीवनमुक्त असतात, जागृत असतात, काळाच्या अभावाचा बोधही असतो. पण देहाला मर्यादा असतात निसर्गाच्या. भुक, तहान, झोप इ. एक जैवीक घड्याळ चालु असतं. पण एकदा देह त्यागानंतर मात्र परमसद्गुरुला या मर्यादा राहत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या देहत्यागानंतर मां शारदा हातातील कंगण जे सौभाग्याचं लेणं ते काढायला जाते आणि रामकृष्ण सशरीर प्रकट होऊन मी केवळ देह त्यागला आहे, तू कंगण कधी कढु नकोस ! असं तीला सांगतात.
    I am a voice without form असं जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हा ‘मी या परमसद्गुरु रुपात आहे’, हे आपणास सांगत आहेत. त्यांनी अनेक जन्म आपल्यासाठी घेतलेले आहेत. मग अशावेळी आपण कुठल्या जन्माची पुण्यतिथी वा जन्मदिन साजरा करायचा ? कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते तुला नाही पण मला माहित आहे. मी जन्मरहित व अविनाशी असुनही सर्व प्राण्यांचा ईश्‍वर (परमसद्गुरु) असुनही प्रकृतीला स्वाधीन करुन आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
    योगी अरविंद स्वत: सांगतात,‘अलिपुरच्या तुरुंगात योगाभ्यास करताना वेळोवेळी स्वामी विवेकानंद मला मार्गदर्शन करायचे.’ ते परमसद्गुरु योग्य व समर्पित उपासकाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जरी त्यांनी शरीराचा त्याग केलेला असला तरीही.
    तिबेटमध्ये कैलासपर्वतापाशी अशी एक जागा आहे जिथे वैशाखि पौर्णिमेला म्हणजे बुद्ध निर्वाणाच्या दिवशी पाचशे बौद्ध सद्गुरु एकत्र येतात व त्यांना मार्गदर्शनासाठी साक्षात बुद्ध प्रकट होतात. साधनाकाळात स्वामी विवेकानंदांनाही बुद्धांनी दर्शन दिलेले होते.         
    सद्गुरु काळ व अवकाश यात वावरत असतात, त्यांचे अशा प्रकारे परमसद्गुरुशी संवादही चालु असतो. कुठल्यातरी जन्मात ज्याला सद्गुरु मिळाले त्या उपासकाला जरी समाधी लाभली नाही, त्याने देह सोडून परत जन्म घेतला तरी त्याला प्रत्येक जन्मात सूक्ष्म मार्गदर्शन मिळत राहते. त्याला माहिती नसले तरीही. शेवटी एवढंच म्हणवासं वाटतं- म्हणौनि सद्गुरु वर्णवेना। हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती॥दा.1.4.31॥
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य (हिंदी)

गुरु, सद्गुरु और परमसद्गुरु का अनसुलझा रहस्य


I am a Voice Without Form स्वामी विवेकानंद के इस वाक्य में एक गहन सत्यता है। आश्‍वासन है। व्यक्तिगत चेतनाका अंतिम अविष्कार याने ईश्‍वर। एक पत्थरभी ईश्‍वरत्व की राह पर है। भारत की आध्यात्मिक धारणा यही है की ईश्‍वर निर्माण कर्ता से ज्यादा इस अस्तित्व का आखिरी कलश है। मंदिर शिखर है! शायद इसी कराणसे मंदिर के शिखर दर्शन हम करते है ! बीजरुप वह ईश्‍वर कभी ना कभी खिलता है। मोगरे का फुल खिलता है ! इस अपरोक्षानुभूति के बाद उस सिद्ध के अस्तित्व की सुगंध फैलती है। इतरेतर सामान्यजन जो उस खिले हुए अस्तित्व के सान्निध्य में आतेही वह भी सुगंधीत हो जाते है। उस सामान्य जनको भी ईश्‍वर होने के लिए वह मदत करता है। ऐसा वह सद्गुरु तो प्रकट ईश्‍वर है।
    गुरु तीन प्रकार के है- पहला गुरु वह है जो विद्याकी आस जिसे है उसे विद्याका दान देता है। वह है विद्यागुरु या शिक्षक । वह तो केवल ज्ञान देता है पर अस्तित्व नही। वह तो मस्तिष्क में केंद्रीभूत होने को कहता है।
    ‘जो जानने से सब जाना जाता है क्या तुने वह सिखा है ? पिता उद्दालक गुरुकुल से शिक्षा लेकर घर वापस आनेवाले अपने पुत्र श्‍वेतकेतु को यह प्रश्‍न पुछता है। तब उसका उत्तर पाने के लिए फिरसे आश्रम आए अपने विद्यार्थी की जिज्ञासा सुनकर अज्ञान की एकही नाव में बैठे हुए वे विद्यागुरु श्‍वेतकेतु को केवल विधी बताते है। और मै वह नही जानता ऐसा प्रामाणिकतासे कहते भी है। और उसे जानने के लिए श्‍वेतकेतू जंगल में चला जाता है।
    ‘यह विद्या पढकर मै क्या करु? केवल पेट भरना सिखानेवाले इस ज्ञान से भी अधिक किंमती जो है वह मै जानना चाहता हूँ !’ ऐसा अपने बडे भाईसे, मै शाला क्यूँ नहि जाना चाहता इसका कारण बताने वाले गदाधर या रामकृष्ण परमहंस संसारी विद्याकी अपेक्षा अधिक महनीय ऐसा कुछ है यह जानते थे।
    विद्यार्थी ज्ञान की खोज करता है पर शिष्य रुपांतरण की !
    अधिक किंमती, जो जानने से सब जाना जाता है, वह सिखना ज्यादा महत्त्वपूर्ण है। वह सिखाने की जबाबदारी जो लेते है वह सद्गुरु है जो देह धारण किए हुए होते है।
    ‘हां ! मैने उसे देखा है ! जैसे मै तुझे देख रहा हूँ बिल्कुल वैसे ही ! फर्क इतना है की इससे भी ज्यादा सुस्पष्ट रुपसे! क्या तू उसे देखना चाहता है ?’ ऐसा आत्मविश्‍वासपूर्वक कहने वाला साधु नरेंद्रने इससे पूर्व कभी देखा नही था। और यह आत्मविश्‍वास सार्थ करानेवाला स्पर्श उसे उस गुरुने दिया था। जिससे उसका जीवन बदल गया। वह तो स्रोतापन्न हुआ ! निर्विकल्प समाधी के बाद नरेंद्रनाथ ने कहा की ‘उन्होने मुझे दिखलाया ! मैने मेरा ही चेहरा देखा।’ आगे वह भी उस सद्गुरुके स्थान पर कारुण्यभाव से बैठ गया। वह सद्गुरु थे रामकृष्ण परमहंस और वह शिष्य थे नरेंद्रनाथ याने स्वामी विवेकानंद।
    क्या आप हमे कुछ सिखा सकते है ? ऐसा एकने रमण महर्षी को पुछा तो उन्होने कहा, नहि ! मै तो जो सिखाया गया है उसे भुलाने को बताता हूँ। ऐसे सद्गुरु उस बालकवत समर्पित शिष्य को आत्मभान देने के लिए उत्सुक रहते है। उसने जमाया हुआ कुडा कचरा साफ करते है। उसे उसका ही चेहरा दिखाते है।
    ऐसे सद्गुरु अस्तित्व देते है ज्ञान नही। वह विकेंद्रित शिष्य को केंद्र की ओर ले जाते है। वे मस्तिष्क से जानकारी जडमूलसे उखाड फेकतें है। शिष्यके उस पौधे को कही और जगह पुनररोपीत करते है। कदाचित यह काम शुरु में बहुत पीडादायी होता है। वह उखाडना, रोपना, पत्तों का गिरना, मिट्टी में जडों का फिरसे जमना, यह सारा खेल प्रसव वेदनाओं जैसा होता है। फिर वह शिष्य बरगद की पेड जैसा फैलता है, उसका नया जनम होता है, वह द्वीज होता है।
    सॉक्रेटीस कहते थे मै तो दाई जैसा हूँ, और यह बात एकदम सही है, कारण सद्गुरु अहम की मृत्यु के बाद अस्तित्वका होश देनेवाले प्रसव काल में मदत करते है।
    पारस पत्थर लोहे को सोना बनाता है पर सोना लोहे को सोना नहि बनाता, पर सद्गुरु स्पर्श हुआ उपासक मात्र अनेक लोगोंका उद्धारकर्ता बन जाता है।
    पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात कालातीत होने के कारण वह गुरुका गुरु परमसद्गुरु है। सद्गुरु जब देह त्याग करते है तब उनका कालातीत अस्तित्व होता है। तब वे परमसद्गुरु होते है, ओंकारस्वरुप !  इस में भी कुछ कुछ फिरसे जगत के कल्याण के लिए आते है पर कुछ तो कभी नहि आते। उनका महापरिनिर्वाण होता है। दिया सदा के लिए बुझ जाता है। कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्‍वर, समर्थ, स्वामी विवेकानंद आदी फिरसे आते है । ‘मै दोसौ वर्ष बाद फिरसे आनेवाला हूँ !’ ऐसा रामकृष्ण ने नरेंद्रनाथ को कहा था ।
    देह में रहते हुए सद्गुरु जीवनमुक्त होते है, जागृत होते है, समय के अभाव का बोध रहता है। पर देह को मर्यादा होती है प्रकृती की भुक, प्यास, निद्रा आदी एक जैवीक घडी चलती रहती है। पर देह त्याग के बाद परमसद्गुरु अमर्याद रहते है। रामकृष्ण परमहंस के देहत्याग के बाद मां शारदा सौभाग्य अलंकार जो हात का कंगण निकाल रहि थी तब रामकृष्ण सशरीर प्रकट हुए कहने लगे,‘मैने तो केवल देह त्यागदी है। कंगन निकालने की आवश्यकता नहि है।’
    I am a Voice Without Form ऐसा जब स्वामी विवेकानंद कहते है तब ‘मै इस परमसद्गुरु के रुप में हूँ’, यही कह रहे है। वह तो अनेको बार हमारे लिए आए हुए है। ऐसी स्थिती में हम उनका जन्मदिवस या मृत्युतिथी कैसे मना सकते है ? किस जन्म की तिथी मनाएंगे ?
    कृष्ण अर्जुन को यहि बात समझा रहे है- बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुन ! मेरे और तेरे बहुत जन्म हुए है। तुझे नहि पर मुझे वह पता है। मै तो जन्मरहित और अविनाशी होकर भी सब प्राणीयोंका ईश्‍वर (परमसद्गुरु) हूँ। प्रकृती के स्वाधीन होकर अपने आपको अपनी योगमायासे प्रकट करता हूँ।
    योगी अरविंद स्वत: कहते है,‘अलिपुरके कारागृह में योगाभ्यास करते समय स्वामी विवेकानंद मुझे मार्गदर्शन करते थे।’ उन्होने उनके शरीरका त्याग किया हुआ है, फिर भी वे परमसद्गुरु योग्य और समर्पित उपासकको समय समय पर मार्गदर्शन करते रहते है।
    तिबेट में कैलाश पर्वत के पास एक ऐसी जगह है जहा पर हर साल वैशाखि पुर्णिमा पर याने जब बुद्ध निर्वाण को उपलब्ध हुए थे उस विशिष्ट समय पर पाचसौ बौद्ध सद्गुरु एकत्र आते है और उन्हे  मार्गदर्शन करने के लिए साक्षात बुद्ध प्रकट होते है।         साधनाकाल में स्वामी विवेकानंद को भी बुद्ध ने दर्शन दिए थे। सद्गुरु जब समय और अवकाश में विहार करते है तब भी उनका अदृश्य परमसद्गुरु के साथ संवाद चालु ही रहता है।
    किसी जनम में जिसे सद्गुरु मिले है उस उपासक को अगर समाधी लाभ नहि हुआ है और उसने देह छोड दी, फिरसे जन्म लिया तब भी उसे प्रत्येक जन्म में सूक्ष्म मार्गदर्शन मिलता रहता है। उसे पता हो या नहि हो। ऐसे सद्गुरु और परमसद्गुरु कि महत्ता का वर्णन करना मुझे संभव नहि है।
जय हरी ! 

लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे

Saturday, July 2, 2016

प्रखर वैराग्य उदासीन ! (मराठी)

प्रखर वैराग्य उदासीन !
 

    शुभ हेच ज्याचं अचेतन मन असतं तो ऋषि. चेतन मन एक पट असेल तर नऊ पट मोठे अचेतन मन असते. जो मानवी मनाचा मोठा शक्तिशाली भाग आहे. अंतर्यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी उपासकाला शरीर मनाचे ज्ञान आवश्यक आहे. अचेतन मनाची ठेवण बदलल्याशिवाय पुढची प्रगती अवघड आहे.
    जन्मजन्मांतरीचे बरे वाईट संस्कार, इच्छा साठवलेले हे मन- प्रमाण (कुठल्याही विषयाचे सम्यक ज्ञान), विपर्यय (मनाची संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती या मनाच्या पाच शक्तिंचे अधिष्ठान असल्यामुळे ते जेव्हा पूर्णत: सकारात्मक (उत्साही व प्रसन्न) व ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) असते अशा वेळी जागी होणारी सम्यक ज्ञानाची शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) व नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोन्ही क्षेत्रात अडथळाविहीन यश देते. म्हणून स्वत: विषयी आदर किंबहुना सज्जन म्हणणं, उत्साही ठेवणं उपासकाला अपरिहार्य ठरतं.
    उत्साही कल्पना, सकारात्मक विचार यांची सततची पुनरावृत्ती अचेतन मनाची ठेवण बदलवून टाकते. मेंदूच्या पेशींवर होकारात्मकता कोरली जाते. व्यक्ति, विचार, भावना वा घटने कडे बघण्याची दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदलावीच लागते. मनाचा सतत वाहणारा प्रवाह, तिथे काही अशुभ आलं तर किंचीत थांबणं गरजेचं ठरतं तर व शुभं आलं तर त्यावर लगेच अंमलबजावणी करावी लागते. जसे राग आला तर आधी पाच दीर्घ श्‍वास घेतल्यास त्यावर नियंत्रण येतं. प्रेम जागं झालं तर विस्तार लगेच होऊ देणं इष्ट ठरतं.
    असे काम केल्यावर मग स्वप्नांचा ढंग बदलतो, निद्रेची गुणात्मकता वाढते, कल्पनेची भरारी उत्साहीत ठेवते. सुरुवातीच्या कठिण सरावानंतर ज्याप्रमाणे दुसरा विचार करत असतानाही ड्रायव्हर आपोआप गाडी पुढे चालवत ठेवतो. तसे उपासकाचे होते. तो उत्साहीच राहतो. अशा रितीने अचेतन सक्रिय होताच पुढची पायरी येते, अभ्यासाची !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रेची सुरुवात अशी करताच पुढची पायरी येते ती अभ्यासाची (अखंड आंतरिक सराव). गीतेमध्ये भगवंत वैराग्या आधी अभ्यासाचे महत्त्व सांगतात. अभ्यास म्हणजे स्वभावाला अनुकुल असा एखादा विधी ज्या योगे आंतरिक जगतात प्रवेश करणं सोपं जातं. अंतर्मुखता वाढते. भक्तियोगी नाम-भजनाची साथ घेईल तर एखादा निर्गुणवादी अजपा वा संवेदनांचा आधार घेईल. कोणी आसन, मुद्रा, बंध लावीन तर कोणी कर्मालाच भगवंत मानीन.
    विषयसंगातून निर्माण होणारे गुणात्मक कार्य हेच विवेकाच्या शुद्ध वा अशुद्ध रुपास कारण होते अशावेळी स्वीकारले जाणारे रजतमात्मक विषय असतील तर विवेकाचा तोलही जाऊ शकतो म्हणून भगवंत वैराग्यासोबत विवेक न सांगता आधी अभ्यासाची अर्थात यौगिक क्रियाची जोड देतात. परि वैराग्याचेनि आधारे। जरि लाविलें अभ्यासाचिए मोहरें। तरि केतुलेनि एक अवसरे। स्थिरावेल॥ज्ञा.6.419 माऊली स्पष्ट करते. माऊलींना संसार शुन्यात नेण्यापेक्षा त्याला हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभवाने जिंकावे हा वैराग्याचा परिणाम हवा आहे.
    प्रखर वैराग्य उदासीन। प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान। स्नानसंध्या भगवद्भजन। पुण्यमार्ग॥ विवेक वैराग्य ते ऐसे। नुसते वैराग्य हेकांड पिसे। शब्दज्ञान येळिलसें। आपणचि वाटे॥ (दा.12.4.18-19) प्रखर वैराग्य मग प्रत्ययाचे ज्ञान तसेच भगवद्भजनाचा पुण्यप्रताप त्याने झालेला शुद्ध विवेक व वैराग्य उपासकाला पावन करु लागते. अन्यथा दिशाहिन झालेली दशा असेच म्हणावे लागते.
    म्हणून वैराग्य परिस्थिती निर्माण करते तर अखंड सराव वा अभ्यास म्हणजे त्या परिस्थितीत वापरायचे तंत्र आहे. प्रत्येक कृती म्हणजे आपल्या इच्छाच असतात. त्यांना थांबवण्यासाठी विवेक मित्रासारखी साथ करतो. तर्काच्या आधाराने वा मनाशी सतत संवाद साधुन प्रगल्भतेचा अत्युच्च स्तर म्हणजेच अचेतन मन घडवण्याचा महतपराक्रम विवेक करतो. वैराग्यानं निर्माण केलेली एक भावजन्य परिस्थिती का वापरायची याची प्रेरणा सतत विवेक देत राहतो. विवेक म्हणजे एक गजराचं घड्याळ असतं. पुन्हा पुन्हा साद घालणारे जुने संस्कार जागे झाले की ते उपासकाला जागं करतं. ‘इच्छा न करणं’ वा संकल्पविहिनता या अवस्थेला आणणं हे विवेकाचं कार्य असतं.
    माझा आनंद आता कशावरही अवलंबून नाही अशी भावस्थिती म्हणजे वैराग्य ! प्रपंचात उपासक व्यक्तिची, घटनेची, गोष्टीची निवड करु शकतो पण त्याचा विवेक व वैराग्य त्याला आसक्त होऊ देत नाही. निवड करा पण आसक्तिमध्ये पडु नका असा टकळा रात्रंदिवस चालु असतो. एखादा विधी, अभ्यासाचा मूळ गाभा स्वकेंद्रस्थ होणं आहे. जे काही घडेल त्यानं तत्काळ प्रभावित न होता स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होऊन बघणं, मग निर्णय घेणं उचीत ठरतं. स्थिरवृतीचा चष्मा जगाचा यथार्थ आयाम दाखवतो.
    दीर्घकाळ, अखंड, अबाधीत सजगतेमुळे आपल्यात प्रतिष्ठापीत झालेली गोष्ट अभ्यास असते. ज्यात सादर सपर्मण अनुस्युत असते. मुळात सामरस्य-समसाम्य हाच अंतिम बोध असल्यामुळे संसार नष्ट करणं ही क्रिया नसुन संसार आत्मैव एतद् असा स्वसंवेद्यतेने अनुभवणे व ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हाच इत्यर्थ आहे. शेवटी बालपणीच प्रौढता व प्रौढपणी बालता असा हा वैराग्यलक्षणेचा बोध आहे.
    जय हरि !

लेखनसेवा - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे

विवेक, वैराग्य, अभ्यास ! (हिंदी)

विवेक, वैराग्य, अभ्यास !

    शुभ ही जिसका अचेतन मन है वही ऋषि है। चेतन मन एक टका तो नौ टका अचेतन मन होता है। जो मानवी मन का बडा शक्तिशाली भाग है। अंतर्यात्राको शुरुवात करने से पूर्व उपासक को शरीर-मन का ज्ञान आवश्यक है। अचेतन मन का रखरखाव बदलनेसे आगे की प्रगती आसान हो जाती है।
    जन्मजन्मांतर के बुरेभले संस्कार, इच्छांओं का भंडार यह मन- प्रमाण (किसी भी विषय का सम्यक ज्ञान), विपर्यय (मन की संदेही नकारात्मक शक्ति), कल्पना, निद्रा, स्मृती इस पाच शक्तिंयोंका अधिष्ठान है। जब वह पूर्णत: सकारात्मक (उत्साही एवं प्रसन्न) और ध्यानस्थ (अखंड अनुसंधान) होता है तब जगनेवाली सम्यक ज्ञान की शक्ति अभ्युदय (प्रापंचिक उत्कर्ष) एवं नि:श्रेयस (पारमार्थिक सिद्धी) दोनो क्षेत्र में बिना रुकावट यश देती है। इस कारण सुख के लिए सम्मान की भावना, उत्साही प्रवृत्ती उपासकको बनाए रखना अपरिहार्य होता है। उत्साह की कल्पना, सकारात्मक विचार इनकी सतत पुनरावृत्ती अचेतन मन को बदल देती है। मस्तिष्क पर होकारात्मकता चिन्हांकित होती है। व्यक्ति, विचार या घटना की ओर देखनेकी दोषदृष्टि वा निंदात्मक नकारात्मक अभिव्यक्ति बदल देनी आवश्यक हो जाती है। मन का सतत बहनेवाला प्रवाह, वहा कुछ अशुभ आया तो किंचीत ठहरना जरुरी है तो शुभं आया तो उस पर तुरंत अंमल करना जरुरी है। जैसे क्रोध आते ही पांच दीर्घ श्‍वास लेने से नियंत्रण में आता है , वह श्‍वास क्रोधको शांत करती है। अगर प्रेम जागृत होता है तो उसका तुरंत विस्तार होने देना इष्ट होता है। ऐसे करते करते अंतर्मन की स्थिती बदलती है।
    फिर स्वप्नोंका ढंग बदलता है, निद्राकी गुणात्मकता बढती है, कल्पनाकी उडान उत्साहीत बनाती है। शुरुवाती कठिण दौर बीतने के बाद जिस तरह दुसरा विचार करते हुए भी ड्रायव्हर अपनेआप गाडी चलाते रहता है उसी तरह उपासक उत्साहीच रहता है। ऐसे अचेतन मन सक्रिय होते ही अगली पायदान पर हम पहुंच जाते है, वह है, अभ्यास !
    अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥ गीता- 6.35 अंतर्यात्रा की शुरुवात होते ही अभ्यास (अखंड आंतरिक सराव) शुरु हो जाता है। गीता में भगवंत वैराग्य के पहले अभ्यास का महत्त्व बतलाते है। अभ्यास याने स्वभाव को अनुकुल ऐसा एखाद विधी चुनना जिस के कारण आंतरिक जगत में प्रवेश करना आसान हो जाता है। अंतर्मुखता बढती है। भक्तियोगी नाम-भजन में नाचने लगता है तो कोई निर्गुणवादी अजपा या संवेदनाओंका आधार लेता है। कोई आसन, मुद्रा, बंध लगाता है तो कोई कर्म को ही भगवान कहता है।
    विषयसंगसे निर्माण होनेवाला गुणात्मक कार्य यही विवेक के शुद्ध या अशुद्ध रुप का कारण बनता है, उस समय स्वीकार करते रजतमात्मक विषयों के कारण विवेकका स्खलन हो सकता है। इस कारण भगवंत वैराग्य के साथ विवेक के बजाए अभ्यास अर्थात यौगिक क्रिया को बताते है। भगवान ज्ञानेश्‍वर माऊली को भी संसार शुन्य करने के बजाए उसे हरिप्रत्ययरुपी पूर्णानुभाव से जितना यही वैराग्य का परिणाम चाहिए।
    प्रखर वैराग्य, अनुभव का ज्ञान और भगवद्भजन का पुण्यप्रताप इससे शुद्ध हुआ विवेक फिर वैराग्य, उपासक को पावन करता है ऐसे सद्गुरु रामदासस्वामी कहते है अन्यथा दिशाहिन दशा ऐसा कहना उचीत होगा।
    इस कारण वैराग्य परिस्थिती को निर्माण करता है तो अखंड अभ्यास उस परिस्थिती में उपयोग करने का तंत्र है। प्रत्येक कृती इच्छांए होती है। इच्छाओं को समाप्त करने के लिए विवेक मित्र बन जाता है। तर्कके आधारपर, मन के साथ सतत संवाद साधके प्रगल्भताका अत्युच्च स्तर याने अचेतन मन बदलनेका महतपराक्रम विवेक करता है। वैराग्यसे निर्माण हुई एक भावजन्य परिस्थिती का उपयोग कैसे करे इसकी प्रेरणा सतत विवेक देता रहता है। विवेक याने म्हणजे एक आलाराम घडी है। पुराने संस्कार जगते ही वह उपासकको जगाता है। ‘इच्छा ना करना’ या संकल्पविहिनता इस अवस्था में उपासक को लाना विवेक का कार्य है।
    मेरा आनंद अब किसी पर भी निर्भर नही है ऐसी भावस्थिती याने वैराग्य ! संसार में उपासक व्यक्ति, घटना, कोई चीज चुन सकता है पर उसका विवेक और वैराग्य उसे आसक्त नही होने देते। चुनाव करो पर आसक्त ना हो। अनासक्त बनो ! ऐसे रात दिन स्मरण कराता रहता है। कोई विधी, अभ्यास का मूल स्वकेंद्रस्थ होना है। जो कुछ हो रहा है उससे तत्काल प्रभावित न होते हुए स्वकेंद्रस्थ, तटस्थ, अनासक्त होकर देखना, और फिर निर्णय लेना उचीत होता है। स्थिरवृत्तीका चष्मा जगत का यथार्थ दर्शन करवाता है।
     सादर सपर्मण के साथ निरंतर, सतत, अबाधीत सजगताके अभ्यास के कारण अपने में प्रतिष्ठीत हुई चीज ही अभ्यास है। सामरस्य-समसाम्य यही अंतिम बोध है, इस कारण संसार नष्ट करना यह क्रिया अपेक्षित नही है, संसार आत्मैव एतद् ऐसा अनुभव करना और उसे सुख पूर्वक करना ही ध्येय है। अंत में Be old, when young, that you may be young when you grow old. यही वैराग्य का बोध है।

    जय हरि ! 
लेखक - दामोदर प्रकाश रामदासी, पुणे

Wednesday, June 29, 2016

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥ (मराठी)

जो श्रद्धचेनि संभोगे। सुखिया जाहला ॥

    तर्काच्या वादळानंतर बुद्धी, चित्त एका दिशेने व दशेने अनुप्राणित होतात, पेशीपेशीतून भावधारेची गंगोत्री उगम पावते, धो धो वाहु लागते, अनंताच्या समुद्राच्या दिशेने. तीचं सुरुवातीचं अवखळ ओसंडून वाहणं, समाधीच्या मैदानी प्रदेशात गंभीरत्व धारण करतं. पात्र विस्तारतं. त्या गंगोत्रीचं सुरुवातीचं एकटीचं गाणं आता वैश्‍विक सूर होतो. अशी श्रद्धारुपी गंगा मलिनता घालवते. आरपार निरसपाणी सौंदर्य उधळते. ती निष्ठेसारखी रविवारच्या चेहर्‍यासारखी नसते. तिथे मुखवटे नसतात. म्हणून अंध ही श्रद्धा नसते तर अंध हा विश्‍वास असतो.
    निष्ठा बाह्यसंस्कारामुळे मिळते तर श्रद्धा आत जन्माला येते. मन लेकाचं मोठ्ठं तार्किक आहे, संदेह करतं, पुरावा मागतं. होय म्हणायलाही मुद्दे शोधतं आणि विश्‍वास ठेवतं. पण विश्‍वास व संदेह एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. तर्क मात्र दोन्ही ठिकाणी केला जातो. श्रद्धा मात्र वेडेपणा असतो. ती एक व्यक्तिगत गहनतेत उमटलेली प्रतिती आहे. आई, बाप, समाज, संस्कृती, परंपरा यातून निष्ठा जन्माला येते. निष्ठा ही मृत श्रद्धा आहे. श्रद्धा ही जीवंत निष्ठा आहे !
    सर्व धर्म निष्ठेशी संबंधीत असतात पण धार्मिकतेचा संबंध केवळ श्रद्धेशी असतो. श्रद्धावान असणं म्हणजेच धार्मिक असणं.
    आस्तिकाची विश्‍वाला आलिंगन देणारी एक श्रद्धा असते तशी नास्तिकाचीही एक श्रद्धा असते. जगण्यासाठी मुळात श्रद्धा ही उपादान असते. ती प्रत्येकात असतेच. नाहीतर कोणी जगुच शकणार नाही. मग संदेही श्‍वास ही घेऊ शकणार नाही. पण तोही हवेवर श्रद्धा ठेऊन श्‍वास घेतोच. पूर्ण श्रद्धा परमजीवन ठरते, तर पूर्ण संदेह आत्महत्या !
    कधीतरी आकाशाला गवसणी घालता येईल या श्रद्धेने फांद्या वर उठतात, जीवनावरील त्या अनुकंपनीय श्रद्धेतूनच विकास संभवतो. श्रद्धावान सरळ असतो त्याची फसवणुकही होईल पण त्याला कोणी दु:खी करु शकत नाही. कारण तो अज्ञाताच्या वाटेवर निघालेला असुरक्षित जीवन जगणारा उपासक असतो. सुरक्षित निष्ठावान मानवी नियमांच्या कडीकोयंडांत स्वत:ला सुरक्षित करुन घेतात. बंदीस्त गुलाम. पण अनंताच्या अनिर्बंध स्वातंत्र्यात झोकला गेलेला श्रद्धावान वेडा पीर मोकळा असतो. हृदयाची कवाडं उघडी ठेऊन अस्तित्वाच्या प्रेमाचं स्वागत करतो. निष्ठा या मृत असतात हे समजतात तो गुलाम श्रद्धावान सम्राट बनतो. अमृत होतो !
    मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् । (गीता 8.7) माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू नि:संशय मलाच मिळशील. हे सीमातीत अस्तिताचे आवाहन हृदय स्वीकारते. जन्मोजन्म मनबुद्धीने केलेल्या तर्काचे कधीतरी समर्पण होते. मग विठ्ठल भेटतो.
    कां वर्षाकाळी सरिता। जैसी चढो लागे पंडुसुता। तैसी नीच नवी भजतां। श्रद्धा दिसे॥(ज्ञा. 12-36) उन्हाळ्यात रोडावलेली सरिता पावसाळ्यात मात्र चांगलीच फुगु लागते. मेघही हातचं राखुन न ठेवता, सहस्त्रधारांनी सरितेला वर्षादान देतात. अगदी तसेच लडीवाळ भक्त बाळ श्रद्धेने माऊलीच्या पायाशी घुटमळतो ती माय लेकराला कडेवर घेते. भगवंतही त्या ढगांप्रमाणे पाझरतो. मग दोन्हीकडचे पाणी एकच होते. जे मेघात तेच सरितेत.
    जयांचा ईश्‍वरी जिव्हाळा। ते भोगिती स्वानंदसोहळा। जयांचा जनावेगळा। ठेवा आक्षै॥ (दा. 3-10-31) ही चढता वाढता भावोन्मत्तेत बुडालेला उन्मनी श्रद्धावान भक्त अमृताची चुळी मुखात धरतो. प्रेम पुष्ट होते, चित्त शुद्ध होते. तो प्राजक्ताचा भावसुगंधी सडा अंगणात पडतो. ईश्‍वरी जिव्हाळ्यातला स्वानंद सोहळामग्न भक्त गाऊ लागतो- रामदासी दर्शन जाले । आत्म्या विठ्ठलातें देखिले॥(स.गा.57)
    श्रद्धायुक्त हृदयात जे प्रतिबींब पडते. तेच त्याचे रुप होते. ज्याचे जया ध्यान। तेचि होय त्याचे मन॥(तुकाराम-3393). अशा श्रद्धेसाठी सुरुवात म्हणजे संदेहाचा ठावठिकाणा शोधुन काढून, बेगडी निष्ठा फेकून खरेखुरे प्रामाणिक संदेही बनुन मनाला तर्काच्या त्या सीमा रेषेवर आणुन ठेवणं, जिथे त्याचे विश्‍वास व संदेह मावळतील. कारण संदेह दु:खाशिवाय दुसरं काही देत नाही. पण त्या दु:खातुनच विकास संभवेल. श्रद्धा म्हणजे रुपांतरण, सार्‍या समाधीचा पाया श्रद्धा आहे असे पतंजलीही म्हणतात- श्रद्धावीर्यस्म्रतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम्॥पांतजलसूत्र1.20
    मनातील सर्वात शक्तिमान तत्त्व म्हणजे श्रद्धा, तीच चित्कला ! भगवंताची. आत्मस्थ स्पंदनशील प्रेमकंप बाह्यत: श्रद्धेचे प्राकट्य ठरते. सत्याच्या प्रकाशाची जीवाच्या ठिकाणचे सुप्तत्व ती सचेत करते. मूळ प्रकट करणे हा कलेचा धर्म असतो म्हणून श्रद्धा ही ब्रह्मकला आहे ! मानवी जीवनात प्रकट होणारी निसर्गदत्त रम्यस्थळी जी बीजं असतात ती कलेने अभिवृद्ध पावतात त्या मागे श्रद्धा असते. तुका म्हणे झरा। आहे मुळीचाचि खरा॥तुकाराम 2662
    श्रद्धावांल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाऽधिगच्छति॥गीता4-39 इंद्रिय संयम असणार्‍या श्रद्धावान जीवाला ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान मिळतात तो शांती वा मोक्षास प्राप्त होतो. यात संयतेन्द्रिय: ची व्याख्या करताना आदी शंकराचार्य सूक्ष्म स्थिती सांगतात- श्रद्धावत्त्वेऽपि बहिर्मुखस्य ज्ञानं न सिद्ध्यत्यतस्तद्राहित्येन भवितव्यमित्याह संयतेन्द्रिय इति। अर्थात श्रद्धावान होण्याबरोबर अंतर्मुखता असेल तरच ज्ञान मिळते. तेव्हाच भक्ताचे श्रद्धेच्या द्वारातून चैतन्याच्या गाभार्‍यात प्रवेश होऊन शिवाचा परिचय होऊन तो ज्ञानवंत होतो. म्हणून ज्ञान हे भक्तिचे बालक आहे, पवित्र श्रद्धेच्या ईश्‍वरनिष्ठास ज्ञान सुखाने वरते असे माऊली म्हणते- यालागी सुमनु आणि शुद्धमति। जो अनिंदकु अनन्य गती। पै गा गौप्यही परी तयाप्रती। चावळिजे सुखे ॥ ज्ञा.9.40. या श्रद्धेला बाळसे आणते ती संतसंगती ! होईल माझी संती भाकिली करुणा। ते त्या नारायणा मनी बैसे॥ जाणीवमनापासून उतरत उतरत ही श्रद्धा परमजाणीवेत उतरते तेव्हा ती अविनाशी ठरते. सत्य व सरलता यांचा मिलाफ म्हणजे श्रद्धा ! ही प्राप्त होण्याला संतकृपाच लागते.
    जय हरी !
अक्षरसेवक लेखक- दामोदर प्रकाश रामदासी, पुणे.